शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

जिल्ह्यात कोरोना काळात १२६ कुपोषितांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:57 IST

नवजात बालकांच्या जीवनातील सुरूवातीचे हजार दिवस अत्यंत महत्वाचे असतात. पहिल्या दोन वर्षांत बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ होत असते. ...

नवजात बालकांच्या जीवनातील सुरूवातीचे हजार दिवस अत्यंत महत्वाचे असतात. पहिल्या दोन वर्षांत बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ होत असते. या कालावधीत त्यांचे आरोग्य व पोषणाकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात मोठे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वयाच्या मानाने उंची, उंचीच्या मानाने वजन योग्य असणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने शासनस्तरावरून प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय कुपोषणमुक्तीसाठी २००५ मध्ये स्थापन झालेल्या राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनमार्फत माता सक्षमीकरणाची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. कुपोषण निर्मूलनाकरिता ग्राम बालविकास केंद्र हा उत्तम पर्याय ठरत असून याअंतर्गत सॅम व मॅम या घटकात मोडणाऱ्या बालकांवर उपचार केले जात आहेत. त्यानुषंगाने १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत ‘सॅम’ घटकातील ३४१ बालके दाखल झाली होती. त्या सर्वांवर उपचार करण्यात आले असून २८१ बालकांच्या प्रकृतीत पूर्णत: सुधारणा झाली. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत ५० बालके पूर्णत: बरी झाली; तर १ एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत ठणठणीत होणाऱ्या बालकांची संख्या १२६ आहे. चालूवर्षी आतापर्यंत ७ पैकी २ बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून प्राप्त झाली.

.....................

कोणत्या वर्षांत किती कुपोषितांवर उपचार

२०१८ - २८१

२०१९ - ५०

२०२० - १२६

..........................

तीन वर्षांत ४५७ बालके कुपोषणमुक्त

जिल्ह्यात २०१८ ते २०२० या तीन वर्षांत ग्राम बालविकास केंद्रात उपचाराकरिता एकूण ५३९ कुपोषित बालके दाखल झाली. त्यांच्यावर टप्प्याटप्प्याने उपचार करत ४५७ बालकांना कुपोषणमुक्त करण्यात आले. विशेष बाब म्हणजे कुपोषित बालके बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण (९१.३० टक्के) एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कोरोना काळात राहिले आहे.

.....................

कोट :

जिल्ह्यात कुपोषणमुक्तीसाठी प्रशासनाकडून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. मुले सुदृढ राहावी, यासाठी मातांमध्ये सातत्याने जनजागृती केली जात आहे. त्यामुळेच तीन वर्षांत ४५७ बालकांना पूर्णत: बरे करण्यात यश मिळाले असून यापुढेही कुपोषणमुक्तीच्या कार्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल.

- संजय जोल्हे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास, जि.प., वाशिम