शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

तूर खरेदी हमीदरापेक्षा कमी दरानेच!

By admin | Updated: July 11, 2017 19:30 IST

जिल्ह्यातील वास्तव: नाफेड बंद झाल्यानंतर शेतकरी हताश

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने यंदा १ जूनपासून नाफेडची खरेदी बंद के ल्यानंतर तूर उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. शेकडो शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही हजारो क्विंटल तूर पडून आहे. हे शेतकरी खरीपात वेळोवेळी लागणाऱ्या शेतीखर्चासाठी तूर बाजारात विकत आहेत; परंतु व्यापाऱ्यांकडून त्यांची तूर हमीदरापेक्षा खूप कमी दराने खरेदी करण्यात येत आहे.मागील वर्षी जिल्ह्यात ६३ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता. हवामानाची चांगली साथ मिळाल्याने उत्पादनही भरघोस झाले होते; परंतु या वाणाला शासनाने अत्यंत तोकडा असा प्रति क्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदर जाहीर केला. त्यातच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची तूर त्यापेक्षा खूप कमी दरात खरेदी केली जात असल्याने शासनाच्यावतीने राज्यभरात तूर खरेदी केंद्रं सुरू करून हमीदराने शेतकऱ्यांची तूर खरेदी के ली; परंतु यात अनेक अडचणी आल्या. प्रत्यक्षात शासनाने नियोजन केलेल्या आकड्यापेक्षा खूप अधिक प्रमाणात तूर खरेदी केली तरीही, शेतकऱ्यांकडे लाखो क्विंटल तूर पडूनच होती. अखेर शासनान जूनपासून शासकीय तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. तथापि, त्यापूर्वी टोकण घेतलेल्या शेतकऱ्यांची तूर १० जूनपर्यंत मोजण्यात आली. यातही अनेक शेतकरी मोजणीपासून वंचित राहिले. दरम्यान, शासकीय खरेदी बंद केल्यानंतर व्यापाऱ्यांना हमीदराने तूर खरेदी करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले; परंतु आता महिना उलटत आला तरी, याची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात तरी होत नसल्याचे दिसत आहे. मागील आठवडाभरात जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमधील तुरीचे दर जाणून घेतले असता एकाही बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी किमान ३ हजार ४०० ते कमाल ३ हजार ८५५ पेक्षा अधिक दराने तूर खरेदी केली नसल्याचे आढळून आले. त्यावरून तुरीच्य हमीदराला व्यापाऱ्यांकडून खो देण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.