शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जलसाठे आटले, गणेश विसर्जनाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 15:47 IST

यंदा अल्प पावसामुळे जिल्हाभरातील जलसाठ्यात वाढच झाली नाही. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अडाण नदीच्या पात्रात केवळ फुटभर पाणी आहे.

इंझोरी, दि. 2 - यंदा अल्प पावसामुळे जिल्हाभरातील जलसाठ्यात वाढच झाली नाही. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अडाण नदीच्या पात्रात केवळ फुटभर पाणी आहे. सर्वच नद्या, तलावांची हिच स्थिती असल्याने यंदा गणेश विसर्जन करावे कोठे, असा प्रश्न गणेशभक्तांसमोर उपस्थित झाला आहे. 

यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला आहे. मधल्या काही दिवसांत तुरळक पाऊस पडल्याने खरिपाच्या पिकांना आधार झाला असला तरी, नद्या, तलाव, विहिरींच्या जलसाठ्यात किंचितही वाढ झाली नाही, उलट पाणी पातळी खोल गेली आहे. आता येत्या दोन दिवसांत सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी होणार असताना श्रींना निरोप द्यावा कसा, असा प्रश्न गणेशभाविकांना पडला आहे. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदी पात्रात कारंजा तालुक्यासह मानोरा तालुक्यातील काही गावांमधील गणेश मंडळांकडून गणेश विर्सजन करण्यात येते. 

ऑगस्ट महिन्यात या नदीचे पात्र काठोकाठ भरलेले असते. त्यामुळे कारंजा आणि मानोरा तालुक्यातील गणेश मंडळांकडून बाप्पांना निरोप देण्यात अडचण येत नाही; परंतु यंदा अत्यल्प पावसामुळे हे नदी पात्र आटले आहे. पात्रातील मध्यभागात केवळ फुटभर पाणी वाहताना दिसते. या पाण्यात विसर्जन करून श्रींना निरोप द्यावा तरी कसा, असा प्रश्न गणेश मंडळांना पडला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पर्याय शोधला जात असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव