शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
7
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
8
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
9
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
10
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
11
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
12
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
13
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
14
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
15
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
16
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
17
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
18
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
19
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
20
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 

‘जलयुक्त शिवार’द्वारे पाणी टंचाईवर मात शक्य!

By admin | Updated: March 9, 2016 02:11 IST

जलजागृती सप्ताहांतर्गत कार्यक्रमात राजेंद्र सिंह यांचे प्रतिपादन.

वाशिम : महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षीपासून सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाद्वारे पाणीटंचाईवर मात करणे शक्य असल्याचे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. जलयुक्त शिवार अभियान समिती व 'आत्मा' वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने वाटणे लॉन्स येथे ८ मार्च रोजी आयोजित जलजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यातील शेतकरी, ग्रामस्तरीय पदाधिकारी व कर्मचारी यांना जलयुक्त शिवार अभियानाविषयी मार्गदर्शन व्हावे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, विदर्भात राजस्थानपेक्षा चौपट पाऊस पडतो; मात्र या ठिकाणी उष्णता अधिक असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. त्यामुळे येथील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पावसाचे पडणारे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीत जिरवणे हाच विदर्भातील दुष्काळावरील उपाय आहे. गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे त्यांनी सांगितले. जमिनीवरील हिरवळ कमी होत असल्याने जमिनीची उष्णता वाढली आहे, त्यामुळे ऋतुचक्र बदलले असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे, तसेच अवेळी पाऊस पडत आहे. जमिनीवरील हिरवळीचे प्रमाण वाढवून जमिनीची उष्णता कमी केल्याशिवाय ऋतुचक्र संतुलित राहणार नाही, असे डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी राजस्थानमधील अल्वर जिल्ह्यातील कामांचे उदाहरण देऊन ऋतुचक्र संतुलित कसे करता येईल, हे सांगितले. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे जमिनीची धूप व उष्णता कमी होण्यास मदत होईल. तसेच ऋतुचक्र संतुलित होऊन पावसाचे प्रमाण पूर्ववत होईल. शेतकर्‍यांनी जलयुक्त शिवार अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड होत्या. यावेळी आमदार अमित झनक, वाशिमच्या नगराध्यक्ष लता उलेमाले, सभापती ज्योती गणेशपुरे, जि.प. सदस्य गजानन अमदाबादकर, विकास गवळी, उस्मान गारवे यांच्यासह विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, विभागीय कृषी सहसंचालक शुद्धोधन सरदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, लघू पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कोहीरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक अरुण वाघमारे आदी उपस्थित होते.