शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

ऑनलाइन अर्जांंचा आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:03 IST

वाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी व २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान, १८ सप्टेंबरपर्यंंत एकूण २.१६ लाख शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली तर यापैकी केवळ १.२५ लाख शेतकर्‍यांनीच अर्ज भरले. उर्वरित एक लाख शेतकर्‍यांना एका दिवसात ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत.  

ठळक मुद्देकर्जमाफी योजना एक लाख शेतकर्‍यांचे अर्ज भरणे बाकी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी व २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान, १८ सप्टेंबरपर्यंंत एकूण २.१६ लाख शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली तर यापैकी केवळ १.२५ लाख शेतकर्‍यांनीच अर्ज भरले. उर्वरित एक लाख शेतकर्‍यांना एका दिवसात ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत.  २२ सप्टेंबरपर्यंंंत ऑनलाइन अर्ज न भरल्यास कर्जमाफीच्या लाभापासून संबंधित शेतकर्‍यांना वंचित राहावे लागणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेले, कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा सामान्य रुगणालयात ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तसेच वाशिम कारागृहातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या कैद्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यासाठी कारागृहातसुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांची नाव नोंदणी करून घेण्यात येते. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरले जातात. मात्र ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी नाव नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण न झालेले अनेक शेतकरी आहेत. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, १८ सप्टेंबरपर्यंंत २.१६ लाख शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंदणी झाली होती. यापैकी एक लाख २५ हजार ८५ शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. शेवटच्या दिवशी अर्थात २२ सप्टेंबरपर्यंंंत जवळपास एक लाख शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. त्यातच वीज भारनियमन, कनेक्टिव्हिटी नसणे, तांत्रिक अडचणी, बोटांचे ठसे न घेणे आदी अडचणी निर्माण झाल्यास काही शेतकरी ऑनलाइन अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित शेतकर्‍याला कर्जमाफी अथवा २५ हजार रुपयांपर्यंंंतच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळू शकणार नाही.बँकेमध्ये ऑफलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकर्‍यांनीसुद्धा ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. पात्र शेतकर्‍याने घेतलेले पीक कर्ज कोणत्याही बँकेचे असले तरी कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी भरण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जांंंमधील त्रुटींची दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या त्रुटींची दुरुस्तीही २२ सप्टेंबर २0१७ पर्यंंंतच करणे आवश्यक आहे. संबंधित शेतकर्‍यांनी २२ सप्टेंबरपर्यंंंत ऑनलाइन अर्ज भरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.

मुदतवाढ देण्याची मागणीअनेक शेतकर्‍यांच्या बोटांचे ठसे येत नसल्याने त्यांना ऑनलाइन अर्ज भरता आले नाहीत. आधार कार्डशी बोटाचे ठसे संबंधित असल्याने तहसील कार्यालयांतून आधार कार्ड व बोटाचे ठसे ‘अपडेट’ करण्याचा सल्ला शेतकर्‍यांना प्रशासनातर्फे देण्यात आला होता. तथापि, अद्यापही अनेक शेतकर्‍यांचे आधार कार्ड व बोटाचे ठसे ‘अपडेट’ झाले नसल्याने अर्ज करण्याला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.