शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बेताल वाहतूक, नागरिकांनी मास्कचा वापर करण्यासाठी कर्मचारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST

वाशिम नगरपरिषद तर्फे काेराेना नियमांचे पालन नागरिकांकडून व्हावे याकरिता ध्वनीक्षेपकाद्वारे दरराेज शहरात जनजागृती केली जात आहे. शहरात गर्दी हाेऊ ...

वाशिम नगरपरिषद तर्फे काेराेना नियमांचे पालन नागरिकांकडून व्हावे याकरिता ध्वनीक्षेपकाद्वारे दरराेज शहरात जनजागृती केली जात आहे. शहरात गर्दी हाेऊ नये, लाेकांनी मास्कचा वापर करावा यासाठी नियुक्त करण्यात आलेले पथक शहरातील प्रतिष्ठानांसह, रस्त्यावरुन चालणाऱ्या व्यक्तीने मास्क न घातल्यास त्यांना दंड आकारत आहे. आतापर्यंत लाखाे रुपयांचा दंड नगरपरिषद तर्फे वसूल करण्यात आला आहे. काेराेना नियमांचे पालन न करणाऱ्यांची हयगय न करण्याच्या सूचना नगरपरिषद मुख्याधिकारी दीपक माेरे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. नगरपरिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पथकासह कर विभागाचे कर निरीक्षक अ.अजीज अ. सत्तार , साहेबराव उगले, किशोर हडपकर, संतोष किरळकर, नाजिमोद्दीन खैरोद्दीन मुलाजी, शिवाजी इंगळे, कुणाल कनोजे, रमजान बेनीवाले, संजय काष्टे, मुन्नाखान, वहाबभाई आदी परिश्रम घेत आहे.

-----------------------

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगय नाही : मुख्याधिकारी माेरे

वाशिम शहरात वाढत असलेले काेराेना बाधितांची संख्या पाहता नागरिकांनी खबरदारी घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये अनेक कडक नियम लावल्यानंतरही काही नागरिक या नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. तसेच शहरातून दरराेज नगरपरिषद तर्फे ध्वनीक्षेपकाव्दारे वापर करा, गर्दी टाळा, काेराेना नियमांचे पालन करा असे आवाहन केल्या जात आहे. तरी सुद्धा काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असल्याने नगरपरिषदे तर्फे पथकांची नियुक्ती करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची माेहीम हाती घेण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगय केली जाणार नसल्याचे मुख्याधिकारी दीपक माेरे यांनी सांगितले

-----------

बसस्थानकासमाेर कर्मचाऱ्यांचा ठिय्या

बसस्थानकासमाेर माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत असल्याने वाशिम नगरपरिषदेतील कर विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांना येथे कर्तव्यावर ठेवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नगरपरिषद कर विभागातील कर निरीक्षक अजिज यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी लाेकांमध्ये मास्क वापराबाबत, गर्दी टाळण्याबाबत जनजागृती केली. तसेच यावेळी विनामास्क नागरिकांवरही कारवाई करण्यात आली.

--------------

पाेलीस कर्मचाऱ्यांचा अभाव

वाशिम नगरपरिषद तर्फे काेराेना नियमांचे पालन व्हावे याकरिता मुख्याधिकारी दीपक माेरे यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. परंतु नियुक्त करण्यात आलेल्या पथकामध्ये पाेलीस कर्मचाऱ्याचा अभाव दिसून आला. एखाद्यावेळी नागरिक व नगरपरिषद अधिकारी, कर्मचाऱ्यात वाद झाल्यास पाेलीस कर्मचारी असणे आवश्यक आहे. परंतु पथकासाेबत पाेलीस कर्मचारी दिसून आले नाहीत.