शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वाशिमकर दिवसाला १५ मोबाईल हरवतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:42 IST

गेल्या काही वर्षांत मोबाईल ही जीवनाश्यक बाब बनली आहे. मोबाईलशिवाय कुठलेच काम होणे सध्यातरी अनेकांसाठी अशक्य झाले आहे. त्यामुळे ...

गेल्या काही वर्षांत मोबाईल ही जीवनाश्यक बाब बनली आहे. मोबाईलशिवाय कुठलेच काम होणे सध्यातरी अनेकांसाठी अशक्य झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या खिशात मोबाईल असतोच. त्यात काही लोक महागडे मोबाईल वापरतात. हीच बाब हेरून मोबाईल चोरटेही सक्रिय झाले आहेत. वाशिमच्या बाजारात २०२० या वर्षांत खिशातून मोबाईल लंपास केल्याच्या १५० पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत; तर ४५ नागरिकांनी स्वत:च मोबाईल हरविले आहेत. यासंबंधीच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या असून त्यातील ७० मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

.....................

२०२० मध्ये दाखल झालेल्या तक्रारी

जानेवारी - २५

फेब्रुवारी - १९

मार्च - ११

एप्रिल - १०

मार्च - ६

एप्रिल - ५

मे - १२

जून - ११

ऑगस्ट - ११

सप्टेंबर - १७

ऑक्टोबर - २२

नोव्हेंबर - २५

डिसेंबर - २२

.........................

बॉक्स :

बसस्थानकात जाताय, मोबाईल सांभाळा!

गेल्या वर्षभरात म्हणजे २०२० मध्ये मोबाईल चोरीला गेल्याच्या सर्वाधिक घटना वाशिम बसस्थानकातच घडल्या आहेत. एस.टी.त चढताना आणि उतरताना गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरटे नागरिकांच्या खिशातील मोबाईल लंपास करीत आहेत. यासह सणासुदीच्यावेळी बाजारात जेव्हा नागरिकांची तोबा गर्दी होते, तेव्हाही मोबाईल चोरीच्या घटना सर्वाधिक प्रमाणात घडत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागरिकांनी मोबाईल सांभाळावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

..............

हरवले १९५, सापडले केवळ ७०

वर्षभरात एकूण १९५ मोबाईल हरवले किंवा चोरीला गेले आहेत. संबंधित नागरिकांनी तशी फिर्याद पोलीस स्टेशनला नोंदविली आहे. महत्प्रयासाने त्यातील ७० मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून अद्याप ११५ मोबाईलचा शोध लागलेला नाही. मोबाईलचा शोध घेणे, ही तुलनेने जिकरीची बाब असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे.

...............

कोट :

खिशात महागडे मोबाईल घेऊन फिरताना तो चोरी होऊ नये किंवा हरवू नये, याची काळजी स्वत: नागरिकांनाच घ्यावी लागणार आहे. मोबाईलचा शोध घेण्याकामी पोलीस कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करतात; मात्र त्यात बराच वेळ खर्ची घालावा लागतो. कधीकधी मोबाईलचा शोध घेण्यासाठी इतर राज्यातही जावे लागते. त्यामुळेच तपासाला वेळ लागतो.

- शिवाजी ठाकरे

पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम