शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कारंजा तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका

By admin | Updated: February 12, 2015 00:50 IST

शेतकरी हवालदिल शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान.

कारंजा लाड (वाशिम) : वादळी वारा व अवकाळी पावसाचा कारंजा व मानोरा तालुक्यातील रब्बी पीक व फळबागांना मंगळवारच्या मध्यरात्री पुन्हा फटका बसला. या नैसर्गिक प्रकोपात अनेक गावातील विद्युत पोल, झाडे जमिनीवर कोसळली, तर घरावरील टिनपत्रे उडून गेले. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.मंगळवारच्या मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तसेच काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा, भाजीपाला व फळबागांचे अतोनात नुकसान झाले. याशिवाय तालुक्यातील अनेक गावात रस्त्यावरील झाडे जन्मळून पडली. तसेच वीज वितरण कंपनीचे पोल वाकले, तर काहींच्या घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने प्रचंड धांदल उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार, गायवळ, किनखेड येथे गारपीट झाली. ज्यामध्ये गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी, पपई, आंब्याचा बहर आदींचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे येथील नीता रजेश हवा यांच्या शेतातील ऊस, गहू, डाळिंब पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. २0१५ या वर्षाची सुरुवातही वादळी वारा व अवकाळी पावसाने झाली. १ जानेवारीला तालुक्यात अवकाळी पावसाने हैदोस घालून शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. आता फेब्रुवारी महिन्यातही हेच संकट शेतकर्‍यांवर दुसर्‍यांदा ओढवल्याने शेतकरी अतिशय हताश झाला आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.