शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

समृद्धीच्या वाहनाने पुलाला पडले भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:46 IST

राजुरा : परिसरातून गेलेल्या समृद्धी तथा अकोला-नांदेड महामार्गाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या गौण खनिज वाहतुकीच्या जड वाहनांमुळे ...

राजुरा : परिसरातून गेलेल्या समृद्धी तथा अकोला-नांदेड महामार्गाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या गौण खनिज वाहतुकीच्या जड वाहनांमुळे राजुरा रिधोरा रस्त्यावरील बेंदाडी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने हा पूल अपघातास निमंत्रण बनला आहे.

गत पाच-सहा महिन्यांपासून खैरखेडा-रिधोरा रस्त्यावरून समृद्धी तथा अकोला-नांदेड महामार्ग निर्मितीसाठी लागणाऱ्या गौण खनिजाची वाहतूक क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात टिप्परद्वारा सुरू आहे. परिणामी या मार्गावरील बेंदाडी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने पुलावर जबर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गत दहा वर्षांपूर्वी लाखोंचा निधी खर्च करून या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, महामार्ग निर्मितीच्या वाहनाने पुलाची वाट लागल्याने रस्त्यावरून जड वाहतूक पूर्णत: बंद पडली आहे तर जड वाहनांमुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था बघता नागरिकांचा रोष निर्माण होऊ नये म्हणून संबंधितांनी रस्त्यावरील खड्ड्यांत थातूरमातूर प्रमाणात मुरूम टाकून मलमपट्टी केल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहनचालकाला खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकदा या मार्गावर अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत, तर गौण खनिजाची वाहतूक करणारे चारचाकी वाहनसुद्धा रस्त्याच्या कडेला पलटी झालेले आहेत. या मार्गावरून राजुरासह सुदी, अनसिंग, सुकांडा, खैरखेडा आदी गावांतील शेकडोंच्या संख्येने दुचाकी तथा चारचाकी वाहने ये-जा करतात. रस्त्याची झालेली दयनीय अवस्था बघता राजुरा ग्रामस्थांनी महिनाभरापूर्वी गौण खनिजाची वाहतूक करणारी वाहने अडवून एक दिवस वाहतूक बंद केली होती. तेव्हा संबंधितांनी रस्त्याची डागडुजी करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते, मात्र त्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यात केवळ मातीमिश्रित मुरूम टाकून मलमपट्टी केली तर आता रस्त्याच्या नदीवरील मुख्य पुलाचीच तोडफोड केल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

...........

गौण खनिजाची वाहने कुरळामार्गे वळवली

बेंदाडी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरून आता जड वाहतूक करणे अशक्य असल्याने महामार्ग निर्मितीच्या कामासाठी गौण खनिजाची वाहतूक करणारी वाहने कुरळामार्गे वळवली आहेत. हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून कमकुवत असल्याने यासुद्धा रस्त्याची वाट लागणार असल्याने कुरुळा ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

......

महामार्ग निर्मितीच्या जड वाहतुकीमुळे रिधोरा-खैरखेडा रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेचा अहवाल यापूर्वीसुद्धा अनेकदा वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. आज या मार्गावरील पुलाच्या झालेल्या तोडफोडीची पाहणी करून अहवाल तत्काळ वरिष्ठांना सादर करण्यात येईल.

- डी. सी. खारोले,

उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मालेगाव

महामार्ग निर्मितीच्या कामासाठी लागणाऱ्या गौण खनिज वाहतुकीच्या वाहनामुळे राजुरा रिधोरा रस्त्यावरील पुलाची तोडफोड झाली आहे, शिवाय रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे व तुटलेल्या पुलामुळे जबर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण रस्त्याच्या दुरुस्तीची गरज आहे.

- आरती प्रकाश बोरजे,

सदस्या, ग्रामपंचायत, राजुरा