शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

‘वॉटर कप’ स्पर्धेचे ६ आॅगस्टला होणार पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:30 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१७ चा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ६ आॅगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री शिवछत्रपती स्पोटर््स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथे होत आहे.

ठळक मुद्देसोहळा श्री शिवछत्रपती स्पोटर््स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथेमुख्यमंत्री राहणार उपस्थित कारंजा तालुक्याचा स्पर्धेत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाराष्ट्रातील गावांना दुष्काळाच्या या मगरमिठीतून सोडविण्यासाठी अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१७ चा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ६ आॅगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री शिवछत्रपती स्पोटर््स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथे होत आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, पाणी फाउंडेशनचे सह-संस्थापक आमिर खान हेही उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत वाशिम तालुक्यातील कारंजा तालुक्याचा सहभाग होता.वॉटर कप स्पर्धा २०१७ च्या पुरस्कार सोहळ्यात शेतकरी, उद्योजक, अभिनय क्षेत्राशी संबंधित अनेक व्यक्ती, शात्रज्ञ, सरकारी अधिकारी अणि सामाजिक कार्यकर्तेे, हे सर्व एकत्र येऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांचा गौरव करणार आहेत. त्यामुळे हा समारंभ सामाजिक स्तरातील विविध लोकांचा संगम असेल, असे याविषयी माहिती देताना पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी सांगितले आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या गावांना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख रुपये आणि २० लाख रुपये रोख देण्यात येतील. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाºया गावाला १० लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. वॉटर कपच्या निमित्ताने विजेत्या गावांना देण्यात येणाºया बक्षिसांची एकूण रक्कम ४ कोटी रुपयांहून अधिक आहे.सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ मध्ये सहभागी झालेल्या १३ जिल्ह्यातील ३० तालुक्यांमध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज अणि धारूर, लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा आणि कळंब, औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री आणि खुलताबाद, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, माण आणि खटाव, पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि इंदापूर, सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि जत, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि उत्तर सोलापूर, अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, पातूर अणि अकोट, वाशिम जिल्ह्यातील कारंजा, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब आणि उमरखेड, वर्धा जिल्ह्यातील आर्वी, तसेच अमरावती जिल्ह्यातील वरूड आणि धार्णी या तालुक्यांचा समावेश आहे.