शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

कारंजा तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट ?

By admin | Updated: November 17, 2014 00:00 IST

उपाय योजनांसाठी प्रशासनाला सूचना: अधिकारी आश्‍वस्त.

कारंजा लाड (वाशिम): यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे कारंजा शहराला पाणी पुरवठा करणार्‍या अडाण प्रकल्पात मुबलक पाणीसाठा होऊ शकला नसून, तालुक्यातील इतर जलाशयांतही ३५ टक्क्यांच्या आसपासच जलसाठा असल्याने तालुक्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवन्याची शक्यता आहे. कारंजा तालुक्यात १६७ गावे आहेत. तालुक्यातील उजाड गावे वगळता १३१ गावे आहेत. त्यापैकी किमान १८ गावांत यावर्षी पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ही समस्या लक्षात घेऊन सबंध शासकीय यंत्रणा पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन करीत आहे. यासाठी गावातील विहिरींचे अधिग्रहण करणे, टँकरची व्यवस्था करण आवश्यक आहे. पाणीटंचाईचे संभाव्य संकट विचारात घेऊन नवनिर्वाचित आमदार राजेंद्र पाटणी यांनी १५ नोव्हेंबर रोजी कारंजा पंचायत समितीमध्ये सर्व संबंधित अधिकार्‍यांची व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी योजना तयार केली. या वर्षी पावसाने दगा दिल्याने खरीप हंगाम हातातून गेला व रब्बी हंगामात पाण्याचा बेसुमार उपसा झाला, तर तालुक्यावर जलसंकट ओढवणार आहे. आमदार पाटणी यांनी पाणीटंचाईबाबत संबंध तालुक्याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना केल्या आहेत. कारंजा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र शासनाच्या त्या संदर्भातील योजनांवर पाणीटंचाई सभेत चर्चा करण्यात आली. पाणीटंचाईचा सामना सर्व सुविधांसह कसा करता येईल. या संबंधीही सभेत चर्चा झाली. वाशिम जिल्हय़ातील अडाण प्रकल्पाचे व्यवस्थापन जीवन प्राधीकरणाच्या यवतमाळ विभागाकडून करण्यात येते आणि या विभागाच्या क ारंजा शाखेनुसार अडाण प्रकल्पात शहराला पुरेल एवढय़ा प्रमाणात पाणीसाठा आहे. शेतकर्‍यांना आवश्यक असताना विज रोहित्र वेळेवर मिळत नसल्याचे मत व्यक्त करून ही सडलेली यंत्रणा सुधारण्यास थोडा वेळ लागणार असल्याचे मतही पाटणी यांनी यावेळी व्यक्त केले होते. एकंदरीत स्थिती पाहता क ारंजा तालुक्यात जलसाठा पुरेसा नसला तर, संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन पूणपणे ाज्ज असल्याचे दिसत आहे. मजीप्रा कारंजा विभागाचे शाखाधिकारी प्रसाद नुलकर यांनी लोकमत प्र ितनिधीशी बोलताना कारंजा शहरास पाणी पुरवठा करणार्‍या अडाण प्रकल्पात सद्यस्थितीत पुरेसा जलसाठा असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तहसीलदार यांनी ३५ टक्केच जलसाठा असल्याचे स्पष्ट करून प्रशासन पाणीटंचाईची परिस्थिती हाताळण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले. आवश्यकता असल्यास विहीर अधिग्रहण व टँकरने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.