शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

ऊस विक्री परवडेना, शेतकऱ्यांनी सुरु केल्या रसवंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:40 IST

वाशिम: गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव ऐन ऊसतोडणीच्या हंगामात वाढत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणी सापडत असून, कारखान्यांसह ...

वाशिम: गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव ऐन ऊसतोडणीच्या हंगामात वाढत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणी सापडत असून, कारखान्यांसह व्यापाºयांकडून ऊसाला अल्पदर मिळत आहेत. त्यामुळे ऊसविक्रीचा परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी स्वत:च महामार्गावर रसवंत्या सुरू केल्याचे चित्र राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील सहाही तालुक्यात ऊसाचे क्षेत्र ११३ हेक्टर पेक्षा अधिक आहे. या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादनही मिळत असे; परंतु गतवर्षी ऊस तोडणीवर आला असतानाच देशात कोरोना संसर्गाचा कहर सुरू झाला. त्यामुळे ऊसाचे उभे पीक शेक डो शेतकºयांच्या शेतातच सुकले. या नुकसानापोटी शेतकऱ्यांना कवडीचाही मोबदला शासनाकडून मिळाला नाही. त्यानंतर कोरोना संसर्गाचा वेग मंदावला स्थिती पूर्ववत होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा ऊसाच्या पिकासाठी तयारी केली. सिंचनासह विविध बाबींवर लाखोचा खर्चही केला. त्यामुळे ऊसाचे पीक चांगले बहरले. आता हा ऊस तोडणीवर आला असतानाच जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्ग उफाळून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दाटून आले असून, कारखान्यांसह व्यापाऱ्यांकडूनही ऊसाला अल्पदर मिळत आहेत. त्यामुळे ऊसाची विक्री परडवत नसल्याने शेतकऱ्यांनी स्वत:च महामार्गावर रसवंत्या सुरू केल्या आहेत. यातून भरघोस उत्पन्न त्यांना मिळत आहे.

------------------------

कोरोना संसर्गाचा व्यवसायावर परिणाम

जिल्ह्यात ऊस उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भरवशावर शेक डो लोक रसवंतीचा व्यवसाय करीत होते; परंतु गतवर्षी कोरोनामुळे रसवंत्यांसह शितपेय विक्रीचा व्यवसाय ऐन हंगामात पूर्णपणे बंद राहिला, तर आताही कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शहरातील शितपेयाच्या दुकानांकडे ग्राहक फिरकेनासे झाले आहेत. त्यात सायंकाळच्यानंतर या दुकानांकडे ग्राहक येतात; परंतु सायंकाळी ५ नंतर प्रतिष्ठाणे उघडी ठेवण्यास मूभाच नसल्याने जिल्ह्यातील शितपेय विक्रेते अडचणीत सापडल्याने त्यांना ऊसाची खरेदी करणेही परवडणारे राहिले नाही.

---------------

ऊसाचे तालुकानिहाय क्षेत्र

तालुका क्षेत्र

वाशिम १५.८०

रिसोड ७२.५०

मालेगाव ११.७०

मं.पीर ११.००

कारंजा ०२.००

मानोरा ०००

--------

कोट: गतवर्षी लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्याने ऊसाची विक्रीच होऊ शकली नाही. आता यंदाही ऐन ऊस तोडणीवर आला असताना कोरोना संसर्ग वाढल्याने व्यापारी अल्पदरात ऊसाची मागणी करीत आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होत असल्याने स्वत:च महामार्गावर शेतालगत रसवंती सुरू केली आहे. या ठिकाणी दिवसभरात अनेक वाहनचालक ताजा रस पिण्यास येतात. त्यामुळे चांगले उत्पन्न होत आहे.

-तुकाराम पवार,

ऊस उत्पादक शेतकरी

------------

कोट: गतवर्षी लॉकडाऊन काळात शेतातील उभे ऊसाचे पीक सुकल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आता पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्याने व्यापारी अल्पदरात ऊस खरेदी करीत आहेत. त्यांना ऊस विकून नुकसान करण्यापेक्षा स्वत:च रसवंतीचा व्यवसाय करणे योग्य वाटले आणि हा पर्याय आता बºयापैकी नफा मिळवून देत आहे.

-घनश्याम वाघ,

ऊस शेतकरी

===Photopath===

090321\09wsm_2_09032021_35.jpg

===Caption===

ऊसाचे उभे पीक