शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

अवैध नळजोडण्यांचे जाळे

By admin | Updated: December 29, 2014 00:39 IST

लाखोंची पाणीपट्टी पाण्यात, पाणीटंचाईतही भर.

वाशिम : शहरवासीयांना भेडसावणार्‍या पाणीटंचाईमध्ये अवैध नळजोडण्यांनी भर घातली आहे. पालिकेच्या दप्तरी आजमितीला सुमारे सात हजारावर जोडण्यांची नोंद असली तरी, प्रत्यक्षात यापेक्षा दुप्पट नळजोडण्या अवैध आहेत. त्यामुळे लाखोंची पाणीपट्टी पाण्यात जात आहे. १९७६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित करण्यात आली होती. तेव्हा वाशिम शहराच्या असलेल्या ३0 हजार लोकसंख्येला दिवसातून दोन वेळा नियमित पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने ती पुरेशी होती. मागील ३४ वर्षात जुन्या वाशिम शहरासोबतच चारही बाजूंनी असलेल्या चिखली सुर्वे, जांभरुण नावजी, काकडदाती या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातही वाशिम शहराचा विस्तार होत गेला. वाशिम शहरातही पूर्वी शेतजमीन म्हणून वापरात असलेल्या जमिनी अकृषक करून तेथे प्लॉट पाडण्यात आले. तसेच पूर्वी विरळ असलेली वस्ती दाट झाली. त्यामुळे वाशिम शहराच्या लोकसंख्येने आता लाखाचा आकडा ओलांडला आहे. शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यात जुनी योजना कुचकामी ठरत असल्यामुळे गत दोन वर्षांपूर्वी येथे नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. दोन वर्षांंपासून कामही सुरू झाले आहे; मात्र पाणीटंचाई शहरवासीयांचा पिच्छा सोडायला तयार नाही. अपुरा पाणीसाठा, पालिकेचे ढिसाळ नियोजन, जुनी झालेली योजना आदींसह शहरातील अवैध नळ जोडण्याही पाणी टंचाईला तेवढय़ाच कारणीभूत आहेत. ३६ वर्षांपूर्वीची शहरात जेवढय़ा नळ जोडण्या शहरात होत्या त्यापेक्षा आज अनेक पटींनी नळजोडण्या वाढल्या आहेत; परंतु प्रत्यक्ष कागदोपत्री त्यापैकी निम्म्याहूनही कमी सुमारे सात हजार आल्या असल्याने नगरपालिकेची पाणीपट्टी वसुली पाणी वाटपाच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे विजेची देयके व जीवन प्राधिकरण विभागाची थकीत रक्कम भरणे पालिकेला जड जाते. अनेकदा नगर परिषदेने विद्युत वितरण कंपनीची थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा योजनेचा व पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जातो. परिणामी, नगर परिषदेकडून तातडीने काहीतरी व्यवस्था करून देयक भरले जाते अथवा वेळ मागून त्या वेळेत देयक भरण्यात येते; परंतु मुळात अवैध नळजोडण्यांच्या मुद्याकडे नगर दुर्लक्ष होत आहे.