शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

अठ्ठावीस गावे पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: July 25, 2015 01:36 IST

पाणीटंचाईचे संकट; ग्रामस्थांकडून दूषित पाण्याचा वापर.

मानोरा (जि. वाशिम ) : तालुक्यातील पाणी पुरवठा करणारी महाराष्ट्र जीवन प्राधकरण मार्फत राबवत असलेली अठ्ठावीएस गावे पाणीपुरवठा योजना गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील २८ गावांतील ग्रामस्थांना दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. मानोरा तालुक्यातील अठठाविस गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे मुख्य जलकेंद्र असलेल्या अरुणावती प्रकल्पावरून पाणी पुरवठा करणारे दोन्ही मोटारपंप नादुरुस्त झाल्यामुळे योजनेच्या पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे या योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या २८ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थ अनेक दिवसांपासून उपसा नसलेल्या विहिरीतील दुषित पाण्याचा वापर पिण्यासाठी करीत आहेत. या दुषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्या शेतीची लगबग आहे; परंतु पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना ती कामे बाजुला ठेवून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ही २८ गावे पाणी पुरवठा योजना पुर्ववत करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण उपविभाग कारंजा यांनी मानोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना एक पत्र देवून प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद असल्यामुळे गावकरी उपलब्ध स्त्रोतातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करतील त्यामुळे उपलब्ध स्त्रोताच्या पाण्यात आवश्यक प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकुन ते पाणी निर्जंतुक करावे, तसेच हे पाणी उकळून वापरण्याबाबत कर्मचार्‍यांद्वारे सूचना देण्यात याव्या व तशी दवंडी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली तसेच योजनेचे पाणी येत्या चार ते पाच दिवसात पूर्ववत करण्यात येईल असेही पत्रात नमुद करण्यात आले आहे. पत्राची प्रत तहसीलदार मानोरा यांना देण्यात आली आहे.