शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

अकृषक जमिनींच्या सातबारा पुनर्शोधनात वाशिम राज्यात अव्वल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 17:54 IST

वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेत जमिनींच्या पुनर्शोधन कार्यक्रम वाशिम जिल्ह्याने पूर्ण केला असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाने एकूण ८०९ गावांचे काम शुक्रवार २८ सप्टेंबर रोजीच पूर्ण केले आहे.  राज्य शासनाच्यावतीने आॅनलाईन कामकाज पद्धतीवर भर देण्यात येत असून, या ...

वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेत जमिनींच्या पुनर्शोधन कार्यक्रम वाशिम जिल्ह्याने पूर्ण केला असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाने एकूण ८०९ गावांचे काम शुक्रवार २८ सप्टेंबर रोजीच पूर्ण केले आहे.  

राज्य शासनाच्यावतीने आॅनलाईन कामकाज पद्धतीवर भर देण्यात येत असून, या अंतर्गत सर्वच कागदपत्रांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शेत जमिनींच्या सातबारांचे संगणकीकरण करून पुनर्शोधन प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता अकृषक झालेल्या जमिनींच्या सातबारांची पुनर्शोधन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात २९  सप्टेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार एकूण ८०९ गावांमधील अकृषक शेतजमिनींचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा वाशिम हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे. यापूर्वी शेत जमिनींच्या सातबारा पुनर्शोधनातही वाशिम जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करून महसूल प्रशासनाकडून प्रशस्तीपत्रक मिळविले होते. यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह जिल्हा विज्ञान आणि सूचना अधिकारी सागर हवालदार यांच्या मार्गदर्शनात महसूल प्रशासनाच्या सर्वच अधिकारी कर्मचाºयांनी अथक परिश्रम घेतले आहेत.