शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाने १५ मिनिटात उरकला पाहणी दौरा

By admin | Updated: December 16, 2014 00:10 IST

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त इरळा गावाची पहाणी.

मालेगाव (वाशिम) : दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक रविवारी राज्यात दाखल झाले. जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर केंद्रीय पथक मालेगाव तालुक्यातील इरळा गावात रात्री ७ वाजताच्या सुमारास दाखल झाले. रात्रीच्या वेळी गाड्यांच्या प्रकाशातच केंद्रीय पथकाने पाहणी दौरा अवघ्या १५ मिनिटामध्ये आटोपला. यावर्षीच्या कोरड्या दुष्काळाने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. संकटात अडकलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यापूर्वी केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली जाते. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक सोमवार, १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जिल्हा दौर्‍यावर येणार होते. मालेगाव तालुक्यातील इरळा येथे या पथकाकडून पाहणी दौरा व शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यात येणार होत्या. त्यामुळे सायंकाळी ५ वाजतापासूनच पथक कधी येणार, याची प्रतीक्षा सुरू होती. इरळा परिसरातील शेतकरी बहुसंख्येने गावात जमले होते. जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकारी-कर्मचार्‍यांचा ताफाही तैनात होता. अखेर रात्री ७ वाजताच्या सुमारास पथकाचे आगमन झाले. इरळा येथील सत्यनारायण लाहोटी यांच्या शेतात जाऊन पथकातील सदस्यांनी सोयाबीन व तूर पिकाची माहिती घेतली. या पथकात सिन्हा, विभागीय कृषी आयुक्त सरदार, जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर, तहसीलदार जे.आर. विधाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण आदींचा समावेश होता. पथक गावात येताच शेतकर्‍यांनी या पथकाला घेराव घातला. शेतीबाबतच्या व्यथा मांडल्या. दरवर्षी साधारणत: एकरी पाच ते सहा क्विंटल सोयाबीन होते. यावर्षी मात्र ८५ किलो तर कुठे एक क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पादन मिळाले, असे शेतकर्‍यांनी सांगितले. अवघ्या १५ मिनिटात पाहणी करून सदर पथक कारंजाकडे रवाना झाले. वाई आणि धोत्रा येथेही या पथकाने पाहणी केली. या पथकाकडून नंतर केंद्र सरकारकडे दुष्काळी परिस्थितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. *शेतात गाड्यांच्या लाईटाद्वारे पथकाची पाहणीदुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले केंद्रीय पथक सोमवारी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील इरळा येथे अंधार पडल्यानंतर दाखल झाले. आता पाहणी कशी करावी म्हणून पथकात असलेल्या गाड्यांचा ताफा एका रांगेत उभा केला व शेतात उजेड पाडून पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी चातकासारखी पथकाची वाट पाहत होते. ते जेव्हा आले तेव्हा अनेक शेतकरी ह्यआता अंधारात काय पाहताह्ण, असे बोलले. तेवढय़ातच यांनी वरीलप्रमाणे पाहणी केल्याबरोबर येथे उपस्थित तरूण शेतकर्‍यांनी ह्यव्हॉट अँन आयडियाह्ण म्हटल्याबरोबर एकच हशा पिकला.