शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम स्वच्छता निगरानी समितीला मिळणार टूलकिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:27 IST

वाशिम : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत स्थापन करण्यात आलेल्या ग्राम स्वच्छता निगरानी समितीला लवकरच टूलकिट मिळणार ...

वाशिम : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत स्थापन करण्यात आलेल्या ग्राम स्वच्छता निगरानी समितीला लवकरच टूलकिट मिळणार आहेत. दोन समितीला प्रातिनिधिक स्वरूपात टूलकिटचे वितरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते २९ जून रोजी करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात वाशिम तालुक्यातील काटा आणि तामसी या ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सचिव यांना बोलावून स्वच्छता टूलकिटचे वितरण करण्यात आले. तामसी ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्राम निगरानी समितीच्या अध्यक्षा ज्योती कव्हर, ग्रामविकास अधिकारी श्याम बरेटिया, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर कव्हर, प्रल्हाद कव्हर आणि काटा ग्रामपंचायतीच्या सरपंच जया मोरे, उपसरपंच अनिता कंकणे, ग्रामविकास अधिकारी दशरथ राठोड, समिती सदस्य संजय रणखांब यांना टूलकिटचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखडे, सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र सोनोने, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे यांची उपस्थिती होती.

गावातील स्वच्छता शाश्वत राहावी आणि उघड्यावरील हगणदारीला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ग्राम स्वच्छता निगरानी समितीचे गठण करण्यात आले. गावातील सरपंचांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार, आशा, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक/ स्वच्छाग्रही, उमेद अभियाच्या सीआरपी महिला आणि गावाचे ग्रामसेवक अशा १० लोकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ५० पैकी प्रातिनिधिक स्वरूपात वाशिम तालुक्यातील २ ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते टूलकिटचे वितरण करण्यात आले आहे. टूलकिटमध्ये ओळखपत्र, टी-शर्ट, टोपी, ॲप्रॉन, हॅण्ड सॅनिटायझर, मास्क, बॅटरी, शिट्टी, कापडी पिशवी ई. बाबींचा समावेश आहे. उर्वरित ४८ ग्रामपंचायतींना पंचायत समिती स्तरावरून टूलकिटचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांनी दिली.

०००००

टूलकिटचा वापर गुड मॉर्निंग मोहिमेसाठी करावा : पंत

वाशिम जिल्हा परिषदेच्या वतीने जागर स्वच्छतेचा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत स्थापन झालेल्या ग्राम स्वच्छता निगरानी समितीने गावाच्या संपूर्ण स्वच्छतेचा विडा उचलावा, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी व्यक्त केले. निगरानी समितीच्या सदस्यांशी संवाद साधत पंत यांनी गावाच्या स्वच्छतेबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. उघड्यावरील हगणदारीला प्रतिबंध घालण्यासाठी व लोकांना शौचालय वापराची सवय लावण्यासाठी गुड मॉर्निंग मोहीम हे प्रभावी साधन आहे. गुड मॉर्निंग मोहीम राबविण्यासाठी निगरानी समितीला टूलकिट देण्यात येत आहे. सुरुवातील जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने इतर सर्व ग्रामपंचायतींमध्ये ही मोहीम राबवून जिल्ह्यात ओडीएफ प्लस हे अभियान गतिमान करण्यात येणार असल्याचे मत वसुमना पंत यांनी व्यक्त केले.