शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

तूर, भाजीपाल्यावर विपरीत परिणाम!

By admin | Updated: October 16, 2016 02:30 IST

वातावरणातील बदलामुळे ऐन दिवाळीच्या काळात भाजीपाला महागण्याचे संकेत

सुनील काकडेवाशिम, दि. १५-पावसातील अनियमिततेमुळे यंदा जिल्हय़ात सर्वदूर भल्या पहाटेपासून कडक उन्ह पडेपर्यंंत धुके पसरत आहे. वातावरणातील या बदलाचा विपरीत परिणाम तुरीसह भाजीपाला पिकावर जाणवत असून विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात उद्भवलेल्या या बिकट समस्येमुळे भाजीपाल्याचे दर वधारतील, असे दाट संकेत मिळत आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी ४ लाख ९ हजार ६३ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र असून ४ लाख २ हजार ४६६ हेक्टर क्षेत्रावर यंदा प्रत्यक्षात विविध पिकांची पेरणी करण्यात आली. त्यात ६ हजार ३५0 हेक्टर क्षेत्रावर तूर या पिकाची लागवड आहे. सध्या फुलधारणेच्या अवस्थेत असलेल्या तुरीपासून यंदा विक्रमी उत्पादन होईल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना लागून आहे; मात्र गेल्या ४ ते ५ दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन पहाटे साधारणत: ४ वाजेपासून सकाळी ८ वाजेपर्यंंत धुके पसरत असल्यामुळे तूर पिकावर विविध प्रकारच्या अळ्या व किडींचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविली जात आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. तुरीसोबतच जिल्हय़ात १५ ऑक्टोबरअखेर १,९४१ हेक्टरवर भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. यात वाशिम तालुक्यात २0८ हेक्टर, रिसोड २९३, मालेगाव ४३८, मंगरूळपीर ३५0, मानोरा २९६ आणि कारंजा तालुक्यात २२६ हेक्टरचा समावेश आहे. दरम्यान, दैनंदिन पडणार्‍या धुक्यामुळे दोडका, काकडी, कारली, वांगी, टोमॅटो, सिमला मिर्ची, फुलकोबी यासह इतरही भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होऊन किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धुक्याचे प्रमाण असेच कायम राहिल्यास भाजीपाला पिकांचे उत्पादन घटणार असून बाजारपेठेत विक्रीला उपलब्ध होणार्‍या मालाचे दर वाढतील, असे संकेत भाजीपाला उत्पादकांकडून दिले जात आहेत. नुकसान टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी!यासंदर्भात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ भरत गीते यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी वातावरणातील बदलामुळे तूर आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होत असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. तूर, भाजीपाला आणि फळ उत्पादक शेतकर्‍यांनी धुक्यांमुळे संभावित धोका लक्षात घेऊन नुकसान टाळण्यासाठी धुके हटल्यानंतर ह्यस्प्रिंकलरह्णने झाडांवर पाण्याचा फवारा मारून झाडे धुऊन घ्यावी अथवा बुरशीनाशक, कीटकनाशक औषधीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.