शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

अठ्ठावीस गावे पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: July 25, 2015 01:36 IST

पाणीटंचाईचे संकट; ग्रामस्थांकडून दूषित पाण्याचा वापर.

मानोरा (जि. वाशिम ) : तालुक्यातील पाणी पुरवठा करणारी महाराष्ट्र जीवन प्राधकरण मार्फत राबवत असलेली अठ्ठावीएस गावे पाणीपुरवठा योजना गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील २८ गावांतील ग्रामस्थांना दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. मानोरा तालुक्यातील अठठाविस गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे मुख्य जलकेंद्र असलेल्या अरुणावती प्रकल्पावरून पाणी पुरवठा करणारे दोन्ही मोटारपंप नादुरुस्त झाल्यामुळे योजनेच्या पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे या योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या २८ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थ अनेक दिवसांपासून उपसा नसलेल्या विहिरीतील दुषित पाण्याचा वापर पिण्यासाठी करीत आहेत. या दुषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्या शेतीची लगबग आहे; परंतु पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना ती कामे बाजुला ठेवून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ही २८ गावे पाणी पुरवठा योजना पुर्ववत करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण उपविभाग कारंजा यांनी मानोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना एक पत्र देवून प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद असल्यामुळे गावकरी उपलब्ध स्त्रोतातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करतील त्यामुळे उपलब्ध स्त्रोताच्या पाण्यात आवश्यक प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकुन ते पाणी निर्जंतुक करावे, तसेच हे पाणी उकळून वापरण्याबाबत कर्मचार्‍यांद्वारे सूचना देण्यात याव्या व तशी दवंडी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली तसेच योजनेचे पाणी येत्या चार ते पाच दिवसात पूर्ववत करण्यात येईल असेही पत्रात नमुद करण्यात आले आहे. पत्राची प्रत तहसीलदार मानोरा यांना देण्यात आली आहे.