शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शौचालय बांधकामाचा आढावा!

By admin | Updated: July 20, 2016 02:04 IST

२0 ग्रामपंचायतींची कामगिरी शून्य; सुधारणा करण्याचे निर्देश

वाशिम: जिल्ह्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी आता ग्रामसेवकांच्या तालुकानिहाय आढावा सभा लावल्या आहेत. या सभेच्या माध्यमातून कामचुकार आणि अकार्यक्षम ग्रामसेवकांना लक्ष्य केले आहे. मंगळवारी मंगरुळपीर पंचायत समिती येथून आढावा सभेला सुरूवात झाली असून, बुधवारी रिसोड येथे सभा झाली. मंगरुळपीर येथे मग्रारोहयोचे उप जिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, गटविकास अधिकारी राठोड, गणेश देशमुख, जि. प. सदस्य शिवदास राऊत, विश्‍वास गोदमले आदिंची उपस्थिती होती. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यात सन २0१६-१७ या आर्थिक वर्षाच्या कृती आराखड्यात ३६ ग्रामपंचायतींचा समावेश केला आहे. ऑनलाइन अहवालानुसार ३६ पैकी २0 ग्रामपंचायतीमध्ये या वर्षात आजपर्यंत एकही शौचालय बांधले नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. यावर गणेश पाटील यांनी अशा झीरोवाल्या ग्रामसेवकांना उभे करून गावातील लाभार्थीनिहाय शौचालय बांधकामाचे नियोजन सादर करण्याच्या सूचना दिल्या. मागील साडेतीन महिन्यांत एकही शौचालय न बांधणार्‍या ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले. काम न करण्याची ग्रामसेवकांची प्रवृत्ती गावासाठी तर घातक आहेच; परंतु ती स्वच्छ भारत मिशनच्या राष्ट्रीय कामात बाधा निर्माण करणारी असल्याने यात होत असलेली दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. व्हॉट्स अँप नंबरचे बोर्ड पंचायत समितीत लागले नसल्याची जाणीव करून देत आता प्रत्येक गावातही असा बोर्ड लावण्याचे निर्देश गटविकास अधिकारी राठोड यांना दिले. लोकांनी शौचालय बांधल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ देण्याचे निर्देशही पाटील यांनी दिले. शौचालय बांधल्यानंतर त्याचे अनुदान वितरित करणे व नंतर त्याची ऑनलाइन माहिती भरणे आवश्यक असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.