शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:46 IST

वाशिम : कोरोनामुळे पहिली ते नववीच्या आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या. यामुळे बारावी परीक्षेचे काय होणार, यावर ...

वाशिम : कोरोनामुळे पहिली ते नववीच्या आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या. यामुळे बारावी परीक्षेचे काय होणार, यावर पर्याय काय? याबाबत शासनस्तरावर विचार सुरू आहे. दुसरीकडे परीक्षा केव्हा होणार, यावर काय पर्याय निघणार हे अद्याप निश्चित नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात असल्याचे दिसून येते.

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर २३ नोव्हेंबरला नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले; परंतुु कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्वच शाळेचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंद झाले. दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात आले. कोरोनामुळे पहिली ते दहावीच्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या. अजूनही कोरोनाचा प्रभाव कायम असल्याने बारावीच्या परीक्षा नेमक्या केव्हा होणार किंवा यावर पर्याय काय? याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. स्पर्धा परीक्षेसारखी वस्तुनिष्ठ स्वरूपात २०० गुणांची परीक्षा घ्यावी, असाही पर्याय शिक्षण तज्ज्ञ, विद्यार्थ्यांमधून सुचविला जात आहे. बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? याबाबत शासन स्तरावर विचार सुरू आहे. बारावीच्या परीक्षेवरच अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी यासह इतर पदवी शिक्षणाचे प्रवेश अवलंबून असल्याने बारावीची परीक्षा होईल, असे शिक्षणतज्ज्ञांना वाटते. कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर पडली तरी हरकत नाही; परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा व्हायलाच हवी, असा सूर विद्यार्थी व पालकांमधून उमटत आहे.

००००००००००००

काय असू शकतो पर्याय?

कोट

बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरला टर्निंग पॉईंट देणारी आहे. त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करता येणार नाही, असे वाटते. कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर परीक्षा होऊ शकते. परीक्षेतील गुणानुसार पुढील प्रवेश मिळणार असल्याने परीक्षा व्हायलाच हवी.

- प्रा. वसंत देशमुख, शिक्षणतज्ज्ञ.

०००

बारावीच्या परीक्षेवर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी यासह अन्य पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अवलंबून असतात. त्यामुळे बारावीची परीक्षा होईलच, असा एकंदरीत अंदाज आहे. विद्यार्थ्यांनीदेखील बारावीच्या अभ्यासात खंड पडू न देता सातत्य ठेवायला हवे.

- आकाश आहाळे, शिक्षणतज्ज्ञ.

००००

विद्यार्थी जीवनात बारावी परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बारावीची परीक्षा रद्द न करता वस्तुनिष्ठ स्वरूपात (ऑब्जेक्टिक प्रश्न) परीक्षा घ्यायला हवी. यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊन गुणांकनदेखील काढता येईल. पेपर तपासणीदेखील सुलभ होईल.

- प्रा. विजय पोफळे, शिक्षणतज्ज्ञ.

००००

परीक्षेबाबत विद्यार्थी संभ्रमात

कोट

बारावीच्या परीक्षेतील गुणांवरच पुढील प्रवेश पद्धती अवलंबून आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेता आले नाही. ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा घ्यायलाच हवी.

- वंदना मानोरकर, विद्यार्थिनी.

००

कोरोनामुळे पहिली ते दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. दहावी परीक्षेसंदर्भात प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट झाले आहे. त्यामुळे बारावी परीक्षेचे काय होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. या संभ्रमामुळे विद्यार्थी गोंधळून जात असल्याचे दिसून येते.

- गौरव देशमुख, विद्यार्थी.

००

कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. परीक्षा होणार की नाही, कोणत्या पद्धतीने परीक्षा होणार यावर पर्याय काय? आदी प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत. यामुळे विद्यार्थीदेखील संभ्रमात आहेत. परीक्षेबाबत लवकर निर्णय व्हायला हवा.

- गीतांजली चव्हाण, विद्यार्थिनी.

०००००००

जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी - १८,१७५

मुले - ९,९८७

मुली - ८,१८८

००००००००००