शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

बेताल वाहतूक, नागरिकांनी मास्कचा वापर करण्यासाठी कर्मचारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST

वाशिम नगरपरिषद तर्फे काेराेना नियमांचे पालन नागरिकांकडून व्हावे याकरिता ध्वनीक्षेपकाद्वारे दरराेज शहरात जनजागृती केली जात आहे. शहरात गर्दी हाेऊ ...

वाशिम नगरपरिषद तर्फे काेराेना नियमांचे पालन नागरिकांकडून व्हावे याकरिता ध्वनीक्षेपकाद्वारे दरराेज शहरात जनजागृती केली जात आहे. शहरात गर्दी हाेऊ नये, लाेकांनी मास्कचा वापर करावा यासाठी नियुक्त करण्यात आलेले पथक शहरातील प्रतिष्ठानांसह, रस्त्यावरुन चालणाऱ्या व्यक्तीने मास्क न घातल्यास त्यांना दंड आकारत आहे. आतापर्यंत लाखाे रुपयांचा दंड नगरपरिषद तर्फे वसूल करण्यात आला आहे. काेराेना नियमांचे पालन न करणाऱ्यांची हयगय न करण्याच्या सूचना नगरपरिषद मुख्याधिकारी दीपक माेरे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. नगरपरिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पथकासह कर विभागाचे कर निरीक्षक अ.अजीज अ. सत्तार , साहेबराव उगले, किशोर हडपकर, संतोष किरळकर, नाजिमोद्दीन खैरोद्दीन मुलाजी, शिवाजी इंगळे, कुणाल कनोजे, रमजान बेनीवाले, संजय काष्टे, मुन्नाखान, वहाबभाई आदी परिश्रम घेत आहे.

-----------------------

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगय नाही : मुख्याधिकारी माेरे

वाशिम शहरात वाढत असलेले काेराेना बाधितांची संख्या पाहता नागरिकांनी खबरदारी घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये अनेक कडक नियम लावल्यानंतरही काही नागरिक या नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. तसेच शहरातून दरराेज नगरपरिषद तर्फे ध्वनीक्षेपकाव्दारे वापर करा, गर्दी टाळा, काेराेना नियमांचे पालन करा असे आवाहन केल्या जात आहे. तरी सुद्धा काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असल्याने नगरपरिषदे तर्फे पथकांची नियुक्ती करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची माेहीम हाती घेण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगय केली जाणार नसल्याचे मुख्याधिकारी दीपक माेरे यांनी सांगितले

-----------

बसस्थानकासमाेर कर्मचाऱ्यांचा ठिय्या

बसस्थानकासमाेर माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत असल्याने वाशिम नगरपरिषदेतील कर विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांना येथे कर्तव्यावर ठेवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नगरपरिषद कर विभागातील कर निरीक्षक अजिज यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी लाेकांमध्ये मास्क वापराबाबत, गर्दी टाळण्याबाबत जनजागृती केली. तसेच यावेळी विनामास्क नागरिकांवरही कारवाई करण्यात आली.

--------------

पाेलीस कर्मचाऱ्यांचा अभाव

वाशिम नगरपरिषद तर्फे काेराेना नियमांचे पालन व्हावे याकरिता मुख्याधिकारी दीपक माेरे यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. परंतु नियुक्त करण्यात आलेल्या पथकामध्ये पाेलीस कर्मचाऱ्याचा अभाव दिसून आला. एखाद्यावेळी नागरिक व नगरपरिषद अधिकारी, कर्मचाऱ्यात वाद झाल्यास पाेलीस कर्मचारी असणे आवश्यक आहे. परंतु पथकासाेबत पाेलीस कर्मचारी दिसून आले नाहीत.