शहरं
Join us  
Trending Stories
1
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
2
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
3
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
4
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
5
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
6
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
7
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
8
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
9
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
10
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
11
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
12
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
13
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
14
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
15
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
16
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
17
"अभिनेत्यांना सकाळी डाएट फुड अन् रात्री ड्रग्स हवे", पहलाज निहलानींचा खुलासा; अक्षयबद्दल म्हणाले...
18
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
19
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
20
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!

१९0 लाभार्थ्यांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा

By admin | Updated: June 4, 2014 01:24 IST

तालुक्यातील लाभार्थ्यांना ३0 लक्ष ८६ हजार ६00 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

मालेगाव: विविध रोगराईपासून आरोग्य रक्षण व स्वच्छतेच्या संदेशाचा प्रसारासाठी पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद वाशिम निर्मल भारत अभियानांतर्गत फेब्रुवारी २0१४ ते मे २0१४ पर्यंत ६७१ लाभार्थ्यांना प्रत्येकी ४६00 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता म्हणून वाटल्या गेला. जवळजवळ तालुक्यातील लाभार्थ्यांना ३0 लक्ष ८६ हजार ६00 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. गावोगावी स्वच्छता नांदावी, गावातील घाण दूर व्हावी याकरिता ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत प्रोत्साहन म्हणून शौचालय बांधण्याकरिता किंवा बांधल्यानंतर कमी जास्त प्रमाणात निधीचे वाप करण्यात येत होते. आता निर्मल भारत अभियान नावाने ही योजना सुरू असून, २0१२-१३ च्या पायाभूत सर्व्हेनुसार लाभार्थ्यांना लाभ दिल्या जात आहे. गावातील लोक उघड्यावर शौचास बसतात. त्या विष्ठेपासून मानवास ५0 प्रकारचे विविध आजार होण्याची भीती असते . पोलिओ, कावीळ जीवाणूपासून अतिसार, कॉलरा, हगवण, गॅस्ट्रो, विषमज्वर आमांश, आतड्याचे आजार होतात. त्यामुळे लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन त्यांना वापराची सवय लावणे याकरिता शासन प्रयत्नशील आहे. लोकांनी शौचालय वापरले, तर आत्मसन्मान राखला जातो. सामाजिक प्रतिष्ठा उंचावते. स्त्रियांची होणारी कुचंबना टाळल्या जाते. लोकांचा वेळ वाचतो. त्या संडासवर बायोगॅस बसवल्यास ऊर्जेची बचत होते व निर्मल ग्राम पुरस्कारासाठी गावाची निवड होते. आदी आदी फायदे लोकांच्या लक्षात आणून दिल्या जातात. त्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, शेतमजूर, भूमिहीन शेतमजूर, शारीरिक अपंग, महिला कुटुंबप्रमुख असलेल्यांना याचा लाभ दिल्या जातो. मालेगाव तालुक्यात ८४ ग्रामपंचायतीअंतर्गत ११५ गावातील लोकांचा पायाभूत सर्व्हे करण्यात आला. त्यावेळी ३५४७ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २१५३ लोकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. त्यामधील संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करणार्‍या ६७१ लोकांना याचा प्रत्यक्ष प्रोत्साहन भत्त्याची रक्कम चेकद्वारे वाटण्यात आली. अद्यापही १९0 लोकांच्या प्रस्तावाची जुळवाजुळव सुरू असून, योग्य नमुन्यात प्रस्ताव दिल्यास त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत ४६00 प्रोत्साहन भत्ता व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी (एमआरजीएस) अंतर्गत ५४00 रुपये असे एकूण १0 हजार रुपयांचे वाटप होत असते. सदर अनुदान वाटपाला फेब्रुवारी १४ पासून सुरुवात झाली असून, आजपर्यंत ३0 लाख ८६ हजार ६00 रुपयांचे वाटप केले आहे. तालुक्यात गटविकास अधिकारी संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम कांबळे, गटसमन्वयक रवी पडघान, सुखदेव पडघान, ज्ञानेश्‍वर महल्ले, विलास मोरे हे कर्मचारी गती देण्याचे काम करत आहेत.