शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वाशिम जिल्हय़ात २५0 रोहित्र नादुरुस्त!

By admin | Updated: October 17, 2016 02:10 IST

महावितरणची हलगर्जी; सर्वसामान्यांसह शेतकरी हैराण.

वाशिम, दि. १६- जिल्हय़ात आजमितीस विविध कारणांमुळे तब्बल २५0 रोहित्र नादुरुस्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरीदेखील हैराण झाले आहेत. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे उद्भवलेली ही समस्या तत्काळ निकाली काढा, अशी मागणी जोर धरत आहे.गावठाण फिडरवरील तसेच शेतीला वीजपुरवठा करणार्‍या फिडरवरील रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार गत अनेक दिवसांपासून वाढीस लागले आहेत. निर्माणाधीन वीज उपकेंद्रांच्या प्रलंबित कामांमुळे कार्यान्वित असलेल्या रोहित्रांवर अतिरिक्त विजेचा भार पडत असल्यानेच ही समस्या उद्भवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हय़ात इन्फ्रा-२ या योजनेंतर्गत ५ वीज उपकेंद्रांची कामे होणार होती; मात्र त्यापैकी २ वर्षाच्या काळात तीन वीज उपकेंद्रच उभे राहू शकले. तेही विविध स्वरूपातील तांत्रिक अडचणींमुळे अद्याप सुरू झालेले नाहीत. मागणी अधिक आणि पुरवठा कमी, या प्रकारामुळे वीजपुरवठय़ात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. परिणामी, गावठाण फिडरवरील रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढीस लागले असून यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. तथापि, हिंदू संस्कृतीतील सर्वांत मोठा समजला जाणारा दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने महावितरणने नादुरुस्त असलेले रोहित्र बदलण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.