शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

खड्डे दिसण्यासाठी ग्रामस्थांनी उभारले ‘झेंडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:33 IST

नागपूर ते औरंगाबाद या महामार्गाची अशक्ष: चाळण झाली असून, खड्डे चुकवताना झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. तरीही या ...

नागपूर ते औरंगाबाद या महामार्गाची अशक्ष: चाळण झाली असून, खड्डे चुकवताना झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. तरीही या मार्गाच्या दुरुस्तीचे भिजत घोंगडे कायम आहे. मालेगाव येथून रस्त्याचे काम सुरू झाल्याचे दिसून येत असले तरी आधे खड्डे बुजविणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. खड्ड्याचा आकार माेठा असल्याने वाहनाचे संपूर्ण चाक त्या खड्ड्यांमध्ये जात आहे.

वाशिम जिल्ह्यातून जाणारा नागपूर ते औरंगाबाद हा मुंबईला जोडणारा अतिशय कमी अंतराचा महामार्ग आहे. रात्रंदिवस या महामार्गावरून लहान मोठ्या वाहनांची येऱ्जा सुरू असते; मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली असून, शेलूबाजार ते मालेगावदरम्यान या मार्गाची अशक्षः चाळण झाली आहे. जागोजागी मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे. नव्हेतर प्रत्यक्ष मृत्यूला आमंत्रण ठरत आहे. या रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात आजपर्यंत अनेक वाहनचालक व प्रवाशांचा बळी गेला आहे. अनेकांना अपंगत्व आले आहे. आमदार, खासदार, मंत्री साहेब किती लोकांचा बळी गेल्यावर या महामार्गाची दुरुस्ती करणार, असा प्रश्न वाहनचालक व प्रवाशांमधून उपस्थित केल्या जात आहे. तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक काम प्रगतिपथावर असल्याचे सांगत आहेत. याबाबत राेष व्यक्त केला जात आहे.