शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

५४ गावांवर पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: November 22, 2015 02:04 IST

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा निरीक्षण अहवाल; आतापासूनच कराव्या लागणार उपाययोजना.

संतोष वानखडे / वाशिम : यावर्षीच्या अल्प पावसाचा फटका पाणीटंचाईच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५४ गावांना बसणार असून, पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने विहिरीतील भूजल पातळीचे निरीक्षण केल्यानंतर ५४ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याचे मत नोंदविले आहे. विविध कारणांमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पावसाळ्यातच पाऊस फितूर होत असल्याने साधारणत: हिवाळ्याच्या शेवटच्या महिन्यात काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासन नानाविध उपाययोजना राबविते. कायमस्वरुपी उपाययोजनांचा अभाव, पाण्याचा अपव्यय आणि पावसाचे अल्प प्रमाण यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे चटके गावकर्‍यांना सहन करावे लागतात. यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाला. जूनमध्ये वेळेवर हजेरी लावणारा पाऊस जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात फितूर झाला. परिणामी, जलसाठय़ांत समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. जलयुक्त शिवार आणि ह्यआपलं गाव-आपलं पाणीह्ण या उपक्रमांमुळे ३३ गावांत पाण्याची उपलब्धता करण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. ५४ गावांतील विहिरींची भूजल पातळी खालावल्याने येथे पाणीटंचाई निर्माण होण्याचे सुतोवाच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालाने केले. भूजल सर्वेक्षण विभागाच्या यंत्रणेने जिल्ह्यातील एकूण ७९ विहिरींच्या भूजल पातळीचे निरीक्षण केले. यामध्ये वाशिम व मंगरुळपीर तालुक्यातील प्रत्येकी ११, रिसोड तालुका १८, मालेगाव आठ, मानोरा १५ व कारंजा १६ गावातील विहिरींचा समावेश आहे. या निरीक्षणावरून ५४ गावांवर पाणीटंचाईचे ढग गडद असल्याचे मत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प असले तरी भूजलच्या पातळीत घट नसल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले. उपाययोजनांची लगबग सुरू झाली.