शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कारंजा तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका

By admin | Updated: February 12, 2015 00:50 IST

शेतकरी हवालदिल शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान.

कारंजा लाड (वाशिम) : वादळी वारा व अवकाळी पावसाचा कारंजा व मानोरा तालुक्यातील रब्बी पीक व फळबागांना मंगळवारच्या मध्यरात्री पुन्हा फटका बसला. या नैसर्गिक प्रकोपात अनेक गावातील विद्युत पोल, झाडे जमिनीवर कोसळली, तर घरावरील टिनपत्रे उडून गेले. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.मंगळवारच्या मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तसेच काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा, भाजीपाला व फळबागांचे अतोनात नुकसान झाले. याशिवाय तालुक्यातील अनेक गावात रस्त्यावरील झाडे जन्मळून पडली. तसेच वीज वितरण कंपनीचे पोल वाकले, तर काहींच्या घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने प्रचंड धांदल उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार, गायवळ, किनखेड येथे गारपीट झाली. ज्यामध्ये गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी, पपई, आंब्याचा बहर आदींचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे येथील नीता रजेश हवा यांच्या शेतातील ऊस, गहू, डाळिंब पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. २0१५ या वर्षाची सुरुवातही वादळी वारा व अवकाळी पावसाने झाली. १ जानेवारीला तालुक्यात अवकाळी पावसाने हैदोस घालून शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. आता फेब्रुवारी महिन्यातही हेच संकट शेतकर्‍यांवर दुसर्‍यांदा ओढवल्याने शेतकरी अतिशय हताश झाला आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.