शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

अवकाळी पाऊस; गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST

या गारपिटीमुळे सर्वाधिक फटका बिजवाई कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. या परिसरातील लाठी, येडशी, शेलूबाजार, चिखली या गावांचा ...

या गारपिटीमुळे सर्वाधिक फटका बिजवाई कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. या परिसरातील लाठी, येडशी, शेलूबाजार, चिखली या गावांचा विचार केला, तर ५० एकराच्यावर बिजवाई कांद्याची लागवड शेतकर्‍यांनी केली आहे.

यामध्ये येडशी येथील नारायण बारड, दत्तात्रय बारड, समाधान पवार, भीमराव सावध, रिंकू बारड, मंगेश बारड, श्याम आडे, मच्छिंद्र नाईक, नंदू बारड, सुधाकर शेजव, तर चिखली प्रल्हाद राऊत, अविन चौधरी, अरुण चौधरी, खुशाल चौधरी, शेलूबाजार संतोष लांभाडे, किशोर गाडगे व लाठी येथे गणेश सुर्वे, किशोर सुर्वे, बाळू सुर्वे, मुरलीधर सुर्वे यांनी बिजवाई कांद्याची लागवड केली होती. त्याच चिखली येथील ज्ञानेश्वर डोंगरे यांच्या शेतातील ऊस, पपई फळबागांना फटका बसला आहे. वादळी व गाराच्या पावसामुळे यामधील बऱ्याच शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

लाठी येथे काढणीला आलेल्या गहू, तथा भाजीपाल्यासह रब्बी पिकांना जबर फटका बसला आहे. नुकसानीत सर्वाधिक आकडा हा बिजवाई कांद्याचा झाला आहे. सोबतच पपई, टरबूज, ऊस या फळबागेला गारपिटीचा तडाखा बसला आहे . चिखली येथील प्रल्हाद चौधरी यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतातील पपई, टरबूज तसेच बिजवाई कांद्याचे नुकसान झाले. त्यांनी नुकसानीचा आकडा हा १० ते १२ लाखांचा असल्याचे सांगितले आहे.

एकीकडे उन्हाच्या झळा बसत आहेत, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे. शासनाने गारपीट भागाचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.