शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

शौचालय बांधकामाचा आढावा!

By admin | Updated: July 20, 2016 02:04 IST

२0 ग्रामपंचायतींची कामगिरी शून्य; सुधारणा करण्याचे निर्देश

वाशिम: जिल्ह्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी आता ग्रामसेवकांच्या तालुकानिहाय आढावा सभा लावल्या आहेत. या सभेच्या माध्यमातून कामचुकार आणि अकार्यक्षम ग्रामसेवकांना लक्ष्य केले आहे. मंगळवारी मंगरुळपीर पंचायत समिती येथून आढावा सभेला सुरूवात झाली असून, बुधवारी रिसोड येथे सभा झाली. मंगरुळपीर येथे मग्रारोहयोचे उप जिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, गटविकास अधिकारी राठोड, गणेश देशमुख, जि. प. सदस्य शिवदास राऊत, विश्‍वास गोदमले आदिंची उपस्थिती होती. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यात सन २0१६-१७ या आर्थिक वर्षाच्या कृती आराखड्यात ३६ ग्रामपंचायतींचा समावेश केला आहे. ऑनलाइन अहवालानुसार ३६ पैकी २0 ग्रामपंचायतीमध्ये या वर्षात आजपर्यंत एकही शौचालय बांधले नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. यावर गणेश पाटील यांनी अशा झीरोवाल्या ग्रामसेवकांना उभे करून गावातील लाभार्थीनिहाय शौचालय बांधकामाचे नियोजन सादर करण्याच्या सूचना दिल्या. मागील साडेतीन महिन्यांत एकही शौचालय न बांधणार्‍या ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले. काम न करण्याची ग्रामसेवकांची प्रवृत्ती गावासाठी तर घातक आहेच; परंतु ती स्वच्छ भारत मिशनच्या राष्ट्रीय कामात बाधा निर्माण करणारी असल्याने यात होत असलेली दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. व्हॉट्स अँप नंबरचे बोर्ड पंचायत समितीत लागले नसल्याची जाणीव करून देत आता प्रत्येक गावातही असा बोर्ड लावण्याचे निर्देश गटविकास अधिकारी राठोड यांना दिले. लोकांनी शौचालय बांधल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ देण्याचे निर्देशही पाटील यांनी दिले. शौचालय बांधल्यानंतर त्याचे अनुदान वितरित करणे व नंतर त्याची ऑनलाइन माहिती भरणे आवश्यक असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.