शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

वाशिम जिल्ह्यातील तलाठी कार्यालये वार्‍यावर

By admin | Updated: July 3, 2014 02:10 IST

धक्कादायक वास्तव : नागरिकांना नाहक हेलपाटे, प्रवास भाड्याचा भुर्दंड

वाशिम : सध्या पेरण्या व शाळा, महाविद्यालय प्रवेशाचे दिवस आहेत. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, पालक व विविध योजनांच्या लाभार्थ्यांना फेरफार, रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले आदींची तातडीची गरज आहे; परंतु कार्यालयीन वेळेत उघडी मिळतील ती तलाठी कार्यालये कसली, असा अनुभव जिल्हय़ातील बहुतांश तलाठी कार्यालयात कामानिमित्त जाणार्‍या ग्रामीण भागातील नागरिकांना येती. बुधवार २ जुलै रोजी जिल्हय़ातील २८0 तलाठी सज्जापैकी मंगरुळपीर,कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम व मानोरा तालुक्यातील काही सज्जाला टीम लोकमतने एकाचवेळी भेट दिली असता त्यात धक्कादायक वास्तव दिसून आले.बहुतांश तलाठी सज्जे चक्क कुलूपबंद आढळून आले. त्या परिसरात आपले काम होईल, या आशेने आलेले शेतकरी, नागरिक, विद्यार्थी येऊन कार्यालय बंद असल्याचे पाहून परत जात असल्याचे दिसून आले. काही तलाठी कार्यालये उघडी असली तरी काही कार्यालयात तलाठी जागेवर नसून काही खासगी रायटर तेथे येणार्‍या नागरिकांना तलाठय़ाने आधीच सहय़ा करुन ठेवलेले दाखले लिहून देताना दिसले.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शासकीय दस्ताऐवजच नव्हे तर संपूर्ण शासकीय कार्यालयच त्यांच्या ताब्यात असल्याचे आढळून आले.मालेगाव येथे तलाठी कार्यालय बंद असल्याचे आढळले. मंगरुळपीर शहरात व शेलूबाजार, पार्डीताड, कवठळ, आसेगाव येथे तलाठी कार्यालये कुलूपबंद होती. तालुक्यातील अनेक कार्यालयात दोन तीन तलाठी मिळून एक कार्यालय चालवित असल्याचे आढळले. विशेष म्हणजे दलाल दाखला देण्याची कामे करीत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. कारंजा शहरातील तहसील कार्यालय सुरु असले तरी उंबर्डा बाजार व अन्य गावात कार्यालये बंद असल्याचे आढळून आले.मानोरा शहरात तलाठी कार्यालय सुरु असून, तेथे मोठय़ा संख्येने नागरिक कामासाठी जमलेले दिसून आले. ग्रामीण भागातील चार पाच तलाठी मिळून जागा भाड्याने घेऊन कार्यालय चालवत असल्याचे; तसेच शहरात राहून घरुन कारभार चालवित असल्याचे लोकांकडून कळले. विशेष म्हणजे तलाठय़ाला कार्यालयासाठी भाड्याची विशिष्ट रक्कम मिळत असली तरी चार पाच जण मिळून कार्यालय का चालवतात, हे कोडेच बनले आहे. रिसोड तालुक्यात अनेक ठिकाणी तलाठय़ांची कार्यालयेच नसून तलाठय़ांच्या शहरातील घरातूनच कारभार चालत असल्याचे आढळले. त्यासाठी ग्रामस्थांना २0-२५ किमीचा प्रवास करुन तलाठय़ाची भेट न झाल्यास एसटी भाड्याचा दुहेरी भुर्दंड सोसावा लागत असल्याचे चित्र दिसून आले. वाशिम हे जिल्हय़ाचे मुख्यालय असल्याने जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी वाशिमलाच असल्याने येथील तलाठी कार्यालयात सर्व तलाठी काम करीत असल्याचे आढळून आले. सध्या संगणकावर शासकीय डाटा फिडींगचे काम सकाळी १0.३0 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु असल्यामुळे दररोज सकाळी १0.३0 ते दुपारी २.३0 दरम्यान तेथे नागरिकांची कामे केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.