शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

५४ गावांवर पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: November 22, 2015 02:04 IST

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा निरीक्षण अहवाल; आतापासूनच कराव्या लागणार उपाययोजना.

संतोष वानखडे / वाशिम : यावर्षीच्या अल्प पावसाचा फटका पाणीटंचाईच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५४ गावांना बसणार असून, पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने विहिरीतील भूजल पातळीचे निरीक्षण केल्यानंतर ५४ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याचे मत नोंदविले आहे. विविध कारणांमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पावसाळ्यातच पाऊस फितूर होत असल्याने साधारणत: हिवाळ्याच्या शेवटच्या महिन्यात काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासन नानाविध उपाययोजना राबविते. कायमस्वरुपी उपाययोजनांचा अभाव, पाण्याचा अपव्यय आणि पावसाचे अल्प प्रमाण यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे चटके गावकर्‍यांना सहन करावे लागतात. यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाला. जूनमध्ये वेळेवर हजेरी लावणारा पाऊस जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात फितूर झाला. परिणामी, जलसाठय़ांत समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. जलयुक्त शिवार आणि ह्यआपलं गाव-आपलं पाणीह्ण या उपक्रमांमुळे ३३ गावांत पाण्याची उपलब्धता करण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. ५४ गावांतील विहिरींची भूजल पातळी खालावल्याने येथे पाणीटंचाई निर्माण होण्याचे सुतोवाच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालाने केले. भूजल सर्वेक्षण विभागाच्या यंत्रणेने जिल्ह्यातील एकूण ७९ विहिरींच्या भूजल पातळीचे निरीक्षण केले. यामध्ये वाशिम व मंगरुळपीर तालुक्यातील प्रत्येकी ११, रिसोड तालुका १८, मालेगाव आठ, मानोरा १५ व कारंजा १६ गावातील विहिरींचा समावेश आहे. या निरीक्षणावरून ५४ गावांवर पाणीटंचाईचे ढग गडद असल्याचे मत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प असले तरी भूजलच्या पातळीत घट नसल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले. उपाययोजनांची लगबग सुरू झाली.