शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

विकलेल्या तुरीच्या मोबदल्याची प्रतीक्षा!

By admin | Updated: May 29, 2017 01:15 IST

शेतकरी अडचणीत: शासकीय केंद्रांकडे २० दिवसांपासून धनादेश स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: चांगले दर मिळतात म्हणून शासकीश खरेदी केंद्रावर तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. के वळ हमीभावाच्या आशेपोटी तूर विकलेल्या शेतकऱ्यांना मालेगाव्या नाफेड केंद्राकडून गेल्या २० दिवसांपासून मोबदलाच मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे. मालेगाव तालुक्यातील वाघी बु.येथील भाऊराव गणपत वाघ यांच्यासह १५ ते २० शेतकऱ्यांनी ७ मे रोजी मालेगाव येथील शासकीय खरेदी केंद्रात जवळपास ७५० क्विंटल तूर विकली. या तुरीचे चुकारे चार पाच दिवसांत मिळतील, अशी आशा त्यांना होती. तथापि, आता २० दिवस उलटले तरी, या शेतकऱ्यांना तुरीच्या चुकाऱ्याचे धनादेशच मिळाले नाहीत. यंदा पावसाळा वेळपूर्वीच सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असताना शेतकऱ्यांच्या हाती पैसा असणे आवश्यक आहे; परंतु शेतमाल विकूनही वेळेवर पैसा मिळत नसल्याने शासन व्यवस्थेला शेतकरी कंटाळून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या २० दिवसांपूर्वी विकलेल्या तुरीचे चुकारे अद्याप मिळाले नाहीच आणि पुढे कधी मिळतील, तेसुद्धा निश्चित नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात पूर्वी नाफेडकडून, त्यानंतर महाराष्ट्र शासनाने स्वत:च्या संस्थेसह सहकारी संस्थांद्वारे तुरीची खरेदी केली. तथापि, खरेदीसाठी आवश्यक रकमेची तरतूद केली नाही. खरीप हंगामाचे नियोजन बारगळण्याची भितीशासनाने शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने शासकीय तुरीची शासकीय खरेदी सुरू केली; परंतु त्यासाठी आवश्यक ते नियोजन केले नाही. त्यामुळे या खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी नुकसानच झाले. वेळोवेळी खरेदीचे स्वरूप बदलणे, संथगतीने मोजणी करणे आणि मोजलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर न देणे या सर्व गोष्टींमुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. आता महिन्याच्या सुरूवातीला विकलेल्या तुरीचे पैसे अद्यापही न मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ऐन आठवडाभरावर आलेल्या खरीप हंगामाचे नियोजनच बारगळण्याची भिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांनी विकलेल्या तुरीचे चुकारे अदा करणे आवश्यक झाले आहे.