शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

सिंचनासाठी पाणी वापरावर सक्तीने बंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:52 IST

वाशिम: जिल्ह्यात यंदा ७० टक्के पर्जन्यमान झाल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसून जिल्ह्यातील कुठल्याच प्रकल्पाची पाणीपातळी २५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेली नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता सिंचनासाठी पाणी वापरावर सक्तीने बंदी लादण्यात आली आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर काहीअंशी मात करता यावी, यासाठी सर्वच प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

ठळक मुद्देप्रशासनाचा निर्णयप्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी ठेवले राखून

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदा ७० टक्के पर्जन्यमान झाल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसून जिल्ह्यातील कुठल्याच प्रकल्पाची पाणीपातळी २५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेली नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता सिंचनासाठी पाणी वापरावर सक्तीने बंदी लादण्यात आली आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर काहीअंशी मात करता यावी, यासाठी सर्वच प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात जून २०१७ या महिन्यापासून अधूनमधून पाऊस कोसळलाही; परंतू पुरसदृष स्थिती एकदाही उद्भवली नाही. वाहता पाऊस न झाल्यामुळे नदी-नाले-ओढे, सिंचन प्रकल्पांमध्ये फारच अल्प प्रमाणात पाण्याचा शिरकाव झाला. परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून आगामी डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यापासून जिल्हाभरात भीषण पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत मिळत आहेत. ही बाब लक्षात घेवून आतापासूनच नियोजनाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १२२ लघू अशा सर्वच सिंचन प्रकल्पांमधील पाणी पिण्याकरिता राखून ठेवण्यात आले आहे.