शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

नैराश्यातून वळले साहित्य क्षेत्राकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST

वाशिम : पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक नामदेव चंद्रभान कांबळे यांना वैद्यकीय क्षेत्रात भविष्य घडविण्याची इच्छा होती; परंतु ‘एमबीबीएस’च्या प्रथम ...

वाशिम : पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक नामदेव चंद्रभान कांबळे यांना वैद्यकीय क्षेत्रात भविष्य घडविण्याची इच्छा होती; परंतु ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षातच अपयश मिळाल्याने ते खचले आणि त्यामुळे आलेल्या नैराश्यातूनच ते साहित्य क्षेत्राकडे वळले.

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन हे कवी नामदेव चंद्रभान कांबळे उपाख्य ना.चं. कांबळे यांचे मूळगाव. वडील चंद्रभान व आई भुलाबाई यांच्या पोटी १ जानेवारी १९४८ साली त्यांचा जन्म झाला. त्यांना चार भाऊ व तीन बहिणी. यात ते सहाव्या क्रमांकाचे. शिरपूर येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नागपूर येथे बीएस्सी प्रथम वर्षाचे शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस प्रथम वर्षात प्रवेश घेतला; मात्र एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेत त्यांच्या पदरी अपयश आले. त्यामुळे निराश होऊन त्यांनी परत शिरपूर जैन गाठले. गावात परतल्यानंतर त्यांनी गावातच सुरुवातीला एक ते दोन वर्ष खासगीमध्ये चौकीदारीची नोकरी पत्करली. ही नोकरी करीत असतानाच त्यांनी बीए. डी.एड‌चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर वाशिम येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेतही त्यांनी १९७५ साली वॉचमनची नोकरी स्वीकारली. ही नोकरी करीत असताना सन १९७७ साली त्यांची शिक्षक म्हणून राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत निवड झाली. मराठी विषय शिकविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्यावर सुरुवातीला त्यांनी १९८६ पर्यंत इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी हा विषय शिकविला, तर १९८६ नंतर २००५ पर्यंत त्यांनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या मराठी हा विषय शिकविला. दरम्यान. १९७१ मध्ये मेहकर तालुक्यातील ईसवी येथील आशाबाई बांगर त्यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यांना तीन मुले आहेत. लग्नापूर्वी एमबीबीएसच्या प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झाल्याने त्यांच्या जीवनात एकूणच नैराश्‍य आले होते. यातून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. कविता लिहिण्याचा छंद जोपासत त्यांनी कथा, कादंबरी, ललित, भाषणे, समीक्षा, वैचारिक आदी विषयांवर आपली लेखणी झिजवत पुढचा प्रवास सुरू ठेवला. एकूण बावीस पुस्तके त्यांनी विविध विषयांवर लिहून प्रकाशित केली आहेत. साहित्य अकादमी मिळवलेली ‘राघव वेळ’ ही त्यांची कादंबरी सर्वांची आवडती ठरली आहे.

--------

बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावर लिखाण सुरू !

पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ साहित्यिक ना.चं. कांबळे यांच्या आजवर ८ कांदबऱ्या, दोन कथासंग्रह, चार कवितासंग्रह, दोन वैचारिक तसेच लेखसंग्रह आणि समीक्षा मिळून २१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे लिखाण अद्यापही सुरू असून, ते आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर आधारित ‘आंबेडकरांचे चरित्र’ हे ७०० ते ८०० पानांच्या पुस्तकाचे लिखाण करीत आहेत. पुणे येथील राजहंस प्रकाशन त्यांचे हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.