शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बेसुमार उपसा; जलसाठ्यात घट!

By admin | Updated: March 3, 2017 00:47 IST

मालेगावचा पाणीप्रश्न होणार गंभीर : कुरळा प्रकल्पाचा पाणीसाठा १५ टक्क्यांवर!

मालेगाव, दि.२ - रब्बी हंगामातील पिकांसाठी जलप्रकल्पांमधून पाण्याचा बेसुमार उपसा झाल्याने जलसाठ्यात प्रचंड घट झाली आहे. मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या कुरळा प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मार्चच्या अखेरपासूनच शहराचा पाणीप्रश्न गंभीर होण्याचे संकेत मिळत आहेत.तालुक्यातील तलावांमधील जलसाठ्यातील अवैध पाणी उपशामुळे कमालीची घट झाली आहे. त्यामुळे मालेगाव शहरासह तालुक्यात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यातील देवठाणा, गांगलवाडी, रेगाव, डोंगरकिन्ही, तरोडी आदी गावांमध्ये आतापासून पाणीटंचाई पेटल्यागत स्थिती उद्भवली आहे. मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पावरून सुरू असलेल्या अवैध पाणी उपशामुळे या तलावातील जलसाठा कमी झाला असून, तो सध्या १५ टक्के एवढा आहे. या तलावात जास्त जलसाठा उपलब्ध असतानाच पाणी उपशावर बंदी आणावयास हवी. मात्र, बेसुमार पाणी उपसा सुरू असताना वीज वितरण कंपनी व पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. बोरगाव लघू पाटबंधारे प्रकल्पामध्ये सध्या मृत जलसाठ्यापेक्षाही कमी जलसाठा शिल्लक राहिला आहे. ब्राह्मणवाडा लघुपाटबंधारे प्रकल्पामध्येही मृत जलसाठा आहे. सुदी लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये सध्या ४४.८९ टक्के जलसाठा असून, सुकांडा लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये, तर केवळ १.८५ टक्के जलसाठा आहे. सोनखास लघू पाटबंधारे प्रकल्पामध्ये सध्या ६६ टक्के जलसाठा आहे. कोल्ही लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये ८.९१ टक्के जलसाठा आहे. तालुक्यातील बहुतांश तलावात कमी जलसाठा असल्याने अल्पावधीतच पाणीप्रश्न गंभीर होणार असून, १० पेक्षा अधिक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.