शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला क्षेत्रफळ दुप्पट !

By admin | Updated: December 4, 2015 02:52 IST

वाशिम जिल्हय़ातील भाजीपाला क्षेत्रफळात गत चार वर्षात दुपटीने वाढ ; मात्र यावर्षी मात्र अल्प पावसाने भाजीपाला लागवडीत व्यत्यय.

संतोष वानखडे / वाशिम: पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकरी नानाविध प्रयोग करीत आहेत. या प्रयोगातूनच रब्बी हंगामात जिल्हय़ातील भाजीपाला क्षेत्रफळात गत चार वर्षात दुपटीने वाढ झाली. यावर्षी मात्र अल्प पावसाने भाजीपाला लागवडीत व्यत्यय निर्माण केला. विविध कारणांमुळे शेती करणे परवडेनासे झाल्याचा सूर शेतकरीवर्गातून निघ त आहे. ्रपारंपरिक पिकांबरोबरच फळबाग, भाजीपाला आदी उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नातूनच रब्बी हंगामात जिल्ह्यातील भाजीपाला लागवडीखालील क्षेत्रफळात वाढ होत असल्याचे दिसून येते. सन २0११-१२ मध्ये जिल्ह्यातील १३६४ हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. यामध्ये सर्वाधिक लागवड वाशिम तालुक्यात ३२२ हेक्टर तर त्याखालोखाल मंगरुळपीर तालुक्यात ३0५ आणि सर्वात कमी कारंजा तालु क्यात ११८ हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. सन २0१२-१३ मध्ये भाजी पाल्याखालील लागवड क्षेत्रफळात वाढ होऊन ते २१३0 हेक्टरवर पोहोचले. वाशिम तालुक्यात ५00 व मंगरुळपीर तालुक्यात ४५0 हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. सन २0१४-१५ मध्ये २२२५ हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. यावर्षी वाशिम तालुक्यात भाजीपाला लागवडीचे क्षेत्रफळ घटले आणि मानोरा तालुक्यात अनपेक्षित भाजीपाल्याखालील क्षेत्रफळात वाढ झाली. मानोरा तालुक्यात ४१0 हेक्टरवर तर वाशिम व रिसोड तालुक्यात प्रत्येकी ३५0 हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. सन २0१५-१६ या वर्षात २५00 हेक्टरवर भाजीपाला लागवडीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला; मात्र यावर्षीचा अल्प पाऊस आणि नादुरूस्त विद्युत रोहित्रामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीकडे फारसे धजावत नसल्याचे सद्यस्थितीत दिसून येते. सध्या १४00 हेक्टरपर्यंत भाजीपाला लागवड झाली आहे. पाणी असूनही वीजपुरवठा सुरळीत नसणे, काही ठिकाणी जलसाठय़ातील घट, विद्युत रोहित्र नादुरूस्त, जादा भारनियमन आदी कारणांमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी यावर्षी अडचणीत सापडले आहेत. परिणामी, यावर्षी भाजीपाला लागवड स्थिर राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात कारंजा तालुक्यात सर्वात कमी तर वाशिम तालुक्यात सर्वात जास्त भाजीपाला लागवड होत असल्याचे आकडेवारी सांगते. कारंजा तालुक्यात ५८0, मालेगाव तालुका ७६८, मंगरुळपीर तालुका ११0५, मानोरा तालुका १0८९, रिसोड तालुका ८६१ आणि वाशिम तालुक्यात सर्वाधिक ११७२ हे क्टरवर गत तीन वर्षात भाजीपाला लागवड झाली.

*यावर्षी संकट

दरवर्षी भाजीपाला लागवडीखालील क्षेत्रफळात वाढ होत असल्याचे दिसून ये ते. यावर्षी विविध कारणांमुळे भाजीपाल्याचे क्षेत्रफळ स्थिर राहण्याचा अंदाज आहे. भाजीपाला उत्पादनातून आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न शे तकरी करीत आहेत. शेतकर्‍यांसाठी भाजीपाल्याची बाजारपेठ उपलब्ध असणे गरजेचे आहे. यामुळे भाजीपाल्याचा चांगला बाजारभाव मिळू शकेल, यात शंका नाही.