शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

हळद पिकामुळे मजुरांना राेजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:41 IST

सिंचनाच्या सोयी नसल्याने पूर्वीच्या काळात पूर्ण शेती पावसाळ्यात होणाऱ्या पावसावर अवलंबून होती. म्हणजेच कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक होते. मागील ...

सिंचनाच्या सोयी नसल्याने पूर्वीच्या काळात पूर्ण शेती पावसाळ्यात होणाऱ्या पावसावर अवलंबून होती. म्हणजेच कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक होते. मागील काही वर्षांत बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वखर्चातून सिंचन व्यवस्था केली, तर काही शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांतून सिंचनविहिरी, शेततळ्याचा लाभ घेतला. तसेच शिरपूर

परिसरात रखडलेला मिर्झापूर सिंचन प्रकल्प ही दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाला. परिणामी काही वर्षांपासून शिरपूर परिसरात हळद पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. आता तर वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादक शेतकरी शिरपूरमध्ये आहेत. हळद उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सहाजिकच त्यातून शेतमजुरांना रोजगार निर्मिती झाली आहे. सध्या शिरपूर परिसरात हळद काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. हळद वेचणीची मजुरी प्रति कॅरेट वीस रुपयेप्रमाणे मिळत आहे. मजूर सकाळी पाचपासूनच हळद वेचणीसाठी शेतात जात आहेत. तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत मजुरांना मजुरी मिळत आहे. सिंचन सुविधांमुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली. हळद पिकामुळे शेतमजुरांना अधिक दिवस रोजगार प्राप्त होत आहे. मागील वर्षीसुद्धा लॉकडाऊनच्या काळात मे महिन्यापर्यंत शेतमजुरांना हळद पिकामुळे काम उपलब्ध झाले. यावर्षीही हळदीमुळे मजुरांना अधिक दिवस रोजगार मिळणार आहे.