शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

वाशिम तालुक्यात तीन दिवसांत आढळले ५२ कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:17 IST

वाशिम : वाशिम शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असून, गत तीन दिवसांत ५२ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग ...

वाशिम : वाशिम शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असून, गत तीन दिवसांत ५२ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने शनिवारी केले.

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. सप्टेंबर महिन्यापर्यंत वाशिम शहरात जवळपास १,८०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शहरवासीयांची चिंता वाढली होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सप्टेंबर महिन्यात व्यापाऱ्यांनी सात दिवस जनता कर्फ्यूही पाळला होता. दरम्यान, ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरला. वाशिम शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने नागरिक बिनधास्त झाले. बाजारपेठेत पुन्हा गर्दी वाढली आणि बहुतांश नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले. आता पुन्हा कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरवासीयांची चिंताही वाढली आहे. १७ ते १९ फेब्रुवारी या तीन दिवसांत वाशिम तालुक्यात ५२ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाला. यामध्ये ३६ रुग्ण वाशिम शहरातील तर उर्वरित १६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

०००००

बॉक्स

तीन दिवसांत एकूण रुग्ण आढळले - ५२

१७ फेब्रुवारी - १४

१८ फेब्रुवारी - १६

१९ फेब्रुवारी - २२

००००००

शहरात आढळले - ३६

ग्रामीण भागात आढळले - १६

००००००

बॉक्स

नागरिकांनी स्वत:बरोबरच इतरांचे आरोग्य जपावे

कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोव्हेंबर ते १६ फेब्रुवारीपर्यंत वाशिम येथील बाजारपेठ गर्दीने फुलली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरता नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, दुकानात एकाच वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये, दुकानात तापमापक व सॅनिटायझर ठेवण्यात यावे, या सूचनांकडे मध्यंतरी दुर्लक्ष झाले. आता गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जमावबंदीचा आदेश दिला. असे असतानाही पाटणी चौक व अन्य ठिकाणी नागरिकांची काही प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, स्वत:बरोबरच इतरांचे आरोग्य जपण्यासाठी नागरिकांनी आता तरी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करणे गरजेचे ठरत आहे.

००००