शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

राजुरा येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू!

By admin | Updated: May 25, 2017 01:46 IST

राजुरा : येथील पाणीटंचाईची तीव्रता वाढलेली असतानाही, टँकरचा प्रस्ताव धूळ खात पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २२ मे रोजीच्या अंकात प्रकाशित करताच, तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : येथील पाणीटंचाईची तीव्रता वाढलेली असतानाही, टँकरचा प्रस्ताव धूळ खात पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २२ मे रोजीच्या अंकात प्रकाशित करताच, तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची तातडीने दखल घेत टँकरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानुसार २४ मे पासून टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला.गत काही वर्षांपासून राजुरा येथील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता मार्च महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी मे महिना संपत आला, तरी टँकरने पाणीपुरवठा सुरू होत नव्हता. गावात जलस्रोत नसल्याने दूरवरून गावकऱ्यांना पाणी आणावे लागते. रात्री-अपरात्री जागून पिण्याचे व वापराचे पाणी आणण्यासाठी लहान बालकांपासून ते आबालवृद्धांना कसरत करावी लागते. मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट सुरू होती. ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने टँकरचा प्रस्ताव तहसीलकडे दाखल करण्यात आला. मात्र, या प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण देत हा प्रस्ताव गत तीन महिन्यांपासून धूळ खात पडला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गावातील सामाजिक कार्यकर्ते मनीष दत्तराव मोहळे, यशवंत हिवराळे, शिवा वामनराव खराटे आदींनी २० मे रोजी तहसीलदार राजेश वझिरे यांची भेट घेऊन आपबिती कथन केली तसेच ‘लोकमत’ने २२ मे रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत तहसीलदार वझिरे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून टँकरचा प्रस्ताव निकाली काढला. त्यानुसार २४ मे रोजी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. एका विहिरीत टँकरचे पाणी टाकले जात आहे. टँकर सुरू होण्यासंदर्भात ‘लोकमत’चा पाठपुरावा फळास आला आहे. तलावाचा प्रश्न रखडलेलाच!राजुरा येथील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नजिकच्या नदी पात्रातील वाघडोह किंवा तवली नामक शेतशिवारातील सर्वेक्षण झालेल्या तलावाचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. इतरही ठिकाणी छोटे-छोटे तलाव, मातीबांध, सिमेंट बंधाऱ्याच्या कामासह जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यासाठी राजकीय पुढारी, अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गावकऱ्यांना अपेक्षित आहे. केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी राजुऱ्यातील पाणीटंचाईची दाहकता कमी होणार नाही.