शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवड काळाची गरज !

By admin | Updated: July 2, 2016 00:04 IST

महसूल राज्यमंत्र्यांचे प्रतिपादन: श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे कार्यक्रम, पोहरादेवी तिर्थक्षेत्राचा आढावा.

मानोरा (जि. वाशिम): वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली असून प्रत्येक नागरिकाने वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत पोहरादेवी (ता. मानोरा) येथील वन पर्यटन केंद्र परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार अनंतकुमार पाटील, जगदंबा देवस्थानचे रामराव महाराज, भक्तीधाम ट्रस्टचे जितेंद्र महाराज, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, मानोराचे तहसीलदार ए. पी. पाटील सहाय्यक वनसंरक्षक गिरीजा देसाई, गवई आदी उपस्थित होते. संजय राठोड म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक असून यासाठी राज्य शासनाने २ कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेऊन वन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावर्षी रामनवमी आणि सेवालाल जन्मोत्सवादरम्यान पोहरादेवी येथे भरलेल्या यात्रेदरम्यान महसूल राज्यमंत्री संजय राठोड, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, तसेच वाशिम-यवतमाळच्या खासदार भावनाताई गवळी, कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या उपस्थितीत वनपर्यटन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. याच वनपर्यटन केंद्रात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै रोजी कृषीदीन म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येतो. याच दिवसाच्या औचित्यावर राज्य शासनाच्यावतीने राज्यभरात दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. यावेळी ना. राठोड यांनी पोहरादेवी तिर्थक्षेत्राच्या विकासाचा आढावा घेतला.