शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

तूर, भाजीपाल्यावर विपरीत परिणाम!

By admin | Updated: October 16, 2016 02:30 IST

वातावरणातील बदलामुळे ऐन दिवाळीच्या काळात भाजीपाला महागण्याचे संकेत

सुनील काकडेवाशिम, दि. १५-पावसातील अनियमिततेमुळे यंदा जिल्हय़ात सर्वदूर भल्या पहाटेपासून कडक उन्ह पडेपर्यंंत धुके पसरत आहे. वातावरणातील या बदलाचा विपरीत परिणाम तुरीसह भाजीपाला पिकावर जाणवत असून विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात उद्भवलेल्या या बिकट समस्येमुळे भाजीपाल्याचे दर वधारतील, असे दाट संकेत मिळत आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी ४ लाख ९ हजार ६३ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र असून ४ लाख २ हजार ४६६ हेक्टर क्षेत्रावर यंदा प्रत्यक्षात विविध पिकांची पेरणी करण्यात आली. त्यात ६ हजार ३५0 हेक्टर क्षेत्रावर तूर या पिकाची लागवड आहे. सध्या फुलधारणेच्या अवस्थेत असलेल्या तुरीपासून यंदा विक्रमी उत्पादन होईल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना लागून आहे; मात्र गेल्या ४ ते ५ दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन पहाटे साधारणत: ४ वाजेपासून सकाळी ८ वाजेपर्यंंत धुके पसरत असल्यामुळे तूर पिकावर विविध प्रकारच्या अळ्या व किडींचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविली जात आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. तुरीसोबतच जिल्हय़ात १५ ऑक्टोबरअखेर १,९४१ हेक्टरवर भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. यात वाशिम तालुक्यात २0८ हेक्टर, रिसोड २९३, मालेगाव ४३८, मंगरूळपीर ३५0, मानोरा २९६ आणि कारंजा तालुक्यात २२६ हेक्टरचा समावेश आहे. दरम्यान, दैनंदिन पडणार्‍या धुक्यामुळे दोडका, काकडी, कारली, वांगी, टोमॅटो, सिमला मिर्ची, फुलकोबी यासह इतरही भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होऊन किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धुक्याचे प्रमाण असेच कायम राहिल्यास भाजीपाला पिकांचे उत्पादन घटणार असून बाजारपेठेत विक्रीला उपलब्ध होणार्‍या मालाचे दर वाढतील, असे संकेत भाजीपाला उत्पादकांकडून दिले जात आहेत. नुकसान टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी!यासंदर्भात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ भरत गीते यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी वातावरणातील बदलामुळे तूर आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होत असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. तूर, भाजीपाला आणि फळ उत्पादक शेतकर्‍यांनी धुक्यांमुळे संभावित धोका लक्षात घेऊन नुकसान टाळण्यासाठी धुके हटल्यानंतर ह्यस्प्रिंकलरह्णने झाडांवर पाण्याचा फवारा मारून झाडे धुऊन घ्यावी अथवा बुरशीनाशक, कीटकनाशक औषधीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.