शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा ‘पंक्चर’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST

वाशिममार्गे अमरावती, यवतमाळ, पुणे, अकोला, नांदेड, नागपूर यासह इतरही मोठमोठ्या शहरांमध्ये सुमारे २५ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवाशांची वाहतूक केली जाते. ...

वाशिममार्गे अमरावती, यवतमाळ, पुणे, अकोला, नांदेड, नागपूर यासह इतरही मोठमोठ्या शहरांमध्ये सुमारे २५ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवाशांची वाहतूक केली जाते. २०२० या संपूर्ण वर्षात मात्र जवळपास नऊ महिने व्यवसाय पूर्णत: ठप्प झालेला होता. ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतुकीचा हा व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला लागली. त्याचा थेट परिणाम होऊन प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या ‘स्लीपर कोच ट्रॅव्हल्स’लाही ५ ते १० प्रवासीच मिळत असल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे डिझेलचाही खर्च वसूल होणे कठीण झाल्याची माहिती ट्रॅव्हल्स मालकांनी दिली.

..............

कोरोनाआधी रोज बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या - २५

सध्याची संख्या - १०

...........

बाॅक्स :

गाडी रूळावर येत होती, पण...

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गतवर्षी जवळपास नऊ महिने प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय थांबला होता. तो हळूहळू पुन्हा रूळावर येत होता. ट्रॅव्हल्सही आता ५० टक्के क्षमतेने धावू लागल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून मात्र पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे.

..........

बॅंकेचे हप्ते थकले

३८ ते ४० लाख रुपये कर्ज घेऊन ट्रॅव्हल्स विकत घेतली. त्याचे हप्ते फेडणे सुरू आहे. अशात उद्‌भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षी व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला. गाड्या जागीच उभ्या ठेवाव्या लागल्या. यामुळे टायरवर चिरा पडण्यासह बॅटरी उतरली. यामुळे ३ लाखांचा फटका बसला. आताही प्रवाशांची संख्या १० ते १५ टक्क्यांवर आलेली आहे. यामुळे बॅंकेचे हप्ते थकले आहेत.

- पप्पू चरखा

ट्रॅव्हल्स मालक, वाशिम

.......

ट्रॅव्हल्स मालक कोरोनामुळे संपण्याच्या मार्गावर आहेत. हा व्यवसाय पुरता अडचणीत सापडला असून, डिझेलचाही खर्च वसूल होणे अशक्य झाले आहे. व्यवसायाची घडी पूर्णत: विस्कळित होऊ नये, यासाठी गाड्या सुरू ठेवाव्या लागत आहेत; मात्र हा संयमही फार काळ टिकू शकणार नाही. कोरोनाच्या संकटाने ट्रॅव्हल्स मालकांसोबतच शेकडो कामगारांनाही अडचणीत टाकले आहे.

- रवि बुंदे

ट्रॅव्हल्स मालक, वाशिम

.........

कोरोनाच्या संकटामुळे ट्रॅव्हल्सला प्रवासी मिळेनासे झाले आहेत. यामुळे परजिल्ह्यात धावणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्स बंद ठेवाव्या लागत आहेत. ज्या सुरू आहेत, त्यांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने व्यवसाय परवडेनासा झाला आहे. शासनाचेही काही बाबींमध्ये धोरण चुकत आहे. एकूणच या सर्व प्रतिकूल बाबींमुळे ट्रॅव्हल्स मालक अडचणीत सापडले आहेत.

- सत्यनारायण शर्मा

अध्यक्ष, बस वाहतूक संघटना