शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

महाराष्ट्राला भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजीन बनवू

By admin | Updated: October 13, 2014 00:55 IST

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची अकोल्यात सभा.

अकोला: महाराष्ट्र एकेकाळी विकसित राज्य होते. ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजीन होते. त्यामुळे मला नेहमीच महाराष्ट्राचा हेवा वाटायचा; मात्र गत काही वर्षांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीत राज्याचे वाटोळे झाले. सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे, राज्यातही भाजपचे सरकार आल्यास, महाराष्ट्राला पुन्हा देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजीन बनवू, असा विश्‍वास मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. अकोल्यातील खुले नाट्य सभागृहात रविवारी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ चव्हाण यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या कारभारावर सडकून टीका केली. आघाडी सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे केले. मध्यप्रदेशात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच कल्याणासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कधीकाळी महाराष्ट्राच्या तुलनेत कितीतरी मागे असलेले मध्यप्रदेश आता महाराष्ट्राच्या पुढे निघून गेले आहे. देशाचा कृषी विकास दर केवळ तीन टक्के असताना मध्यप्रदेशचा विकासदर २४.९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या शेजारील मध्यप्रदेश आणि गुजरातचाही विकास झाला; मात्र, केवळ आघाडी सरकारमुळे महाराष्ट्र मागे राहिल्याची खंत चौहान यांनी व्यक्त केली. *सभा तब्बल साडेतीन तास उशिरा सकाळी दहा वाजता शिवराजसिंह चौहान यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार खुले नाट्यागृहात सकाळी १0 वाजताच कार्यकर्ते व नागरिक आले. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुद्रित भाषण ऐकवून स्थानिक नेत्यांनी वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मध्यप्रदेशातून आलेल्या नेत्यांच्या खांद्यावर धुरा सोपविली. उत्कृष्ट वक्ते असलेल्या या नेत्यांनी दीड वाजेपयर्ंत मनोगत व्यक्त केले. *महाराष्ट्रात सिंचन, तर देशात ह्यजीजाजीह्ण घोटाळामहाराष्ट्रात ७0 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा आणि देशात जीजाजी घोटाळा झाल्याची टिका शिवराजसिंह चौहान यांनी अजित पवार आणि रॉबर्ट वड्रा यांचे नाव न घेता केली. महाराष्ट्रात हजारो कोटी रुपये खर्च करुनही सिंचन झालेले नाही. मध्यप्रदेशात मात्र काही कोटी रुपयांतच हजारो हेक्टर शेतजमीनवर सिंचन झाले आहे, असे चौहान यांनी यावेळी सांगितले.