शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

खड्डे दिसण्यासाठी ग्रामस्थांनी उभारले ‘झेंडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:33 IST

नागपूर ते औरंगाबाद या महामार्गाची अशक्ष: चाळण झाली असून, खड्डे चुकवताना झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. तरीही या ...

नागपूर ते औरंगाबाद या महामार्गाची अशक्ष: चाळण झाली असून, खड्डे चुकवताना झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. तरीही या मार्गाच्या दुरुस्तीचे भिजत घोंगडे कायम आहे. मालेगाव येथून रस्त्याचे काम सुरू झाल्याचे दिसून येत असले तरी आधे खड्डे बुजविणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. खड्ड्याचा आकार माेठा असल्याने वाहनाचे संपूर्ण चाक त्या खड्ड्यांमध्ये जात आहे.

वाशिम जिल्ह्यातून जाणारा नागपूर ते औरंगाबाद हा मुंबईला जोडणारा अतिशय कमी अंतराचा महामार्ग आहे. रात्रंदिवस या महामार्गावरून लहान मोठ्या वाहनांची येऱ्जा सुरू असते; मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली असून, शेलूबाजार ते मालेगावदरम्यान या मार्गाची अशक्षः चाळण झाली आहे. जागोजागी मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे. नव्हेतर प्रत्यक्ष मृत्यूला आमंत्रण ठरत आहे. या रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात आजपर्यंत अनेक वाहनचालक व प्रवाशांचा बळी गेला आहे. अनेकांना अपंगत्व आले आहे. आमदार, खासदार, मंत्री साहेब किती लोकांचा बळी गेल्यावर या महामार्गाची दुरुस्ती करणार, असा प्रश्न वाहनचालक व प्रवाशांमधून उपस्थित केल्या जात आहे. तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक काम प्रगतिपथावर असल्याचे सांगत आहेत. याबाबत राेष व्यक्त केला जात आहे.