शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

अठ्ठावीस गावे पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: July 25, 2015 01:36 IST

पाणीटंचाईचे संकट; ग्रामस्थांकडून दूषित पाण्याचा वापर.

मानोरा (जि. वाशिम ) : तालुक्यातील पाणी पुरवठा करणारी महाराष्ट्र जीवन प्राधकरण मार्फत राबवत असलेली अठ्ठावीएस गावे पाणीपुरवठा योजना गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील २८ गावांतील ग्रामस्थांना दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. मानोरा तालुक्यातील अठठाविस गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे मुख्य जलकेंद्र असलेल्या अरुणावती प्रकल्पावरून पाणी पुरवठा करणारे दोन्ही मोटारपंप नादुरुस्त झाल्यामुळे योजनेच्या पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे या योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या २८ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थ अनेक दिवसांपासून उपसा नसलेल्या विहिरीतील दुषित पाण्याचा वापर पिण्यासाठी करीत आहेत. या दुषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्या शेतीची लगबग आहे; परंतु पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना ती कामे बाजुला ठेवून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ही २८ गावे पाणी पुरवठा योजना पुर्ववत करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण उपविभाग कारंजा यांनी मानोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना एक पत्र देवून प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद असल्यामुळे गावकरी उपलब्ध स्त्रोतातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करतील त्यामुळे उपलब्ध स्त्रोताच्या पाण्यात आवश्यक प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकुन ते पाणी निर्जंतुक करावे, तसेच हे पाणी उकळून वापरण्याबाबत कर्मचार्‍यांद्वारे सूचना देण्यात याव्या व तशी दवंडी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली तसेच योजनेचे पाणी येत्या चार ते पाच दिवसात पूर्ववत करण्यात येईल असेही पत्रात नमुद करण्यात आले आहे. पत्राची प्रत तहसीलदार मानोरा यांना देण्यात आली आहे.