शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

‘अनधिकृत बांधकाम हटाव’ची कसरत!

By admin | Updated: June 29, 2015 01:40 IST

जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर वाशिम नगरपरिषद लागली कामाला; रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा ‘जैसे थे’.

वाशिम : वाशिम शहराला अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी देताच, नगरपरिषद प्रशासन कामाला लागले आहे. गत काही काळातील अनुभव पाहता, अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा होऊ न देण्याची कसरत नगर परिषदेला करावी लागणार आहे.शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा गाजावाजा करीत वाशिम, रिसोड व कारंजा शहरात संबंधित नगरपरिषदेने यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली; मात्र १५ दिवसांचा कालावधी लोटत नाही तोच 'जैसे थे' परिस्थिती झाली. आता आयएएस दर्जाचे जिल्हाधिकारी लाभले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे वाशिम शहरातील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटविण्याचे आदेश नगरपरिषदेला दिले आहेत. शहरात अनधिकृत बांधकामे किती आहेत, याचा आढावा घेतल्यानंतर नगरपरिषदेने पोलीस विभागाकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. दरम्यान, यापूर्वी जिल्ह्यातील वाशिम, रिसोड व कारंजा नगरपरिषदेने व्यापक प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली; मात्र, पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याचे नियोजन केले नव्हते. परिणामी, अल्पावधीतच त्याच त्या रस्त्यालगत पुन्हा अतिक्रमण झाले. व्यापार्‍यांनी दुकानासमोर पुन्हा अतिक्रमण केले. दोन वर्षांपूर्वी मालेगाव ग्रामपंचायतनेदेखील व्यापक प्रमाणात अतिक्रमण हटविले. वाशिम, रिसोड, कारंजा नगरपरिषद व मालेगाव ग्रामपंचायत असा एकंदर लाखो रुपयांचा खर्च अतिक्रमण हटाव मोहिमेवर झाला आहे; मात्र भविष्यकालीन ठोस नियोजन नसल्याने अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा अल्पावधीतच सपशेल अपयशी ठरल्या. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा त्या जागेवर अतिक्रमण होणार नाही याचे नियोजन नसणे, लघुव्यावसायिकांना पर्यायी जागा देणे आदी बाबी स्पष्ट नसल्याने रस्त्यालगत पुन्हा 'दुकानदारी' सुरू झाली आहे. वाशिम शहरात पाटणी चौक, शिवाजी चौक परिसरात अनेक व्यावसायिकांनी दुकानापुढील जागेवर ताबा केला आहे. परिणामी, वाहतूककोंडीत भर पडत आहे. आता दस्तुरखुद्द जिल्हाधिकार्‍यांनीच अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाचा मुद्दा गांभीर्याने घेतल्याने नगरपरिषदांना हे आव्हान पेलावे लागणार आहे. सदर आव्हान नगरपरिषद कशी यशस्वी करते, यावर या मोहिमेचे यशापयश अवलंबून राहणार आहे.