शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अवैध नळजोडण्यांचे जाळे

By admin | Updated: December 29, 2014 00:39 IST

लाखोंची पाणीपट्टी पाण्यात, पाणीटंचाईतही भर.

वाशिम : शहरवासीयांना भेडसावणार्‍या पाणीटंचाईमध्ये अवैध नळजोडण्यांनी भर घातली आहे. पालिकेच्या दप्तरी आजमितीला सुमारे सात हजारावर जोडण्यांची नोंद असली तरी, प्रत्यक्षात यापेक्षा दुप्पट नळजोडण्या अवैध आहेत. त्यामुळे लाखोंची पाणीपट्टी पाण्यात जात आहे. १९७६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित करण्यात आली होती. तेव्हा वाशिम शहराच्या असलेल्या ३0 हजार लोकसंख्येला दिवसातून दोन वेळा नियमित पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने ती पुरेशी होती. मागील ३४ वर्षात जुन्या वाशिम शहरासोबतच चारही बाजूंनी असलेल्या चिखली सुर्वे, जांभरुण नावजी, काकडदाती या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातही वाशिम शहराचा विस्तार होत गेला. वाशिम शहरातही पूर्वी शेतजमीन म्हणून वापरात असलेल्या जमिनी अकृषक करून तेथे प्लॉट पाडण्यात आले. तसेच पूर्वी विरळ असलेली वस्ती दाट झाली. त्यामुळे वाशिम शहराच्या लोकसंख्येने आता लाखाचा आकडा ओलांडला आहे. शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यात जुनी योजना कुचकामी ठरत असल्यामुळे गत दोन वर्षांपूर्वी येथे नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. दोन वर्षांंपासून कामही सुरू झाले आहे; मात्र पाणीटंचाई शहरवासीयांचा पिच्छा सोडायला तयार नाही. अपुरा पाणीसाठा, पालिकेचे ढिसाळ नियोजन, जुनी झालेली योजना आदींसह शहरातील अवैध नळ जोडण्याही पाणी टंचाईला तेवढय़ाच कारणीभूत आहेत. ३६ वर्षांपूर्वीची शहरात जेवढय़ा नळ जोडण्या शहरात होत्या त्यापेक्षा आज अनेक पटींनी नळजोडण्या वाढल्या आहेत; परंतु प्रत्यक्ष कागदोपत्री त्यापैकी निम्म्याहूनही कमी सुमारे सात हजार आल्या असल्याने नगरपालिकेची पाणीपट्टी वसुली पाणी वाटपाच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे विजेची देयके व जीवन प्राधिकरण विभागाची थकीत रक्कम भरणे पालिकेला जड जाते. अनेकदा नगर परिषदेने विद्युत वितरण कंपनीची थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा योजनेचा व पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जातो. परिणामी, नगर परिषदेकडून तातडीने काहीतरी व्यवस्था करून देयक भरले जाते अथवा वेळ मागून त्या वेळेत देयक भरण्यात येते; परंतु मुळात अवैध नळजोडण्यांच्या मुद्याकडे नगर दुर्लक्ष होत आहे.