शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

पुलाअभावी शेतक-यांवर शेतमाल शेतात ठेवण्याची वेळ

By admin | Updated: October 8, 2016 02:18 IST

काम त्वरित पूर्ण करण्याची शेतक-यांची मागणी.

देपूळ(जि. वाशिम ) : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यंत्रणाद्वारे करण्यात येत असलेल्या पूस नदीवरील पर्यायी पुलाचे काम रखडल्याने शेतकर्‍यांना चार ते पाच फूट खोल पाण्यातून जुन्या पुलावरून ये-जा करावी लागत आहे. एक हजार ५00 एकर शेतातील सोयाबीनचे पीक शेतात ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी भारिप-बमसंचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडुरंग यांनी ७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनातून केली आहे. लघु पाटबंधारे विभाग क्रमांक तीन वाशिमच्या अधिपत्याखाली झालेल्या वारा जहागीर बृहत लघु पाटबंधारे योजनेच्या सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्राखाली देपूळ ते बोरी रस्त्यावरील पूस नदीवरील पूल पाच फूट पाण्याखाली गेल्याने बोरी ते देपूळ गावचा संपर्क तुटला असून, या रस्त्यावरून शेती करणार्‍या २५0 शेतकर्‍यांच्या १ हजार ५00 शेतातील सोयाबीन पीक शेतात ठेवण्याची वेळ आली. या पुलाचे काम त्वरित व्हावे, याकरिता लघू पाटबंधारे विभाग क्रमांक तीन वाशिमने १ कोटी ३३ लाखाचा निधी पंतप्रधान ग्राम सडक योजना वाशिमला दोन वर्षांपूर्वी वळता केला; परंतु संबंधित यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍यांना नाहक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या यंत्रणेने संबंधित पुलाचे अर्धवट काम करून आता काम थांबविले आहे. दरम्यान, या पुलाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करणे आवश्यक असल्याने योग्य त्या उपायेयाजना त्वरित करून काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशा सूचना कार्यकारी अभियंता एस.डी.जाधव यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्याला अनेकदा दिल्या; मात्र संबंधित यंत्रणा लक्ष देण्यास तयार नसल्याने शेतकर्‍यांचे नाहक हाल होत आहेत. याकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.