शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

अमरावती विभागात वाशिम द्वितीय

By admin | Updated: June 14, 2017 02:46 IST

वाशिम जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ८७.३७ टक्के निकाल : निकालात रिसोड तालुका आघाडीवर तर मालेगाव तालुका माघारलालोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ८७.३७ टक्के निकाल : निकालात रिसोड तालुका आघाडीवर तर मालेगाव तालुका माघारलालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याचा निकाल ८७.३७ टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.०२ तर मुलींची टक्केवारी ९०.४८ आहे. जिल्ह्यात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २९२ शाळांमधून २० हजार ९३२ विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली होती. यापैकी २० हजार ८१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ११ हजार ८७३ मुले व ८ हजार ९४३ मुलींचा समावेश आहे. यापैकी १८ हजार १८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये १० हजार ९४ मुले व ८ हजार ९२ मुलींचा समावेश आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.०२ तर मुलींची टक्केवारी ९०.४८ आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल रिसोड तालुक्याचा ९०.२५ टक्के तर सर्वात कमी निकाल मालेगाव तालुक्याचा ८४.४४ टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेतही रिसोड तालुक्याचाच सर्वाधिक निकाल होता, हे विशेष.वाशिम तालुक्यातील ६२ शाळांमधून ५१४६ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी ५०७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ४४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८७.९८ अशी आहे. मालेगाव तालुक्यातील ३३ शाळांमधून २७०७ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी २७०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २२८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८४.४४ अशी आहे. रिसोड तालुक्यातील ५५ शाळांमधून ४३३८ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी ४३१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ३८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ९०.२५ अशी आहे. कारंजा तालुक्यातील ५९ शाळांमधून ३५९३ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी ३५८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ३१११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८६.७५ अशी आहे. मंगरूळपीर तालुक्यातील ४३ शाळांमधून २८८९ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी २८८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २५२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८७.४३ अशी आहे आणि मानोरा तालुक्यातील ४० शाळांमधून २२५९ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी २२५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १९०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८४.८४ अशी आहे. जिल्ह्यातील २८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.जिल्ह्यात रिसोड तालुका अव्वलबारावीच्या परीक्षेत रिसोड तालुक्याचा निकाल जिल्ह्यात अव्वल होता. हीच परंपरा दहावीच्या निकालातही रिसोडने कायम राखली आहे. ५५ शाळांमधून ४३१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ३८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ९०.२५ अशी आहे. जिल्ह्यातील २.८४ टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याच्या वर गुण घेतले आहेत. ३.५९ टक्के विद्यार्थ्यांनी ८५ ते ९० टक्के दरम्यान, ५.३७ टक्के विद्यार्थ्यांनी ८५ ते ९० टक्के दरम्यान, ७.५६ टक्के विद्यार्थ्यांनी ७५ ते ८० टक्के दरम्यान, ९.७० टक्के विद्यार्थ्यांनी ७० ते ७५ टक्के दरम्यान, ११.७५ टक्के विद्यार्थ्यांनी ६५ ते ७० टक्के दरम्यान, १४.३० टक्के विद्यार्थ्यांनी ६० ते ६५ टक्के गुण घेतले आहेत. ३३.९५ टक्के विद्यार्थ्यांनी ४५ ते ६० टक्के दरम्यान गुण घेतले आहेत. वाशिम जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेतील पुनर्परीक्षार्थींचा निकाल ४५.६४ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील २९२ शाळांमधून ११५४ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षार्थी म्हणून नोंदणी केली होती. यापैकी ११४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ५२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही टक्केवारी ४५.६४ आहे. मुलींची उत्तीर्णची टक्केवारी ४७.२९ असून मुलांची टक्केवारी ४५.१७ अशी आहे.