शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामातील ५०टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 11:42 IST

Agriculture News : ५० टक्के क्षेत्रावर खरीपातील पेरण्या आटोपल्या असून काहीठिकाणी बिजही अंकुरल्याचे दिसून येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदा दरवर्षीच्या तुलनेत पाऊस अधिक प्रमाणात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तो बहुतांशी खरादेखिल ठरत आहे. सुरूवातीपासूनच दमदार पाऊस होत असून जिल्ह्यात १८ जूनपर्यंत ५० टक्के क्षेत्रावर खरीपातील पेरण्या आटोपल्या असून काहीठिकाणी बिजही अंकुरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असतो. त्यानुसार, यंदाही कृषी विभागाकडून पेरणीसाठी नियोजन करण्यात आलेल्या ४ लाख ६० हजार ४५० हेक्टर क्षेत्रापैकी अडीच लाखांपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत जिल्हाभर दमदार पाऊस झाल्याने पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे १७ आणि १८ जूनला पावसाने उघडिप दिल्याने शेतकऱ्यांकडून पेरणीला वेग देण्यात आल्याचे दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, १८ जूनअखेर २ लाख ३० हजार हेक्टरवर खरीपातील सोयाबीनसह इतर पिकांची पेरणी करण्यात आली असून येत्या तीन ते चार दिवसांत उर्वरित शेतकरीही पेरणीचे काम आटोपते घेण्याच्या मन:स्थितीत आहेत. 

यंदा सुरुवातीपासूनच दमदार पाऊस कोसळला. तसेच  जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला गती दिली आहे. १८ जूनअखेर सुमारे ५० टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली असून येत्या दोन ते तीन दिवसांत हे प्रमाण शंभर टक्क्यांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. - शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती