शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

कारंजा तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट ?

By admin | Updated: November 17, 2014 00:00 IST

उपाय योजनांसाठी प्रशासनाला सूचना: अधिकारी आश्‍वस्त.

कारंजा लाड (वाशिम): यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे कारंजा शहराला पाणी पुरवठा करणार्‍या अडाण प्रकल्पात मुबलक पाणीसाठा होऊ शकला नसून, तालुक्यातील इतर जलाशयांतही ३५ टक्क्यांच्या आसपासच जलसाठा असल्याने तालुक्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवन्याची शक्यता आहे. कारंजा तालुक्यात १६७ गावे आहेत. तालुक्यातील उजाड गावे वगळता १३१ गावे आहेत. त्यापैकी किमान १८ गावांत यावर्षी पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ही समस्या लक्षात घेऊन सबंध शासकीय यंत्रणा पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन करीत आहे. यासाठी गावातील विहिरींचे अधिग्रहण करणे, टँकरची व्यवस्था करण आवश्यक आहे. पाणीटंचाईचे संभाव्य संकट विचारात घेऊन नवनिर्वाचित आमदार राजेंद्र पाटणी यांनी १५ नोव्हेंबर रोजी कारंजा पंचायत समितीमध्ये सर्व संबंधित अधिकार्‍यांची व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी योजना तयार केली. या वर्षी पावसाने दगा दिल्याने खरीप हंगाम हातातून गेला व रब्बी हंगामात पाण्याचा बेसुमार उपसा झाला, तर तालुक्यावर जलसंकट ओढवणार आहे. आमदार पाटणी यांनी पाणीटंचाईबाबत संबंध तालुक्याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना केल्या आहेत. कारंजा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र शासनाच्या त्या संदर्भातील योजनांवर पाणीटंचाई सभेत चर्चा करण्यात आली. पाणीटंचाईचा सामना सर्व सुविधांसह कसा करता येईल. या संबंधीही सभेत चर्चा झाली. वाशिम जिल्हय़ातील अडाण प्रकल्पाचे व्यवस्थापन जीवन प्राधीकरणाच्या यवतमाळ विभागाकडून करण्यात येते आणि या विभागाच्या क ारंजा शाखेनुसार अडाण प्रकल्पात शहराला पुरेल एवढय़ा प्रमाणात पाणीसाठा आहे. शेतकर्‍यांना आवश्यक असताना विज रोहित्र वेळेवर मिळत नसल्याचे मत व्यक्त करून ही सडलेली यंत्रणा सुधारण्यास थोडा वेळ लागणार असल्याचे मतही पाटणी यांनी यावेळी व्यक्त केले होते. एकंदरीत स्थिती पाहता क ारंजा तालुक्यात जलसाठा पुरेसा नसला तर, संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन पूणपणे ाज्ज असल्याचे दिसत आहे. मजीप्रा कारंजा विभागाचे शाखाधिकारी प्रसाद नुलकर यांनी लोकमत प्र ितनिधीशी बोलताना कारंजा शहरास पाणी पुरवठा करणार्‍या अडाण प्रकल्पात सद्यस्थितीत पुरेसा जलसाठा असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तहसीलदार यांनी ३५ टक्केच जलसाठा असल्याचे स्पष्ट करून प्रशासन पाणीटंचाईची परिस्थिती हाताळण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले. आवश्यकता असल्यास विहीर अधिग्रहण व टँकरने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.