शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:46 IST

वाशिम : कोरोनामुळे पहिली ते नववीच्या आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या. यामुळे बारावी परीक्षेचे काय होणार, यावर ...

वाशिम : कोरोनामुळे पहिली ते नववीच्या आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या. यामुळे बारावी परीक्षेचे काय होणार, यावर पर्याय काय? याबाबत शासनस्तरावर विचार सुरू आहे. दुसरीकडे परीक्षा केव्हा होणार, यावर काय पर्याय निघणार हे अद्याप निश्चित नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात असल्याचे दिसून येते.

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर २३ नोव्हेंबरला नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले; परंतुु कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्वच शाळेचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंद झाले. दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात आले. कोरोनामुळे पहिली ते दहावीच्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या. अजूनही कोरोनाचा प्रभाव कायम असल्याने बारावीच्या परीक्षा नेमक्या केव्हा होणार किंवा यावर पर्याय काय? याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. स्पर्धा परीक्षेसारखी वस्तुनिष्ठ स्वरूपात २०० गुणांची परीक्षा घ्यावी, असाही पर्याय शिक्षण तज्ज्ञ, विद्यार्थ्यांमधून सुचविला जात आहे. बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? याबाबत शासन स्तरावर विचार सुरू आहे. बारावीच्या परीक्षेवरच अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी यासह इतर पदवी शिक्षणाचे प्रवेश अवलंबून असल्याने बारावीची परीक्षा होईल, असे शिक्षणतज्ज्ञांना वाटते. कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर पडली तरी हरकत नाही; परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा व्हायलाच हवी, असा सूर विद्यार्थी व पालकांमधून उमटत आहे.

००००००००००००

काय असू शकतो पर्याय?

कोट

बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरला टर्निंग पॉईंट देणारी आहे. त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करता येणार नाही, असे वाटते. कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर परीक्षा होऊ शकते. परीक्षेतील गुणानुसार पुढील प्रवेश मिळणार असल्याने परीक्षा व्हायलाच हवी.

- प्रा. वसंत देशमुख, शिक्षणतज्ज्ञ.

०००

बारावीच्या परीक्षेवर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी यासह अन्य पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अवलंबून असतात. त्यामुळे बारावीची परीक्षा होईलच, असा एकंदरीत अंदाज आहे. विद्यार्थ्यांनीदेखील बारावीच्या अभ्यासात खंड पडू न देता सातत्य ठेवायला हवे.

- आकाश आहाळे, शिक्षणतज्ज्ञ.

००००

विद्यार्थी जीवनात बारावी परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बारावीची परीक्षा रद्द न करता वस्तुनिष्ठ स्वरूपात (ऑब्जेक्टिक प्रश्न) परीक्षा घ्यायला हवी. यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊन गुणांकनदेखील काढता येईल. पेपर तपासणीदेखील सुलभ होईल.

- प्रा. विजय पोफळे, शिक्षणतज्ज्ञ.

००००

परीक्षेबाबत विद्यार्थी संभ्रमात

कोट

बारावीच्या परीक्षेतील गुणांवरच पुढील प्रवेश पद्धती अवलंबून आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेता आले नाही. ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा घ्यायलाच हवी.

- वंदना मानोरकर, विद्यार्थिनी.

००

कोरोनामुळे पहिली ते दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. दहावी परीक्षेसंदर्भात प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट झाले आहे. त्यामुळे बारावी परीक्षेचे काय होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. या संभ्रमामुळे विद्यार्थी गोंधळून जात असल्याचे दिसून येते.

- गौरव देशमुख, विद्यार्थी.

००

कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. परीक्षा होणार की नाही, कोणत्या पद्धतीने परीक्षा होणार यावर पर्याय काय? आदी प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत. यामुळे विद्यार्थीदेखील संभ्रमात आहेत. परीक्षेबाबत लवकर निर्णय व्हायला हवा.

- गीतांजली चव्हाण, विद्यार्थिनी.

०००००००

जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी - १८,१७५

मुले - ९,९८७

मुली - ८,१८८

००००००००००