शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

४५ हजार शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदानाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 12, 2017 01:42 IST

पणन संचालकांकडे प्रस्ताव : १४ कोटी ७९ लाखांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या निर्णयानुसार १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये बाजार समित्यांकडे सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये प्रमाणे अनुदान देण्याचे ठरले आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांसह तालुका सहायक निबंधकांनी प्रस्तावांची पडताळणी केल्यानंतर एकूण ४५ हजार ४३३ शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत पणन संचालकांकडे पाठविण्यात आले असून, या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी १४ कोटी ७९ लाख १३ हजार ५९२ रुपयांच्या अनुदानाची मागणी नोंदविण्यात आली आहे. या अनुदानाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. शासनाने मागील वर्षीच्या खरीप हंगामात बाजार समितीत १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये आणि कमाल २५ क्विंटल पर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भातील प्रस्ताव ३१ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांकडून मागवून जिल्हा उपनिबंधकांमार्फत पणन संचालकांकडे २८ फेब्रुवारीपर्यंत पाठविणे आवश्यक होते. याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून बाजार समित्या आणि तालुका सहायक निबंधकांना वारंवार सूचना देऊन प्रस्ताव तातडीने पाठविण्यास सांगण्यात आले. यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून तालुका सहायक निबंधक आणि तालुकास्तर समित्यांना १० पत्रे आणि ४ अतिरिक्त शासकीय पत्रेही पाठविण्यात आली. तथापि, त्यांच्याकडून विहित वेळेच्या आत सदर प्रस्तावांची छानणी करून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आले नाही, त्यामुळे पणन संचालकांकडून शासनाकडे निधीची मागणी नोंदविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास अपेक्षित रक्कम आणि प्रस्तावांची संख्या सादर करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सोयाबीन अनुदानासाठी अंदाजे १६ कोटी रुपयांची मागणीही नोंदविण्यात आली. आता जिल्हाभरातील सोयाबीन अनुदानाच्या प्रस्तावांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वीच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वच तालुक्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे प्रस्ताव पणन संचालक पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४५ हजार ४३३ शेतकरी अनुदानासाठी पात्र असून, या शेतकऱ्यांनी १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधित बाजार समित्यांकडे विकलेल्या एकूण ७ लाख ३९ हजार ५६७ क्विंटल ९६ किलो सोयाबीनच्या अनुदानासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला १४ कोटी ७९ लाख १३ हजार, ५९२ रुपयांच्या निधीची गरज आहे. जिल्हा उपनिबंधकांनी पाठविलेल्या प्रस्तावांची पडताळणी करून पणन संचालकांमार्फत शासनाकडे अनुदानासाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आणखीही विलंब लागणार असल्याने सोयाबीन अनुदानासाठी आणखी प्रतीक्षा करावीच लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाच्या निर्णयानुसार बाजार समित्यांमध्ये १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी अंतिम प्रस्ताव पणन संचालकांकडे पाठविले आहेत. या प्रस्तावांच्या पडताळणीची प्रक्रिया काळजीपूर्वक करणे आवश्यक होते. त्यामुळे तालुका स्तरावर विलंब लागला. - रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, वाशिम