शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना काळात १२६ कुपोषितांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:57 IST

नवजात बालकांच्या जीवनातील सुरूवातीचे हजार दिवस अत्यंत महत्वाचे असतात. पहिल्या दोन वर्षांत बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ होत असते. ...

नवजात बालकांच्या जीवनातील सुरूवातीचे हजार दिवस अत्यंत महत्वाचे असतात. पहिल्या दोन वर्षांत बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ होत असते. या कालावधीत त्यांचे आरोग्य व पोषणाकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात मोठे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वयाच्या मानाने उंची, उंचीच्या मानाने वजन योग्य असणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने शासनस्तरावरून प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय कुपोषणमुक्तीसाठी २००५ मध्ये स्थापन झालेल्या राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनमार्फत माता सक्षमीकरणाची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. कुपोषण निर्मूलनाकरिता ग्राम बालविकास केंद्र हा उत्तम पर्याय ठरत असून याअंतर्गत सॅम व मॅम या घटकात मोडणाऱ्या बालकांवर उपचार केले जात आहेत. त्यानुषंगाने १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत ‘सॅम’ घटकातील ३४१ बालके दाखल झाली होती. त्या सर्वांवर उपचार करण्यात आले असून २८१ बालकांच्या प्रकृतीत पूर्णत: सुधारणा झाली. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत ५० बालके पूर्णत: बरी झाली; तर १ एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत ठणठणीत होणाऱ्या बालकांची संख्या १२६ आहे. चालूवर्षी आतापर्यंत ७ पैकी २ बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून प्राप्त झाली.

.....................

कोणत्या वर्षांत किती कुपोषितांवर उपचार

२०१८ - २८१

२०१९ - ५०

२०२० - १२६

..........................

तीन वर्षांत ४५७ बालके कुपोषणमुक्त

जिल्ह्यात २०१८ ते २०२० या तीन वर्षांत ग्राम बालविकास केंद्रात उपचाराकरिता एकूण ५३९ कुपोषित बालके दाखल झाली. त्यांच्यावर टप्प्याटप्प्याने उपचार करत ४५७ बालकांना कुपोषणमुक्त करण्यात आले. विशेष बाब म्हणजे कुपोषित बालके बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण (९१.३० टक्के) एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कोरोना काळात राहिले आहे.

.....................

कोट :

जिल्ह्यात कुपोषणमुक्तीसाठी प्रशासनाकडून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. मुले सुदृढ राहावी, यासाठी मातांमध्ये सातत्याने जनजागृती केली जात आहे. त्यामुळेच तीन वर्षांत ४५७ बालकांना पूर्णत: बरे करण्यात यश मिळाले असून यापुढेही कुपोषणमुक्तीच्या कार्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल.

- संजय जोल्हे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास, जि.प., वाशिम