शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामाचा आढावा!

By admin | Updated: July 20, 2016 02:04 IST

२0 ग्रामपंचायतींची कामगिरी शून्य; सुधारणा करण्याचे निर्देश

वाशिम: जिल्ह्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी आता ग्रामसेवकांच्या तालुकानिहाय आढावा सभा लावल्या आहेत. या सभेच्या माध्यमातून कामचुकार आणि अकार्यक्षम ग्रामसेवकांना लक्ष्य केले आहे. मंगळवारी मंगरुळपीर पंचायत समिती येथून आढावा सभेला सुरूवात झाली असून, बुधवारी रिसोड येथे सभा झाली. मंगरुळपीर येथे मग्रारोहयोचे उप जिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, गटविकास अधिकारी राठोड, गणेश देशमुख, जि. प. सदस्य शिवदास राऊत, विश्‍वास गोदमले आदिंची उपस्थिती होती. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यात सन २0१६-१७ या आर्थिक वर्षाच्या कृती आराखड्यात ३६ ग्रामपंचायतींचा समावेश केला आहे. ऑनलाइन अहवालानुसार ३६ पैकी २0 ग्रामपंचायतीमध्ये या वर्षात आजपर्यंत एकही शौचालय बांधले नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. यावर गणेश पाटील यांनी अशा झीरोवाल्या ग्रामसेवकांना उभे करून गावातील लाभार्थीनिहाय शौचालय बांधकामाचे नियोजन सादर करण्याच्या सूचना दिल्या. मागील साडेतीन महिन्यांत एकही शौचालय न बांधणार्‍या ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले. काम न करण्याची ग्रामसेवकांची प्रवृत्ती गावासाठी तर घातक आहेच; परंतु ती स्वच्छ भारत मिशनच्या राष्ट्रीय कामात बाधा निर्माण करणारी असल्याने यात होत असलेली दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. व्हॉट्स अँप नंबरचे बोर्ड पंचायत समितीत लागले नसल्याची जाणीव करून देत आता प्रत्येक गावातही असा बोर्ड लावण्याचे निर्देश गटविकास अधिकारी राठोड यांना दिले. लोकांनी शौचालय बांधल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ देण्याचे निर्देशही पाटील यांनी दिले. शौचालय बांधल्यानंतर त्याचे अनुदान वितरित करणे व नंतर त्याची ऑनलाइन माहिती भरणे आवश्यक असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.