शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वृक्षलागवड काळाची गरज !

By admin | Updated: July 2, 2016 00:04 IST

महसूल राज्यमंत्र्यांचे प्रतिपादन: श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे कार्यक्रम, पोहरादेवी तिर्थक्षेत्राचा आढावा.

मानोरा (जि. वाशिम): वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली असून प्रत्येक नागरिकाने वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत पोहरादेवी (ता. मानोरा) येथील वन पर्यटन केंद्र परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार अनंतकुमार पाटील, जगदंबा देवस्थानचे रामराव महाराज, भक्तीधाम ट्रस्टचे जितेंद्र महाराज, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, मानोराचे तहसीलदार ए. पी. पाटील सहाय्यक वनसंरक्षक गिरीजा देसाई, गवई आदी उपस्थित होते. संजय राठोड म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक असून यासाठी राज्य शासनाने २ कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेऊन वन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावर्षी रामनवमी आणि सेवालाल जन्मोत्सवादरम्यान पोहरादेवी येथे भरलेल्या यात्रेदरम्यान महसूल राज्यमंत्री संजय राठोड, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, तसेच वाशिम-यवतमाळच्या खासदार भावनाताई गवळी, कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या उपस्थितीत वनपर्यटन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. याच वनपर्यटन केंद्रात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै रोजी कृषीदीन म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येतो. याच दिवसाच्या औचित्यावर राज्य शासनाच्यावतीने राज्यभरात दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. यावेळी ना. राठोड यांनी पोहरादेवी तिर्थक्षेत्राच्या विकासाचा आढावा घेतला.