शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

पर्यटन क्षेत्र विकासाला मिळणार चालना !

By admin | Updated: July 21, 2016 17:31 IST

गत चार वर्षांपासून रखडलेल्या पर्यटनक्षेत्र विकास कार्यक्रमासाठी जवळपास ५.७३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्याने पर्यटन क्षेत्र विकासाला चालना मिळणार आहे.

वाशिम - गत चार वर्षांपासून रखडलेल्या पर्यटनक्षेत्र विकास कार्यक्रमासाठी जवळपास ५.७३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्याने पर्यटन क्षेत्र विकासाला चालना मिळणार आहे.पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नियोजन व निधी पुरविला जात होता. ग्रामीण भागातील पर्यटनक्षेत्रांच्या विकासात्मक कामांचे नियोजन जिल्हा नियोजन विकास समितीने करावे की जिल्हा परिषदेमार्फत केले जावे, या वादात ह्यपर्यटनह्ण क्षेत्रांचा विकास रखडला होता. पर्यटन क्षेत्रांच्या विकासात्मक कामांचे नियोजन जिल्हा परिषदेने करण्याचा निर्णय झाल्याने गत चार वर्षांपासून रखडलेल्या कामांचे नियोजन आता करण्यात आले. सर्व जिल्हा परिषद सर्कलमधील पर्यटन क्षेत्रांचा समान प्रमाणात विकास करण्यासाठी सर्व सदस्यांकडून कामांची मागणी नोंदविण्यात आली. सन २०१२-१३ ते सन २०१५-१६ या चार वर्षातील पर्यटन क्षेत्र विकासाचे नियोजन केल्यानंतर मंजूरीसाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन विकास समितीकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने चार वर्षातील १६८ पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी सात कोटी २३ लाख २८ हजार रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली. त्यापैकी पाच कोटी ७३ लाख ५५  हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यामुळे पर्यटन क्षेत्रांचा विकास होण्यातील मोठा अडसर दूर झाला आहे.