शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

अवकाळी पाऊस; गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST

या गारपिटीमुळे सर्वाधिक फटका बिजवाई कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. या परिसरातील लाठी, येडशी, शेलूबाजार, चिखली या गावांचा ...

या गारपिटीमुळे सर्वाधिक फटका बिजवाई कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. या परिसरातील लाठी, येडशी, शेलूबाजार, चिखली या गावांचा विचार केला, तर ५० एकराच्यावर बिजवाई कांद्याची लागवड शेतकर्‍यांनी केली आहे.

यामध्ये येडशी येथील नारायण बारड, दत्तात्रय बारड, समाधान पवार, भीमराव सावध, रिंकू बारड, मंगेश बारड, श्याम आडे, मच्छिंद्र नाईक, नंदू बारड, सुधाकर शेजव, तर चिखली प्रल्हाद राऊत, अविन चौधरी, अरुण चौधरी, खुशाल चौधरी, शेलूबाजार संतोष लांभाडे, किशोर गाडगे व लाठी येथे गणेश सुर्वे, किशोर सुर्वे, बाळू सुर्वे, मुरलीधर सुर्वे यांनी बिजवाई कांद्याची लागवड केली होती. त्याच चिखली येथील ज्ञानेश्वर डोंगरे यांच्या शेतातील ऊस, पपई फळबागांना फटका बसला आहे. वादळी व गाराच्या पावसामुळे यामधील बऱ्याच शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

लाठी येथे काढणीला आलेल्या गहू, तथा भाजीपाल्यासह रब्बी पिकांना जबर फटका बसला आहे. नुकसानीत सर्वाधिक आकडा हा बिजवाई कांद्याचा झाला आहे. सोबतच पपई, टरबूज, ऊस या फळबागेला गारपिटीचा तडाखा बसला आहे . चिखली येथील प्रल्हाद चौधरी यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतातील पपई, टरबूज तसेच बिजवाई कांद्याचे नुकसान झाले. त्यांनी नुकसानीचा आकडा हा १० ते १२ लाखांचा असल्याचे सांगितले आहे.

एकीकडे उन्हाच्या झळा बसत आहेत, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे. शासनाने गारपीट भागाचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.