शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

एसटीने प्रवास करताय, सॅनिटायझर घेतलाय ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST

जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मंगरुळपीर आणि कारंजा हे चार आगार असून मानोरा आणि मालेगाव हे उपआगार कार्यान्वित आहेत. याअंतर्गत एकूण ...

जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मंगरुळपीर आणि कारंजा हे चार आगार असून मानोरा आणि मालेगाव हे उपआगार कार्यान्वित आहेत. याअंतर्गत एकूण १६७ एस.टी. बस असून सध्या जिल्हांतर्गत व परजिल्ह्यात प्रवासाकरिता एकूण ३२ बस सज्ज झाल्या आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गातून काहीअंशी दिलासा मिळाल्यानंतर २५ मे पासून एस.टी.च्या प्रवासी वाहतुकीस सुरुवात करण्यात आली. वाशिम आगारांतर्गत आधी रिसोड, अकोला आणि नंतर अमरावती मार्गावर सर्वाधिक बस सोडण्यात येत आहेत. इतर आगारांमधून बुलडाणा, जालना, कारंजा, पुसद, यवतमाळ, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये बस सोडण्यात येत आहे. प्रवाशांनी तोंडाला मास्क लावणे व सोबत सॅनिटायझर बाळगणे आवश्यक करण्यात आले आहे. तशा सूचना चालक, वाहकांकडून प्रवाशांना दिल्या जात आहेत. प्रवाशांकडून विशेष प्रतिसाद मिळत नसल्याने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा नियम पाळण्याचा प्रश्न सध्यातरी उपस्थित झाला नसल्याचे दिसून येत आहे.

.................

जिल्ह्यातील एकूण बस - १६७

सध्या सुरू असलेल्या बस - ३२

एकूण कर्मचारी - ८७०

सध्या कामावर वाहक - ४०

सध्या कामावर चालक - ४०

वाहक - ३६४

चालक - २९५

........................

एसटीची सर्वाधिक वाहतूक अकोला मार्गावर

१) एसटीसाठी अनलाॅक झाल्यानंतर २५ मे पासून ४० च्या क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे.

२) एसटीची सर्वाधिक वाहतूक पूर्वीप्रमाणेच अकोला मार्गावर होत असून त्यापाठोपाठ अमरावती आणि नांदेड या मार्गावर एसटीच्या फेऱ्या केल्या जात आहेत.

३) एसटी सुरू झाली असली तरी प्रवाशांकडून मात्र अद्यापपर्यंत विशेष प्रतिसाद मिळत नसल्याने उत्पन्नात घट येत आहे.

................

सॅनिटायझर वापराकडे दुर्लक्ष

एसटीमधून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांकडून तोंडाला मास्क लावण्यात येत आहे; मात्र सॅनिटायझर सोबत बाळगणारे, त्याचा वापर करणारे बोटावर मोजण्याइतकेच असल्याचे दिसून येत आहे.

...............

दहा लाखांपेक्षा अधिक तोटा

कोरोनामुळे चालूवर्षीही अनेक दिवस एसटीची प्रवासी वाहतूक बंद राहिली. यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. २५ मे पासून तिढा सुटला; मात्र प्रवासीच मिळत नसल्याने गेल्या ८ ते १० दिवसांत दहा लाखांपेक्षा अधिक तोटा झाला.

................

नागरिक घरातच...

एसटीची प्रवासी वाहतूक सुरू झाली असली तरी त्यास विशेष प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. अधिकांश नागरिक घरातच असून अनेकजण खासगी वाहनांनी प्रवास करणे पसंद करीत आहेत.

...................

बस सुरू झाली अन् जीवात जीव आला

कामानिमित्त आठवड्यातून दोन ते तीन दिवस वाशिम-अकोला प्रवास करावा लागतो; मात्र मध्यंतरी एसटीची प्रवासी वाहतूक बंद असल्याने गैरसोय झाली. २५ मे पासून एसटी पुन्हा सुरू झाल्याने सोयीचे झाले आहे.

- संदिप चिखलकर

.............

पॅसेंजर रेल्वे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. यामुळे एसटीचाच आधार होता; मात्र कोरोनामुळे ही वाहतूकही मध्यंतरी बंद राहिली. आता पुन्हा एसटी सुरू झाल्याने प्रवासाकरिता ठोस पर्याय उपलब्ध झाला आहे.

- सूरज बैरवार