शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:46 IST

वाशिम : कोरोनामुळे पहिली ते नववीच्या आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या. यामुळे बारावी परीक्षेचे काय होणार, यावर ...

वाशिम : कोरोनामुळे पहिली ते नववीच्या आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या. यामुळे बारावी परीक्षेचे काय होणार, यावर पर्याय काय? याबाबत शासनस्तरावर विचार सुरू आहे. दुसरीकडे परीक्षा केव्हा होणार, यावर काय पर्याय निघणार हे अद्याप निश्चित नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात असल्याचे दिसून येते.

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर २३ नोव्हेंबरला नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले; परंतुु कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्वच शाळेचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंद झाले. दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात आले. कोरोनामुळे पहिली ते दहावीच्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या. अजूनही कोरोनाचा प्रभाव कायम असल्याने बारावीच्या परीक्षा नेमक्या केव्हा होणार किंवा यावर पर्याय काय? याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. स्पर्धा परीक्षेसारखी वस्तुनिष्ठ स्वरूपात २०० गुणांची परीक्षा घ्यावी, असाही पर्याय शिक्षण तज्ज्ञ, विद्यार्थ्यांमधून सुचविला जात आहे. बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? याबाबत शासन स्तरावर विचार सुरू आहे. बारावीच्या परीक्षेवरच अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी यासह इतर पदवी शिक्षणाचे प्रवेश अवलंबून असल्याने बारावीची परीक्षा होईल, असे शिक्षणतज्ज्ञांना वाटते. कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर पडली तरी हरकत नाही; परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा व्हायलाच हवी, असा सूर विद्यार्थी व पालकांमधून उमटत आहे.

००००००००००००

काय असू शकतो पर्याय?

कोट

बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरला टर्निंग पॉईंट देणारी आहे. त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करता येणार नाही, असे वाटते. कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर परीक्षा होऊ शकते. परीक्षेतील गुणानुसार पुढील प्रवेश मिळणार असल्याने परीक्षा व्हायलाच हवी.

- प्रा. वसंत देशमुख, शिक्षणतज्ज्ञ.

०००

बारावीच्या परीक्षेवर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी यासह अन्य पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अवलंबून असतात. त्यामुळे बारावीची परीक्षा होईलच, असा एकंदरीत अंदाज आहे. विद्यार्थ्यांनीदेखील बारावीच्या अभ्यासात खंड पडू न देता सातत्य ठेवायला हवे.

- आकाश आहाळे, शिक्षणतज्ज्ञ.

००००

विद्यार्थी जीवनात बारावी परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बारावीची परीक्षा रद्द न करता वस्तुनिष्ठ स्वरूपात (ऑब्जेक्टिक प्रश्न) परीक्षा घ्यायला हवी. यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊन गुणांकनदेखील काढता येईल. पेपर तपासणीदेखील सुलभ होईल.

- प्रा. विजय पोफळे, शिक्षणतज्ज्ञ.

००००

परीक्षेबाबत विद्यार्थी संभ्रमात

कोट

बारावीच्या परीक्षेतील गुणांवरच पुढील प्रवेश पद्धती अवलंबून आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेता आले नाही. ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा घ्यायलाच हवी.

- वंदना मानोरकर, विद्यार्थिनी.

००

कोरोनामुळे पहिली ते दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. दहावी परीक्षेसंदर्भात प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट झाले आहे. त्यामुळे बारावी परीक्षेचे काय होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. या संभ्रमामुळे विद्यार्थी गोंधळून जात असल्याचे दिसून येते.

- गौरव देशमुख, विद्यार्थी.

००

कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. परीक्षा होणार की नाही, कोणत्या पद्धतीने परीक्षा होणार यावर पर्याय काय? आदी प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत. यामुळे विद्यार्थीदेखील संभ्रमात आहेत. परीक्षेबाबत लवकर निर्णय व्हायला हवा.

- गीतांजली चव्हाण, विद्यार्थिनी.

०००००००

जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी - १८,१७५

मुले - ९,९८७

मुली - ८,१८८

००००००००००