शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

जलसाठे आटले, गणेश विसर्जनाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 15:47 IST

यंदा अल्प पावसामुळे जिल्हाभरातील जलसाठ्यात वाढच झाली नाही. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अडाण नदीच्या पात्रात केवळ फुटभर पाणी आहे.

इंझोरी, दि. 2 - यंदा अल्प पावसामुळे जिल्हाभरातील जलसाठ्यात वाढच झाली नाही. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अडाण नदीच्या पात्रात केवळ फुटभर पाणी आहे. सर्वच नद्या, तलावांची हिच स्थिती असल्याने यंदा गणेश विसर्जन करावे कोठे, असा प्रश्न गणेशभक्तांसमोर उपस्थित झाला आहे. 

यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला आहे. मधल्या काही दिवसांत तुरळक पाऊस पडल्याने खरिपाच्या पिकांना आधार झाला असला तरी, नद्या, तलाव, विहिरींच्या जलसाठ्यात किंचितही वाढ झाली नाही, उलट पाणी पातळी खोल गेली आहे. आता येत्या दोन दिवसांत सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी होणार असताना श्रींना निरोप द्यावा कसा, असा प्रश्न गणेशभाविकांना पडला आहे. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदी पात्रात कारंजा तालुक्यासह मानोरा तालुक्यातील काही गावांमधील गणेश मंडळांकडून गणेश विर्सजन करण्यात येते. 

ऑगस्ट महिन्यात या नदीचे पात्र काठोकाठ भरलेले असते. त्यामुळे कारंजा आणि मानोरा तालुक्यातील गणेश मंडळांकडून बाप्पांना निरोप देण्यात अडचण येत नाही; परंतु यंदा अत्यल्प पावसामुळे हे नदी पात्र आटले आहे. पात्रातील मध्यभागात केवळ फुटभर पाणी वाहताना दिसते. या पाण्यात विसर्जन करून श्रींना निरोप द्यावा तरी कसा, असा प्रश्न गणेश मंडळांना पडला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पर्याय शोधला जात असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव