शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मालेगावातील बायपासची प्रतिक्षा संपेना; काम अडकले लालफितशाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 15:11 IST

मालेगाव: शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी २०१०-११ मध्ये तत्कालीन आमदार दिवंगत सुभाषराव झनक यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या नवीन बसस्थानक ते शेलुफाटा या वळण मार्गाचे (बायपास) अद्यापही सुरू झाले नाही.

ठळक मुद्देकोला येथून हैद्राबाद, हिंगोली, नांदेड, वाशिम, परभणीकडे जागणाºया वाहनांसाठी अकोला रस्त्यावरून अकोला रस्त्यावर नागरदास मार्गे शेलुफाटा अशी वाहतूक वळती केल्या गेली.   या बायपासला मंजुरी मिळून तत्कालीन राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते या बायपास रस्त्याच्या कामाचे भूमीपुजनही झाले; परंतु कामाचा अद्यापही प्रारंभसुद्धा झाला नाही.

- शंकर वाघ मालेगाव: शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी २०१०-११ मध्ये तत्कालीन आमदार दिवंगत सुभाषराव झनक यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या नवीन बसस्थानक ते शेलुफाटा या वळण मार्गाचे (बायपास) अद्यापही सुरू झाले नाही. अकोला-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट या बायपासचे काम होणार कधी, ही प्रतिक्षा वाहनधारकांसह नागरिकांना लागली आहे.मालेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी शेलूफाटा रस्त्यावर तहसील कार्यालय, विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, तसेच याच रस्त्याच्या परिसरात वीज वितरण कार्यालय असून, पंचाय समिती, ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारे मार्ग आणि बसस्थानक असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच काही वर्षांपूर्वी अकोला येथून हैद्राबाद, हिंगोली, नांदेड, वाशिम, परभणीकडे जागणाºया वाहनांसाठी अकोला रस्त्यावरून अकोला रस्त्यावर नागरदास मार्गे शेलुफाटा अशी वाहतूक वळती केल्या गेली.  त्यामुळे आधीच वाहनांची वर्दळ असलेल्या मार्गावर वाहनांची संख्या वाढली आणि तहसील कार्यालय व बसस्थानकासमोर वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली. वाहनांची वाढलेली संख्या आणि त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी धोकादायक ठरत आहे. त्यातच नवरात्री उत्सवानिमित्त जगदंबा देवीच्या दर्शनासाठी मालेगाव ते नागरदास या मार्गावर हजारो भाविक सकाळी ४.३० वाजतापासून पायदळ जात असतात. यामुळे नागरदास-अमानी या प्रस्तावित बायपासचे काम होणे आवश्यक आहे. साधारण ८ वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार दिवंगत सुभाष झनक यांच्या प्रयत्नांमुळे या बायपासला मंजुरी मिळून तत्कालीन राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते या बायपास रस्त्याच्या कामाचे भूमीपुजनही झाले; परंतु या रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच हा रस्ता अकोला-हैद्राबाद या महामार्गात समाविष्ट करण्यात आला आणि कामाचे अधिकार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे आले. तेव्हापासून या रस्त्याच्या कामाचा अद्यापही प्रारंभसुद्धा झाला नाही. अद्यापही मार्गावर दरदिवशी शेकडो वाहने धावत असून, भरधाव वाहनांमुळे अपघाताची भिती निर्माण झाली असतानाही या रस्त्याचे काम करण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :Malegaonमालेगांवroad transportरस्ते वाहतूक