शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भाजीपाला क्षेत्रफळ दुप्पट !

By admin | Updated: December 4, 2015 02:52 IST

वाशिम जिल्हय़ातील भाजीपाला क्षेत्रफळात गत चार वर्षात दुपटीने वाढ ; मात्र यावर्षी मात्र अल्प पावसाने भाजीपाला लागवडीत व्यत्यय.

संतोष वानखडे / वाशिम: पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकरी नानाविध प्रयोग करीत आहेत. या प्रयोगातूनच रब्बी हंगामात जिल्हय़ातील भाजीपाला क्षेत्रफळात गत चार वर्षात दुपटीने वाढ झाली. यावर्षी मात्र अल्प पावसाने भाजीपाला लागवडीत व्यत्यय निर्माण केला. विविध कारणांमुळे शेती करणे परवडेनासे झाल्याचा सूर शेतकरीवर्गातून निघ त आहे. ्रपारंपरिक पिकांबरोबरच फळबाग, भाजीपाला आदी उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नातूनच रब्बी हंगामात जिल्ह्यातील भाजीपाला लागवडीखालील क्षेत्रफळात वाढ होत असल्याचे दिसून येते. सन २0११-१२ मध्ये जिल्ह्यातील १३६४ हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. यामध्ये सर्वाधिक लागवड वाशिम तालुक्यात ३२२ हेक्टर तर त्याखालोखाल मंगरुळपीर तालुक्यात ३0५ आणि सर्वात कमी कारंजा तालु क्यात ११८ हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. सन २0१२-१३ मध्ये भाजी पाल्याखालील लागवड क्षेत्रफळात वाढ होऊन ते २१३0 हेक्टरवर पोहोचले. वाशिम तालुक्यात ५00 व मंगरुळपीर तालुक्यात ४५0 हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. सन २0१४-१५ मध्ये २२२५ हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. यावर्षी वाशिम तालुक्यात भाजीपाला लागवडीचे क्षेत्रफळ घटले आणि मानोरा तालुक्यात अनपेक्षित भाजीपाल्याखालील क्षेत्रफळात वाढ झाली. मानोरा तालुक्यात ४१0 हेक्टरवर तर वाशिम व रिसोड तालुक्यात प्रत्येकी ३५0 हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. सन २0१५-१६ या वर्षात २५00 हेक्टरवर भाजीपाला लागवडीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला; मात्र यावर्षीचा अल्प पाऊस आणि नादुरूस्त विद्युत रोहित्रामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीकडे फारसे धजावत नसल्याचे सद्यस्थितीत दिसून येते. सध्या १४00 हेक्टरपर्यंत भाजीपाला लागवड झाली आहे. पाणी असूनही वीजपुरवठा सुरळीत नसणे, काही ठिकाणी जलसाठय़ातील घट, विद्युत रोहित्र नादुरूस्त, जादा भारनियमन आदी कारणांमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी यावर्षी अडचणीत सापडले आहेत. परिणामी, यावर्षी भाजीपाला लागवड स्थिर राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात कारंजा तालुक्यात सर्वात कमी तर वाशिम तालुक्यात सर्वात जास्त भाजीपाला लागवड होत असल्याचे आकडेवारी सांगते. कारंजा तालुक्यात ५८0, मालेगाव तालुका ७६८, मंगरुळपीर तालुका ११0५, मानोरा तालुका १0८९, रिसोड तालुका ८६१ आणि वाशिम तालुक्यात सर्वाधिक ११७२ हे क्टरवर गत तीन वर्षात भाजीपाला लागवड झाली.

*यावर्षी संकट

दरवर्षी भाजीपाला लागवडीखालील क्षेत्रफळात वाढ होत असल्याचे दिसून ये ते. यावर्षी विविध कारणांमुळे भाजीपाल्याचे क्षेत्रफळ स्थिर राहण्याचा अंदाज आहे. भाजीपाला उत्पादनातून आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न शे तकरी करीत आहेत. शेतकर्‍यांसाठी भाजीपाल्याची बाजारपेठ उपलब्ध असणे गरजेचे आहे. यामुळे भाजीपाल्याचा चांगला बाजारभाव मिळू शकेल, यात शंका नाही.