शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

महाराष्ट्राला भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजीन बनवू

By admin | Updated: October 13, 2014 00:55 IST

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची अकोल्यात सभा.

अकोला: महाराष्ट्र एकेकाळी विकसित राज्य होते. ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजीन होते. त्यामुळे मला नेहमीच महाराष्ट्राचा हेवा वाटायचा; मात्र गत काही वर्षांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीत राज्याचे वाटोळे झाले. सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे, राज्यातही भाजपचे सरकार आल्यास, महाराष्ट्राला पुन्हा देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजीन बनवू, असा विश्‍वास मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. अकोल्यातील खुले नाट्य सभागृहात रविवारी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ चव्हाण यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या कारभारावर सडकून टीका केली. आघाडी सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे केले. मध्यप्रदेशात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच कल्याणासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कधीकाळी महाराष्ट्राच्या तुलनेत कितीतरी मागे असलेले मध्यप्रदेश आता महाराष्ट्राच्या पुढे निघून गेले आहे. देशाचा कृषी विकास दर केवळ तीन टक्के असताना मध्यप्रदेशचा विकासदर २४.९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या शेजारील मध्यप्रदेश आणि गुजरातचाही विकास झाला; मात्र, केवळ आघाडी सरकारमुळे महाराष्ट्र मागे राहिल्याची खंत चौहान यांनी व्यक्त केली. *सभा तब्बल साडेतीन तास उशिरा सकाळी दहा वाजता शिवराजसिंह चौहान यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार खुले नाट्यागृहात सकाळी १0 वाजताच कार्यकर्ते व नागरिक आले. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुद्रित भाषण ऐकवून स्थानिक नेत्यांनी वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मध्यप्रदेशातून आलेल्या नेत्यांच्या खांद्यावर धुरा सोपविली. उत्कृष्ट वक्ते असलेल्या या नेत्यांनी दीड वाजेपयर्ंत मनोगत व्यक्त केले. *महाराष्ट्रात सिंचन, तर देशात ह्यजीजाजीह्ण घोटाळामहाराष्ट्रात ७0 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा आणि देशात जीजाजी घोटाळा झाल्याची टिका शिवराजसिंह चौहान यांनी अजित पवार आणि रॉबर्ट वड्रा यांचे नाव न घेता केली. महाराष्ट्रात हजारो कोटी रुपये खर्च करुनही सिंचन झालेले नाही. मध्यप्रदेशात मात्र काही कोटी रुपयांतच हजारो हेक्टर शेतजमीनवर सिंचन झाले आहे, असे चौहान यांनी यावेळी सांगितले.