सन २०१८-१९ व २०१९-२० मध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांचे यशदा, पुणेमार्फत ३ दिवसीय निवासी बांधणी क्षमता प्रशिक्षण घेण्यात आले होते. या प्रशिक्षणाला सरपंचांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ज्या सरपंचांनी हे प्रशिक्षण घेऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा २०१८-१९ मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या ३००० सरपंचांचे उजळणी प्रशिक्षण राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान आराखडा २०२१-२२ मध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी २०२०-२१ मध्ये २५० प्रवीण प्रशिक्षकांचे उजळणी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण विभागनिहाय घेण्यात येणार असून, २४ व २५ मार्च रोजी अमरावती विभागातील ५ जिल्हे आणि औरंगाबाद विभागातील ५ जिल्ह्यांतील प्रवीण प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, बारामती, पुणे येथे होणार आहे. यात वाशिम जिल्ह्यातील प्रवीण प्रशिक्षक रवींद्र इंगोले यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
यशदाच्या प्रवीण प्रशिक्षकांचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:43 IST