शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

अकृषक जमिनींच्या सातबारा पुनर्शोधनात वाशिम राज्यात अव्वल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 17:54 IST

वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेत जमिनींच्या पुनर्शोधन कार्यक्रम वाशिम जिल्ह्याने पूर्ण केला असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाने एकूण ८०९ गावांचे काम शुक्रवार २८ सप्टेंबर रोजीच पूर्ण केले आहे.  राज्य शासनाच्यावतीने आॅनलाईन कामकाज पद्धतीवर भर देण्यात येत असून, या ...

वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेत जमिनींच्या पुनर्शोधन कार्यक्रम वाशिम जिल्ह्याने पूर्ण केला असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाने एकूण ८०९ गावांचे काम शुक्रवार २८ सप्टेंबर रोजीच पूर्ण केले आहे.  

राज्य शासनाच्यावतीने आॅनलाईन कामकाज पद्धतीवर भर देण्यात येत असून, या अंतर्गत सर्वच कागदपत्रांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शेत जमिनींच्या सातबारांचे संगणकीकरण करून पुनर्शोधन प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता अकृषक झालेल्या जमिनींच्या सातबारांची पुनर्शोधन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात २९  सप्टेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार एकूण ८०९ गावांमधील अकृषक शेतजमिनींचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा वाशिम हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे. यापूर्वी शेत जमिनींच्या सातबारा पुनर्शोधनातही वाशिम जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करून महसूल प्रशासनाकडून प्रशस्तीपत्रक मिळविले होते. यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह जिल्हा विज्ञान आणि सूचना अधिकारी सागर हवालदार यांच्या मार्गदर्शनात महसूल प्रशासनाच्या सर्वच अधिकारी कर्मचाºयांनी अथक परिश्रम घेतले आहेत.