शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर कप’ स्पर्धेचे ६ आॅगस्टला होणार पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:30 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१७ चा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ६ आॅगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री शिवछत्रपती स्पोटर््स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथे होत आहे.

ठळक मुद्देसोहळा श्री शिवछत्रपती स्पोटर््स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथेमुख्यमंत्री राहणार उपस्थित कारंजा तालुक्याचा स्पर्धेत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाराष्ट्रातील गावांना दुष्काळाच्या या मगरमिठीतून सोडविण्यासाठी अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१७ चा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ६ आॅगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री शिवछत्रपती स्पोटर््स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथे होत आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, पाणी फाउंडेशनचे सह-संस्थापक आमिर खान हेही उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत वाशिम तालुक्यातील कारंजा तालुक्याचा सहभाग होता.वॉटर कप स्पर्धा २०१७ च्या पुरस्कार सोहळ्यात शेतकरी, उद्योजक, अभिनय क्षेत्राशी संबंधित अनेक व्यक्ती, शात्रज्ञ, सरकारी अधिकारी अणि सामाजिक कार्यकर्तेे, हे सर्व एकत्र येऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांचा गौरव करणार आहेत. त्यामुळे हा समारंभ सामाजिक स्तरातील विविध लोकांचा संगम असेल, असे याविषयी माहिती देताना पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी सांगितले आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या गावांना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख रुपये आणि २० लाख रुपये रोख देण्यात येतील. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाºया गावाला १० लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. वॉटर कपच्या निमित्ताने विजेत्या गावांना देण्यात येणाºया बक्षिसांची एकूण रक्कम ४ कोटी रुपयांहून अधिक आहे.सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ मध्ये सहभागी झालेल्या १३ जिल्ह्यातील ३० तालुक्यांमध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज अणि धारूर, लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा आणि कळंब, औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री आणि खुलताबाद, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, माण आणि खटाव, पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि इंदापूर, सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि जत, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि उत्तर सोलापूर, अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, पातूर अणि अकोट, वाशिम जिल्ह्यातील कारंजा, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब आणि उमरखेड, वर्धा जिल्ह्यातील आर्वी, तसेच अमरावती जिल्ह्यातील वरूड आणि धार्णी या तालुक्यांचा समावेश आहे.