शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रोख चुकाºया अभावी शेतकरी अडचणीत

By admin | Updated: April 3, 2017 16:58 IST

बाजारात शेतमालाची विक्री करणाºया शेतकºयांना रोख चुकारा मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत

चलन तुटवडा: खरीपाच्या तयारीवर परिणामवाशिम: बाजारात शेतमालाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना रोख चुकारा मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. खरीपाची तयारी आणि पिककर्जाचा भरणा करण्यासाठी त्यांना मोठा त्रास होत आहे.शासनाने नोव्हेंबर २०१६ ला केलेल्या नोटाबंदीचे परिणाम अद्यापही व्यवहारावर असल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात मागील महिनाभरापासून चलन तुटवडा निर्माण झाला आहे. बँकेतील विड्रॉलवरची मर्यादा उठविली; परंतु रिझर्व्ह बँकेने रोखीचा पुरवठा कमी केल्याने स्टेट बँकेसह प्रत्येकच राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्थांत चलन तुटवडा निर्माण झाला आहे. व्यापारी आणि मोठमोठे व्यावसायिकच नव्हे, तर सर्वसाधारण जनताही त्यामुळे त्रस्त झाली आहे. जनतेला कॅशलेस व्यवहार करण्यास बाध्य करण्याचा हा डाव, तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. बँकांकडून व्यापाऱ्यांना अल्प रकमेचा विड्रॉल मिळत असल्याने त्यांच्या खरेदीवर फारसा परिणाम होत नसला तरी, शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. सद्यस्थितीत बँकांनी कर्जवसुलीचा तकादा लावला आहे. त्यातच खरीपाच्या हंगामासाठी तयारीही करणे आवश्यक आहे. या अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्याने घरात साठविलेला माल विकण्याची तयारी सुरू केली आहे; परंतु बाजार समित्यामधील व्यापाऱ्यांकडे पैसाच नसल्यामुळे ते धनादेशाच्या रुपात चुकारा करीत आहेत. या धनादेशातून शेतकऱ्यांना बँकेचे कृज कमी करणे थोडे शक्य होत असले तरी, खरीपाच्या हंगामासाठी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी अडचण येत असल्याने रोखीने चुकारा मिळण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.