शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

टरबुजाचे भाव गडगडले; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:43 IST

शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादित मालाची व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने मागणी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत सरकारसुद्धा कोणत्याच ...

शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादित मालाची व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने मागणी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत सरकारसुद्धा कोणत्याच प्रकारची पावले उचलत नसल्याने शेतकरीवर्गासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या भीतीमुळे शेतीमालाला कवडीमोल दराने मागणी होत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शेतजमिनीत टरबूज लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी ३ महिने वेळोवेळी खते, औषधी, पाणी दिले; परंतु टरबूज विक्रीसाठी आल्यावर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. सर्व बाजारपेठा ११ वाजेपर्यंतच सुरू असून, इतर वेळेत बंद आहेत. यामुळे शेतातील तयार माल शेतातच पडला. परिणागू शेतातील भाजीपाला व फळे यांची कवडीमोल दराने व्यापारी मागणी करत आहेत. थेट विक्री करावे तर ऑटोचा खर्च, मजुरांचा हिशोब व माल घेऊन घरापर्यंत गेल्याने लोकांनी सुद्धा एक टरबूज पाच ते दहा रुपयाला देण्याची मागणी करत आहेत. शेतातच माल सडून जात असल्याने गावातच काडीमोल भावाने विक्री होत असल्याने टरबजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादित मालाची व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने मागणी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत सरकारसुद्धा कोणत्याच प्रकारची पावले उचलत नसल्याने शेतकरीवर्गासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या भीतीमुळे शेतीमालाला कवडीमोल दराने मागणी होत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शेतजमिनीत टरबूज लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी ३ महिने वेळोवेळी खते, औषधी, पाणी दिले; परंतु टरबूज विक्रीसाठी आल्यावर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. सर्व बाजारपेठा ११ वाजेपर्यंतच सुरू असून, इतर वेळेत त्या बंद आहेत. यामुळे शेतातील तयार माल शेतातच पडला. परिणामी, शेतातील भाजीपाला व फळांची कवडीमोल दराने व्यापारी मागणी करत आहेत. थेट विक्री करावी, तर ऑटोचा खर्च, मजुरांचा हिशोब व माल घेऊन घरापर्यंत गेल्याने लोकसुद्धा एक टरबूज पाच ते दहा रुपयांना देण्याची मागणी करत आहेत. शेतातच माल सडून जात असल्याने गावातच काडीमोल भावाने विक्री होत असून, टरबजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.