शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

५४ गावांवर पाणीटंचाईचे संकट

By admin | Updated: November 22, 2015 02:04 IST

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा निरीक्षण अहवाल; आतापासूनच कराव्या लागणार उपाययोजना.

संतोष वानखडे / वाशिम : यावर्षीच्या अल्प पावसाचा फटका पाणीटंचाईच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५४ गावांना बसणार असून, पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने विहिरीतील भूजल पातळीचे निरीक्षण केल्यानंतर ५४ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याचे मत नोंदविले आहे. विविध कारणांमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पावसाळ्यातच पाऊस फितूर होत असल्याने साधारणत: हिवाळ्याच्या शेवटच्या महिन्यात काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासन नानाविध उपाययोजना राबविते. कायमस्वरुपी उपाययोजनांचा अभाव, पाण्याचा अपव्यय आणि पावसाचे अल्प प्रमाण यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे चटके गावकर्‍यांना सहन करावे लागतात. यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाला. जूनमध्ये वेळेवर हजेरी लावणारा पाऊस जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात फितूर झाला. परिणामी, जलसाठय़ांत समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. जलयुक्त शिवार आणि ह्यआपलं गाव-आपलं पाणीह्ण या उपक्रमांमुळे ३३ गावांत पाण्याची उपलब्धता करण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. ५४ गावांतील विहिरींची भूजल पातळी खालावल्याने येथे पाणीटंचाई निर्माण होण्याचे सुतोवाच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालाने केले. भूजल सर्वेक्षण विभागाच्या यंत्रणेने जिल्ह्यातील एकूण ७९ विहिरींच्या भूजल पातळीचे निरीक्षण केले. यामध्ये वाशिम व मंगरुळपीर तालुक्यातील प्रत्येकी ११, रिसोड तालुका १८, मालेगाव आठ, मानोरा १५ व कारंजा १६ गावातील विहिरींचा समावेश आहे. या निरीक्षणावरून ५४ गावांवर पाणीटंचाईचे ढग गडद असल्याचे मत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प असले तरी भूजलच्या पातळीत घट नसल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले. उपाययोजनांची लगबग सुरू झाली.