शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

भारनियमन : शिवसेनेचे जिल्हाभर धरणे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:20 IST

वाशिम : वीज भारनियमन, नादुरूस्त रोहित्र यांसह महावितरणशी संबंधित व अन्य विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिवसेनेच्यावतीने बुधवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. एका महिन्याच्या आत समस्या निकाली काढा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आला.

ठळक मुद्देजनता त्रस्त एका महिन्याचा अल्टिमेटम!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वीज भारनियमन, नादुरूस्त रोहित्र यांसह महावितरणशी संबंधित व अन्य विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिवसेनेच्यावतीने बुधवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. एका महिन्याच्या आत समस्या निकाली काढा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आला.वीज भारनियमनात अचानक वाढ झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. शेतातील विद्युत रोहित्रात बिघाड होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. शेकडो विद्युत रोहित्र नादुरूस्त असल्याने शेतकर्‍यांसमोर रब्बी हंगामातील सिंचनाचा पेच निर्माण झाला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कृषी पंप जोडणीचा प्रश्न निकाली निघाला नाही. या पृष्ठभूमीवर शिवसेनेच्यावतीने २0 सप्टेंबर रोजी जिल्हाभरात धरणे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार तसेच खासदार भावना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम येथे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर  तालुका प्रमुख रामदास मते पाटील यांच्या नेतृत्वात बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. वाढलेले भारनियमन बंद करावे, रोहित्र त्वरित दुरुस्ती करणे, शेतकर्‍यांच्या मागणीनुसार त्यांना रोहित्र तातडीने उपलब्ध करून देणे, कृषी पंपाची प्रलंबित वीज जोडणी त्वरित देणे यांसह विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देत चर्चा केली. चर्चेदरम्यान भारनियमनाच्या प्रश्नासह शेतकर्‍यांच्या विविध समस्यांचा येत्या एक महिन्यात निपटारा करण्यात येईल, असे आश्‍वासन अधीक्षक अभियंत्यांनी दिले. या आंदोलनामध्ये माजी जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कवर, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगला सरनाईक यांच्यासह असंख्य शिवसैनिक व शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. मालेगाव येथे तालुका व शहर शिवसेनेतर्फे विविध मागण्यांसंदर्भात धरणे देऊन तहसीलदार आणि वीज वितरणच्या अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. तुरीचे चुकारे देण्यात यावे, सोयाबीन अनुदान द्यावे, पेट्रोल व डिझलचे गगनाला भिडलेले भाव कमी करावे, भारनियमन कमी करावे,  कर्जमाफीच्या अर्जाला मुदतवाढ द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. मालेगावचे महावितरणचे मुख्य अभियंता पांडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना शहराध्य्क्ष संतोष जोशी, जिल्हा परिषद कृषी सभापती विश्‍वनाथ सानप यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिसोड येथे शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.  भारनियमन कमी करावे, नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती तसेच नवीन रोहित्र उपलब्ध करावे, सोयाबीनचे अनुदान व तुरीचे चुकारे द्यावे, खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी, रिसोड तालुक्यात पैनगंगा नदीवर बॅरेजेस मंजूर करावे, पेट्रोल व डिझलची दरवाड कमी करावी, अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य कराव्या, मीटर रिडींग, बिल वाटप व अंगणवाडीच्या मुलांना आहार वाटपाचे काम महिला बचत गटांना द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महादेव ठाकरे, उपजिल्हाप्रमुख डॉ. अरूण देशमुख, निवासी उपजिल्हाप्रमुख भागवत गवळी, शहर प्रमुख अरूण मगर, संध्या सरनाईक, अँड. गजानन अवताडे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.याप्रमाणेच कारंजा, मंगरूळपीर, मानोरा येथेदेखील विविध मागण्यांसंदर्भात शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.