शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

भारनियमन : शिवसेनेचे जिल्हाभर धरणे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:20 IST

वाशिम : वीज भारनियमन, नादुरूस्त रोहित्र यांसह महावितरणशी संबंधित व अन्य विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिवसेनेच्यावतीने बुधवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. एका महिन्याच्या आत समस्या निकाली काढा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आला.

ठळक मुद्देजनता त्रस्त एका महिन्याचा अल्टिमेटम!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वीज भारनियमन, नादुरूस्त रोहित्र यांसह महावितरणशी संबंधित व अन्य विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिवसेनेच्यावतीने बुधवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. एका महिन्याच्या आत समस्या निकाली काढा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आला.वीज भारनियमनात अचानक वाढ झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. शेतातील विद्युत रोहित्रात बिघाड होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. शेकडो विद्युत रोहित्र नादुरूस्त असल्याने शेतकर्‍यांसमोर रब्बी हंगामातील सिंचनाचा पेच निर्माण झाला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कृषी पंप जोडणीचा प्रश्न निकाली निघाला नाही. या पृष्ठभूमीवर शिवसेनेच्यावतीने २0 सप्टेंबर रोजी जिल्हाभरात धरणे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार तसेच खासदार भावना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम येथे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर  तालुका प्रमुख रामदास मते पाटील यांच्या नेतृत्वात बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. वाढलेले भारनियमन बंद करावे, रोहित्र त्वरित दुरुस्ती करणे, शेतकर्‍यांच्या मागणीनुसार त्यांना रोहित्र तातडीने उपलब्ध करून देणे, कृषी पंपाची प्रलंबित वीज जोडणी त्वरित देणे यांसह विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देत चर्चा केली. चर्चेदरम्यान भारनियमनाच्या प्रश्नासह शेतकर्‍यांच्या विविध समस्यांचा येत्या एक महिन्यात निपटारा करण्यात येईल, असे आश्‍वासन अधीक्षक अभियंत्यांनी दिले. या आंदोलनामध्ये माजी जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कवर, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगला सरनाईक यांच्यासह असंख्य शिवसैनिक व शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. मालेगाव येथे तालुका व शहर शिवसेनेतर्फे विविध मागण्यांसंदर्भात धरणे देऊन तहसीलदार आणि वीज वितरणच्या अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. तुरीचे चुकारे देण्यात यावे, सोयाबीन अनुदान द्यावे, पेट्रोल व डिझलचे गगनाला भिडलेले भाव कमी करावे, भारनियमन कमी करावे,  कर्जमाफीच्या अर्जाला मुदतवाढ द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. मालेगावचे महावितरणचे मुख्य अभियंता पांडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना शहराध्य्क्ष संतोष जोशी, जिल्हा परिषद कृषी सभापती विश्‍वनाथ सानप यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिसोड येथे शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.  भारनियमन कमी करावे, नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती तसेच नवीन रोहित्र उपलब्ध करावे, सोयाबीनचे अनुदान व तुरीचे चुकारे द्यावे, खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी, रिसोड तालुक्यात पैनगंगा नदीवर बॅरेजेस मंजूर करावे, पेट्रोल व डिझलची दरवाड कमी करावी, अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य कराव्या, मीटर रिडींग, बिल वाटप व अंगणवाडीच्या मुलांना आहार वाटपाचे काम महिला बचत गटांना द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महादेव ठाकरे, उपजिल्हाप्रमुख डॉ. अरूण देशमुख, निवासी उपजिल्हाप्रमुख भागवत गवळी, शहर प्रमुख अरूण मगर, संध्या सरनाईक, अँड. गजानन अवताडे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.याप्रमाणेच कारंजा, मंगरूळपीर, मानोरा येथेदेखील विविध मागण्यांसंदर्भात शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.