शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

वृक्षलागवड काळाची गरज !

By admin | Updated: July 2, 2016 00:04 IST

महसूल राज्यमंत्र्यांचे प्रतिपादन: श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे कार्यक्रम, पोहरादेवी तिर्थक्षेत्राचा आढावा.

मानोरा (जि. वाशिम): वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली असून प्रत्येक नागरिकाने वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत पोहरादेवी (ता. मानोरा) येथील वन पर्यटन केंद्र परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार अनंतकुमार पाटील, जगदंबा देवस्थानचे रामराव महाराज, भक्तीधाम ट्रस्टचे जितेंद्र महाराज, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, मानोराचे तहसीलदार ए. पी. पाटील सहाय्यक वनसंरक्षक गिरीजा देसाई, गवई आदी उपस्थित होते. संजय राठोड म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक असून यासाठी राज्य शासनाने २ कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेऊन वन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावर्षी रामनवमी आणि सेवालाल जन्मोत्सवादरम्यान पोहरादेवी येथे भरलेल्या यात्रेदरम्यान महसूल राज्यमंत्री संजय राठोड, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, तसेच वाशिम-यवतमाळच्या खासदार भावनाताई गवळी, कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या उपस्थितीत वनपर्यटन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. याच वनपर्यटन केंद्रात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै रोजी कृषीदीन म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येतो. याच दिवसाच्या औचित्यावर राज्य शासनाच्यावतीने राज्यभरात दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. यावेळी ना. राठोड यांनी पोहरादेवी तिर्थक्षेत्राच्या विकासाचा आढावा घेतला.