शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

ऊस विक्री परवडेना, शेतकऱ्यांनी सुरु केल्या रसवंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:40 IST

वाशिम: गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव ऐन ऊसतोडणीच्या हंगामात वाढत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणी सापडत असून, कारखान्यांसह ...

वाशिम: गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव ऐन ऊसतोडणीच्या हंगामात वाढत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणी सापडत असून, कारखान्यांसह व्यापाºयांकडून ऊसाला अल्पदर मिळत आहेत. त्यामुळे ऊसविक्रीचा परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी स्वत:च महामार्गावर रसवंत्या सुरू केल्याचे चित्र राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील सहाही तालुक्यात ऊसाचे क्षेत्र ११३ हेक्टर पेक्षा अधिक आहे. या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादनही मिळत असे; परंतु गतवर्षी ऊस तोडणीवर आला असतानाच देशात कोरोना संसर्गाचा कहर सुरू झाला. त्यामुळे ऊसाचे उभे पीक शेक डो शेतकºयांच्या शेतातच सुकले. या नुकसानापोटी शेतकऱ्यांना कवडीचाही मोबदला शासनाकडून मिळाला नाही. त्यानंतर कोरोना संसर्गाचा वेग मंदावला स्थिती पूर्ववत होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा ऊसाच्या पिकासाठी तयारी केली. सिंचनासह विविध बाबींवर लाखोचा खर्चही केला. त्यामुळे ऊसाचे पीक चांगले बहरले. आता हा ऊस तोडणीवर आला असतानाच जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्ग उफाळून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दाटून आले असून, कारखान्यांसह व्यापाऱ्यांकडूनही ऊसाला अल्पदर मिळत आहेत. त्यामुळे ऊसाची विक्री परडवत नसल्याने शेतकऱ्यांनी स्वत:च महामार्गावर रसवंत्या सुरू केल्या आहेत. यातून भरघोस उत्पन्न त्यांना मिळत आहे.

------------------------

कोरोना संसर्गाचा व्यवसायावर परिणाम

जिल्ह्यात ऊस उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भरवशावर शेक डो लोक रसवंतीचा व्यवसाय करीत होते; परंतु गतवर्षी कोरोनामुळे रसवंत्यांसह शितपेय विक्रीचा व्यवसाय ऐन हंगामात पूर्णपणे बंद राहिला, तर आताही कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शहरातील शितपेयाच्या दुकानांकडे ग्राहक फिरकेनासे झाले आहेत. त्यात सायंकाळच्यानंतर या दुकानांकडे ग्राहक येतात; परंतु सायंकाळी ५ नंतर प्रतिष्ठाणे उघडी ठेवण्यास मूभाच नसल्याने जिल्ह्यातील शितपेय विक्रेते अडचणीत सापडल्याने त्यांना ऊसाची खरेदी करणेही परवडणारे राहिले नाही.

---------------

ऊसाचे तालुकानिहाय क्षेत्र

तालुका क्षेत्र

वाशिम १५.८०

रिसोड ७२.५०

मालेगाव ११.७०

मं.पीर ११.००

कारंजा ०२.००

मानोरा ०००

--------

कोट: गतवर्षी लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्याने ऊसाची विक्रीच होऊ शकली नाही. आता यंदाही ऐन ऊस तोडणीवर आला असताना कोरोना संसर्ग वाढल्याने व्यापारी अल्पदरात ऊसाची मागणी करीत आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होत असल्याने स्वत:च महामार्गावर शेतालगत रसवंती सुरू केली आहे. या ठिकाणी दिवसभरात अनेक वाहनचालक ताजा रस पिण्यास येतात. त्यामुळे चांगले उत्पन्न होत आहे.

-तुकाराम पवार,

ऊस उत्पादक शेतकरी

------------

कोट: गतवर्षी लॉकडाऊन काळात शेतातील उभे ऊसाचे पीक सुकल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आता पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्याने व्यापारी अल्पदरात ऊस खरेदी करीत आहेत. त्यांना ऊस विकून नुकसान करण्यापेक्षा स्वत:च रसवंतीचा व्यवसाय करणे योग्य वाटले आणि हा पर्याय आता बºयापैकी नफा मिळवून देत आहे.

-घनश्याम वाघ,

ऊस शेतकरी

===Photopath===

090321\09wsm_2_09032021_35.jpg

===Caption===

ऊसाचे उभे पीक