शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील तलाठी कार्यालये वार्‍यावर

By admin | Updated: July 3, 2014 02:10 IST

धक्कादायक वास्तव : नागरिकांना नाहक हेलपाटे, प्रवास भाड्याचा भुर्दंड

वाशिम : सध्या पेरण्या व शाळा, महाविद्यालय प्रवेशाचे दिवस आहेत. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, पालक व विविध योजनांच्या लाभार्थ्यांना फेरफार, रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले आदींची तातडीची गरज आहे; परंतु कार्यालयीन वेळेत उघडी मिळतील ती तलाठी कार्यालये कसली, असा अनुभव जिल्हय़ातील बहुतांश तलाठी कार्यालयात कामानिमित्त जाणार्‍या ग्रामीण भागातील नागरिकांना येती. बुधवार २ जुलै रोजी जिल्हय़ातील २८0 तलाठी सज्जापैकी मंगरुळपीर,कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम व मानोरा तालुक्यातील काही सज्जाला टीम लोकमतने एकाचवेळी भेट दिली असता त्यात धक्कादायक वास्तव दिसून आले.बहुतांश तलाठी सज्जे चक्क कुलूपबंद आढळून आले. त्या परिसरात आपले काम होईल, या आशेने आलेले शेतकरी, नागरिक, विद्यार्थी येऊन कार्यालय बंद असल्याचे पाहून परत जात असल्याचे दिसून आले. काही तलाठी कार्यालये उघडी असली तरी काही कार्यालयात तलाठी जागेवर नसून काही खासगी रायटर तेथे येणार्‍या नागरिकांना तलाठय़ाने आधीच सहय़ा करुन ठेवलेले दाखले लिहून देताना दिसले.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शासकीय दस्ताऐवजच नव्हे तर संपूर्ण शासकीय कार्यालयच त्यांच्या ताब्यात असल्याचे आढळून आले.मालेगाव येथे तलाठी कार्यालय बंद असल्याचे आढळले. मंगरुळपीर शहरात व शेलूबाजार, पार्डीताड, कवठळ, आसेगाव येथे तलाठी कार्यालये कुलूपबंद होती. तालुक्यातील अनेक कार्यालयात दोन तीन तलाठी मिळून एक कार्यालय चालवित असल्याचे आढळले. विशेष म्हणजे दलाल दाखला देण्याची कामे करीत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. कारंजा शहरातील तहसील कार्यालय सुरु असले तरी उंबर्डा बाजार व अन्य गावात कार्यालये बंद असल्याचे आढळून आले.मानोरा शहरात तलाठी कार्यालय सुरु असून, तेथे मोठय़ा संख्येने नागरिक कामासाठी जमलेले दिसून आले. ग्रामीण भागातील चार पाच तलाठी मिळून जागा भाड्याने घेऊन कार्यालय चालवत असल्याचे; तसेच शहरात राहून घरुन कारभार चालवित असल्याचे लोकांकडून कळले. विशेष म्हणजे तलाठय़ाला कार्यालयासाठी भाड्याची विशिष्ट रक्कम मिळत असली तरी चार पाच जण मिळून कार्यालय का चालवतात, हे कोडेच बनले आहे. रिसोड तालुक्यात अनेक ठिकाणी तलाठय़ांची कार्यालयेच नसून तलाठय़ांच्या शहरातील घरातूनच कारभार चालत असल्याचे आढळले. त्यासाठी ग्रामस्थांना २0-२५ किमीचा प्रवास करुन तलाठय़ाची भेट न झाल्यास एसटी भाड्याचा दुहेरी भुर्दंड सोसावा लागत असल्याचे चित्र दिसून आले. वाशिम हे जिल्हय़ाचे मुख्यालय असल्याने जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी वाशिमलाच असल्याने येथील तलाठी कार्यालयात सर्व तलाठी काम करीत असल्याचे आढळून आले. सध्या संगणकावर शासकीय डाटा फिडींगचे काम सकाळी १0.३0 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु असल्यामुळे दररोज सकाळी १0.३0 ते दुपारी २.३0 दरम्यान तेथे नागरिकांची कामे केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.