शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

तूर, भाजीपाल्यावर विपरीत परिणाम!

By admin | Updated: October 16, 2016 02:30 IST

वातावरणातील बदलामुळे ऐन दिवाळीच्या काळात भाजीपाला महागण्याचे संकेत

सुनील काकडेवाशिम, दि. १५-पावसातील अनियमिततेमुळे यंदा जिल्हय़ात सर्वदूर भल्या पहाटेपासून कडक उन्ह पडेपर्यंंत धुके पसरत आहे. वातावरणातील या बदलाचा विपरीत परिणाम तुरीसह भाजीपाला पिकावर जाणवत असून विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात उद्भवलेल्या या बिकट समस्येमुळे भाजीपाल्याचे दर वधारतील, असे दाट संकेत मिळत आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी ४ लाख ९ हजार ६३ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र असून ४ लाख २ हजार ४६६ हेक्टर क्षेत्रावर यंदा प्रत्यक्षात विविध पिकांची पेरणी करण्यात आली. त्यात ६ हजार ३५0 हेक्टर क्षेत्रावर तूर या पिकाची लागवड आहे. सध्या फुलधारणेच्या अवस्थेत असलेल्या तुरीपासून यंदा विक्रमी उत्पादन होईल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना लागून आहे; मात्र गेल्या ४ ते ५ दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन पहाटे साधारणत: ४ वाजेपासून सकाळी ८ वाजेपर्यंंत धुके पसरत असल्यामुळे तूर पिकावर विविध प्रकारच्या अळ्या व किडींचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविली जात आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. तुरीसोबतच जिल्हय़ात १५ ऑक्टोबरअखेर १,९४१ हेक्टरवर भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. यात वाशिम तालुक्यात २0८ हेक्टर, रिसोड २९३, मालेगाव ४३८, मंगरूळपीर ३५0, मानोरा २९६ आणि कारंजा तालुक्यात २२६ हेक्टरचा समावेश आहे. दरम्यान, दैनंदिन पडणार्‍या धुक्यामुळे दोडका, काकडी, कारली, वांगी, टोमॅटो, सिमला मिर्ची, फुलकोबी यासह इतरही भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होऊन किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धुक्याचे प्रमाण असेच कायम राहिल्यास भाजीपाला पिकांचे उत्पादन घटणार असून बाजारपेठेत विक्रीला उपलब्ध होणार्‍या मालाचे दर वाढतील, असे संकेत भाजीपाला उत्पादकांकडून दिले जात आहेत. नुकसान टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी!यासंदर्भात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ भरत गीते यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी वातावरणातील बदलामुळे तूर आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होत असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. तूर, भाजीपाला आणि फळ उत्पादक शेतकर्‍यांनी धुक्यांमुळे संभावित धोका लक्षात घेऊन नुकसान टाळण्यासाठी धुके हटल्यानंतर ह्यस्प्रिंकलरह्णने झाडांवर पाण्याचा फवारा मारून झाडे धुऊन घ्यावी अथवा बुरशीनाशक, कीटकनाशक औषधीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.