शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यबळाअभावी ‘निराधार’ योजनेचे काम संथ!

By admin | Updated: June 17, 2017 00:27 IST

जिल्ह्यातील वास्तव: नायब तहसीलदारांची चार पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या संजय गांधी निराधार योजना विभागाचे काम सांभाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा अभाव असल्याने या योजनेची प्रकरणे अनेक महिने प्रलंबित राहत असून, निराधारांची त्यामुळे मोठी परवड होत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. राज्यातील काँग्रेसप्रणीत सरकारने निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, दिव्यांग, शारीरिक व मानसिक आजारग्रस्त व्यक्तींना व निराधार विधवांना सामाजिक आधार मिळावा, सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून अर्थसाहाय्य देण्याच्या हेतूने संजय गांधी निराधार योजना सन १९८० पासून सुरू केली. त्यानंतर भूमिहीन शेतमजूर महिला, निराधार विधवा यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन १९९१ पासून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळात योजना तर ६५ वर्षांवरील आर्थिकदृष्ट्या निराधार व्यक्तींसाठी केंद्र सरकारने २००४ मध्ये श्रावणबाळ सेवा योजना अमलात आणली होती. या योजनांचे कामकाज पाहण्यासाठी जिल्ह्यात तालुका स्तरावर अधिकारी, कर्मचारी मिळून ३६ पदांच्या आस्थापनेला मंजुरी मिळाली आणि ती सर्व पदे भरण्यात येऊन संजय गांधी निराधार योजनांचे कामकाजही योग्यरीत्या पार पाडले जात होते; परंतु २०१० पासून या योजनेचे काम सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदे रिक्त झाली असून, सद्यस्थितीत चार नायब तहसीलदार, तीन अव्वल कारकून आणि तीन कनिष्ठ लिपिकांसाठी एकूण १० पदे रिक्त झाली आहेत. यामध्ये मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर आणि कारंजा या चार तहसील कार्यालयांतील संजय गांधी निराधार योजनेच्या विभागातील नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. निराधार योजनेतील लाभार्थींच्या प्रकरणांची चौकशी करणे, त्यांच्या अनुदानाच्या बिलांवर स्वाक्षरी करणे व ती कोषागार कार्यालयाकडे पाठविणे, संजय गांधी निराधार योजनेच्या समितीची सभा बोलाविणे, त्या सभेचे नियोजन करणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या विभागाच्या नायब तहसीलदारांकडून पार पाडण्यात येत होत्या. त्याशिवाय विभागातील कारकून आणि लिपिकांना निराधारांचे अर्ज स्वीकारणे, निराधारांच्या संख्येनुसार त्यांच्या अनुदानाची देयके तयार करणे, त्या देयकांना नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीनिशी कोषागार कार्यालयाकडे पाठविणे आदी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात; परंतु चार तालुक्यांतील नायब तहसीलदारांसह कारकुनांची पदे रिक्त असल्याने निराधारांचे प्रस्ताव स्वीकारणे, त्यांच्या अनुदानाची देयके तयार करणे आदी कामांना मोठा विलंब लागत असून, कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने निराधारांची विविध प्रकरणे महिनो, महिने प्रलंबित राहत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध अर्थसहाय्यित योजनांचे ९० हजार लाभार्थी असून, त्यांची प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने या योजना विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज निर्माण झाली आहे.संजय गांधी निराधार योजना विभागातील जिल्ह्यात रिक्त असलेल्या पदासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. ही पदे भरल्यास इतर कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल; परंतु शासनाच्या निर्णयानंतरच या पदांच्या भरतीबाबत काही कार्यवाही होणार आहे.-शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.