शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी हमीदरापेक्षा कमी दरानेच!

By admin | Updated: July 11, 2017 19:30 IST

जिल्ह्यातील वास्तव: नाफेड बंद झाल्यानंतर शेतकरी हताश

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने यंदा १ जूनपासून नाफेडची खरेदी बंद के ल्यानंतर तूर उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. शेकडो शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही हजारो क्विंटल तूर पडून आहे. हे शेतकरी खरीपात वेळोवेळी लागणाऱ्या शेतीखर्चासाठी तूर बाजारात विकत आहेत; परंतु व्यापाऱ्यांकडून त्यांची तूर हमीदरापेक्षा खूप कमी दराने खरेदी करण्यात येत आहे.मागील वर्षी जिल्ह्यात ६३ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता. हवामानाची चांगली साथ मिळाल्याने उत्पादनही भरघोस झाले होते; परंतु या वाणाला शासनाने अत्यंत तोकडा असा प्रति क्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदर जाहीर केला. त्यातच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची तूर त्यापेक्षा खूप कमी दरात खरेदी केली जात असल्याने शासनाच्यावतीने राज्यभरात तूर खरेदी केंद्रं सुरू करून हमीदराने शेतकऱ्यांची तूर खरेदी के ली; परंतु यात अनेक अडचणी आल्या. प्रत्यक्षात शासनाने नियोजन केलेल्या आकड्यापेक्षा खूप अधिक प्रमाणात तूर खरेदी केली तरीही, शेतकऱ्यांकडे लाखो क्विंटल तूर पडूनच होती. अखेर शासनान जूनपासून शासकीय तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. तथापि, त्यापूर्वी टोकण घेतलेल्या शेतकऱ्यांची तूर १० जूनपर्यंत मोजण्यात आली. यातही अनेक शेतकरी मोजणीपासून वंचित राहिले. दरम्यान, शासकीय खरेदी बंद केल्यानंतर व्यापाऱ्यांना हमीदराने तूर खरेदी करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले; परंतु आता महिना उलटत आला तरी, याची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात तरी होत नसल्याचे दिसत आहे. मागील आठवडाभरात जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमधील तुरीचे दर जाणून घेतले असता एकाही बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी किमान ३ हजार ४०० ते कमाल ३ हजार ८५५ पेक्षा अधिक दराने तूर खरेदी केली नसल्याचे आढळून आले. त्यावरून तुरीच्य हमीदराला व्यापाऱ्यांकडून खो देण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.